शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
3
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
4
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
5
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
6
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
7
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
8
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
9
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
10
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
11
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
12
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
13
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
14
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
15
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
16
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
17
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
18
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?
19
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
20
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव

त्र्यंबक नगर परिषदेत आठ प्रभाग होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:16 IST

नवीन नियमाप्रमाणे ५० टक्क्यांपेक्षा आरक्षण वाढणार नसल्याने जनरल जागांची संख्या मात्र वाढणार आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण ...

नवीन नियमाप्रमाणे ५० टक्क्यांपेक्षा आरक्षण वाढणार नसल्याने जनरल जागांची संख्या मात्र वाढणार आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण होणार नाही, याची काळजी घ्यावी लागणार आहे. त्र्यंबक नगर परिषदेची मुदत डिसेंबर २०२२ ला संपणार असली तरी निवडणुका मात्र नोव्हेंबर २०२२ लाच होतील. त्याप्रमाणे इच्छुकांनी आतापासूनच निवडणूक वाढविण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. निवडणुकीसाठी मात्र इच्छुकांची संख्या मोठी असणार आहे. त्यामुळे चुरस वाढणार आहे.

शहरातील लोकसंख्यानुसार अनु.जाती १, अनु.जमाती ६ व ओबीसी (नागरिकांचा मागास प्रवर्ग) २ असे नऊ आरक्षित सदस्य झाल्यानंतर उर्वरित आठ जागांवर सर्वसाधारण (जनरल) गटातून निवडणुका लढवल्या जातील. त्यातही महिलांना पन्नास टक्के आरक्षणानुसार महिलांची संख्या आठ राहणार आहे. अर्थात ही संख्या मागच्या वर्षी नऊ होती, ती या पंचवार्षिकमध्ये आठ होणार आहे. अनु.जातीमध्ये मागच्या पंचवार्षिकला महिला आरक्षित होती. या वेळेस मात्र पुरुष किंवा महिला कोणीही निवडणूक लढवू शकतात.

पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण नसल्यामुळे नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी केवळ दोनच जागा असणार आहेत. त्यामुळे आता जनरल जागांवर रस्सीखेच होणार आहे. सन २०२७-२८ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा असल्याने सिंहस्थ नियोजन सन २०२२ मध्ये निवडून येणाऱ्या बाॅडीलाच करावे लागणार असल्याने अनेक इच्छुकांची निवडणूक लढविण्यासाठी भाऊगर्दी होणार आहे. सिंहस्थाचे तीनही पर्वकाल २०२७ मध्येच होतील, तर त्या वेळच्या कौन्सिलची मुदतही डिसेंबर २०२७ लाच संपणार आहे.