शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

त्र्यंबक नगर परिषदेत आठ प्रभाग होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:16 IST

नवीन नियमाप्रमाणे ५० टक्क्यांपेक्षा आरक्षण वाढणार नसल्याने जनरल जागांची संख्या मात्र वाढणार आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण ...

नवीन नियमाप्रमाणे ५० टक्क्यांपेक्षा आरक्षण वाढणार नसल्याने जनरल जागांची संख्या मात्र वाढणार आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण होणार नाही, याची काळजी घ्यावी लागणार आहे. त्र्यंबक नगर परिषदेची मुदत डिसेंबर २०२२ ला संपणार असली तरी निवडणुका मात्र नोव्हेंबर २०२२ लाच होतील. त्याप्रमाणे इच्छुकांनी आतापासूनच निवडणूक वाढविण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. निवडणुकीसाठी मात्र इच्छुकांची संख्या मोठी असणार आहे. त्यामुळे चुरस वाढणार आहे.

शहरातील लोकसंख्यानुसार अनु.जाती १, अनु.जमाती ६ व ओबीसी (नागरिकांचा मागास प्रवर्ग) २ असे नऊ आरक्षित सदस्य झाल्यानंतर उर्वरित आठ जागांवर सर्वसाधारण (जनरल) गटातून निवडणुका लढवल्या जातील. त्यातही महिलांना पन्नास टक्के आरक्षणानुसार महिलांची संख्या आठ राहणार आहे. अर्थात ही संख्या मागच्या वर्षी नऊ होती, ती या पंचवार्षिकमध्ये आठ होणार आहे. अनु.जातीमध्ये मागच्या पंचवार्षिकला महिला आरक्षित होती. या वेळेस मात्र पुरुष किंवा महिला कोणीही निवडणूक लढवू शकतात.

पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण नसल्यामुळे नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी केवळ दोनच जागा असणार आहेत. त्यामुळे आता जनरल जागांवर रस्सीखेच होणार आहे. सन २०२७-२८ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा असल्याने सिंहस्थ नियोजन सन २०२२ मध्ये निवडून येणाऱ्या बाॅडीलाच करावे लागणार असल्याने अनेक इच्छुकांची निवडणूक लढविण्यासाठी भाऊगर्दी होणार आहे. सिंहस्थाचे तीनही पर्वकाल २०२७ मध्येच होतील, तर त्या वेळच्या कौन्सिलची मुदतही डिसेंबर २०२७ लाच संपणार आहे.