शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
2
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
3
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
4
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
5
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
6
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
7
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
8
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
9
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
10
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
11
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
12
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
13
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
14
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
15
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
16
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
17
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
18
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
19
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
20
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान

त्र्यंबकेश्वरी रोडरोमिओंचा उपद्रव

By admin | Updated: July 23, 2014 00:29 IST

बंदोबस्ताची मागणी : विद्यार्थिनी त्रस्त

त्र्यंबकेश्वर : येथील शाळा-महाविद्यालय सुटण्याच्या वेळेस बाहेर उभे राहून मुलींची छेडछाड करणे आदि गैरप्रकार करणाऱ्या रोडरोमिओंचा सुळसुळाट वाढला असून, त्यांच्या त्रासाला कंटाळून मुली त्रस्त झाल्याने त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.विशेष म्हणजे पालक पोलिसांकडे जाऊन तक्रार करायला देण्याची हिंमत करीत नाही. उलट निमूटपणे हा त्रास सहन करीत असतात. त्र्यंबकमध्ये आठवीनंतरच्या मुली, महाविद्यालयीन विद्यार्थिनी, मैत्रिणींच्या घोळक्यांसह शाळेत जात असल्या किंवा शाळा सुटल्यानंतर रस्त्याने ये-जा करतात. परीक्षेच्या वेळी मुलींना कॉप्या पुरविणे वगैरे करून मदत करण्यासाठी आतूर राहतात. जेणेकरून त्यांना इम्पे्रशन मारण्याचा प्रयत्न करतात. अशी जेव्हा तक्रार (अर्थात आकस ठेवून तक्रारही नको) नागरिकांमध्ये होत असेल तर पोलिसांतर्फेच मुलींच्या जाण्या-येण्याच्या वेळी शाळाबाहेर उभे राहून अशा टवाळखोरांचा बंदोबस्त करू शकत नाही का? ट्रॅफिकला पाच पाच पोलीस तैनात करून पोलिसांना काय साध्य करायचे असते हाही प्रश्न गावात चर्चेचा विषय आहे. तक्रारदाराने तक्रार दिल्याशिवाय पोलीस कारवाई होऊ शकत नाही पण अशा तक्रारी येऊच नये यासाठी किमान दोन पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यास काय हरकत आहे असा गावात चर्चेचा विषय ठरला आहे. त्र्यंबक पोलिसांनी या सर्व गैरबाबीचा बंदोबस्त करावा अशी मागणी शहरात आहे. शाळा कॉलेजच्या प्राचार्य-प्राध्यापकांनी देखील याबाबत पोलिसांना पत्र द्यावे, नव्हे तसे पत्र यापूर्वी देखील दिल्याचे शाळांकडून सांगितले गेले.(वार्ताहर)