शहरं
Join us  
Trending Stories
1
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
2
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
3
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
4
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
5
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
6
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
7
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
8
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
10
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
11
अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?
12
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
13
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
14
Monolithisch India IPO Listing: ६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
15
प्यार तूने क्या किया! बॉयफ्रेंडच्या घरात बसलेली बायको, संतापलेल्या नवऱ्याने घेतला नाकाचा चावा
16
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
17
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
18
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
19
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
20
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं

पेठ तालुक्यातील आदिवासी महिलांची गगनभरारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 01:28 IST

घरची आर्थिक परिस्थिती बेताची. त्यामुळे कुटुंबाचा आर्थिक गाडा ओढताना होणारी तारांबळ बघून घरच्या गृहिणींनी निसर्गाचा आधार घेत वनौषधीपासून निरगुडी तेल तयार करण्याचा संकल्प केला आणि अल्पावधीत पेठ तालुक्यातील उस्थळेपैकी भोये पाडा येथील दोन आदिवासी महिलांनी गगनभरारी घेतली.

ठळक मुद्देवनौषधी : उस्थळे येथे गुणकारी निरगुडीपासून तयार केले तेल !

रामदास शिंदे ।पेठ : घरची आर्थिक परिस्थिती बेताची. त्यामुळे कुटुंबाचा आर्थिक गाडा ओढताना होणारी तारांबळ बघून घरच्या गृहिणींनी निसर्गाचा आधार घेत वनौषधीपासून निरगुडी तेल तयार करण्याचा संकल्प केला आणि अल्पावधीत पेठ तालुक्यातील उस्थळेपैकी भोये पाडा येथील दोन आदिवासी महिलांनी गगनभरारी घेतली.जयवंती देवीदास भोये व जयवंता राजेंद्र हिरकुडे या दोघी उस्थळे (भोयेपाडा) ता. पेठ येथील रहिवाशी. शिक्षण जेमतेम माध्यमिकपर्यंत. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने केवळ चूल व मूल यात अडकून न बसता, निसर्गातील वनसंपत्तीचा योग्य वापर करून त्यांनी व्यवसाय सुरू करण्याचे ठरवले. जयवंता हिरकुडे यांचे वडील नारायण भुसारे पूर्वीपासून वनौषधीचे जाणकार होते. त्यांचाच वसा घेऊन या दोघींनी हा व्यवसाय पुढे आणला. भल्या पहाटे जंगलात जाऊन निरगुडी, निलगिरी, जास्वंद, तुळस, गवती चहा यांचा पाला जमा करून त्या घरीच कुटून त्याचे मिश्रण करतात. चुलीवर तापवून ऊर्ध्वपातन प्रक्रि येद्वारे त्याचे तेल तयार करण्यात येते. त्यात तिळतेल, कापूर आदी घटक योग्य प्रमाणात मिश्रित करून ५० व १०० मिलीच्या बाटल्यांमध्ये पॅकिंग केले जाते. हे तेल संपूर्ण नैसर्गिक पद्धतीने बनवले असल्याने त्याचा सांधेदुखी, पाठदुखी, हातापायांना सूज, पॅरालिसीस, डोकेदुखी आदीवर गुणकारी समजले जाते.विविध पुरस्कार प्राप्तच्आदिवासी महिलांची या गरु ड भरारीला मानदेशी फाउण्डेशनने सहकार्य करत त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे. च्नाशिकसह मुंबई, सातारा या ठिकाणी भरलेल्या प्रदर्शनात त्यांनी सहभाग घेतला असून, विविध पुरस्कार प्राप्त केले आहेत.च्दिवसभरातून जवळपास १५ ते २० लिटर निरगुडीचे गुणकारी तेल तयार करण्यात येत असून, पोलीसपाटील देवीदास भोये यांच्यासह कुटुंबातील व्यक्ती यांचे सहकार्य मिळत असल्याचे त्या दोघी सांगतात.आदिवासी महिलांनी केवळ मजुरीवर अवलंबून न राहता शेतीपूरक अशा जोड व्यवसायाकडे वळणे गरजेचे असून, नैसर्गिक साधन सामग्रीचा योग्य वापर केल्यास आदिवासी कुटुंबाची उन्नती होऊ शकेल.- जयवंती देवीदास भोये,भोयेपाडा (उस्थळे)

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स