शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

पेठ तालुक्यातील आदिवासी महिलांची गगनभरारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 01:28 IST

घरची आर्थिक परिस्थिती बेताची. त्यामुळे कुटुंबाचा आर्थिक गाडा ओढताना होणारी तारांबळ बघून घरच्या गृहिणींनी निसर्गाचा आधार घेत वनौषधीपासून निरगुडी तेल तयार करण्याचा संकल्प केला आणि अल्पावधीत पेठ तालुक्यातील उस्थळेपैकी भोये पाडा येथील दोन आदिवासी महिलांनी गगनभरारी घेतली.

ठळक मुद्देवनौषधी : उस्थळे येथे गुणकारी निरगुडीपासून तयार केले तेल !

रामदास शिंदे ।पेठ : घरची आर्थिक परिस्थिती बेताची. त्यामुळे कुटुंबाचा आर्थिक गाडा ओढताना होणारी तारांबळ बघून घरच्या गृहिणींनी निसर्गाचा आधार घेत वनौषधीपासून निरगुडी तेल तयार करण्याचा संकल्प केला आणि अल्पावधीत पेठ तालुक्यातील उस्थळेपैकी भोये पाडा येथील दोन आदिवासी महिलांनी गगनभरारी घेतली.जयवंती देवीदास भोये व जयवंता राजेंद्र हिरकुडे या दोघी उस्थळे (भोयेपाडा) ता. पेठ येथील रहिवाशी. शिक्षण जेमतेम माध्यमिकपर्यंत. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने केवळ चूल व मूल यात अडकून न बसता, निसर्गातील वनसंपत्तीचा योग्य वापर करून त्यांनी व्यवसाय सुरू करण्याचे ठरवले. जयवंता हिरकुडे यांचे वडील नारायण भुसारे पूर्वीपासून वनौषधीचे जाणकार होते. त्यांचाच वसा घेऊन या दोघींनी हा व्यवसाय पुढे आणला. भल्या पहाटे जंगलात जाऊन निरगुडी, निलगिरी, जास्वंद, तुळस, गवती चहा यांचा पाला जमा करून त्या घरीच कुटून त्याचे मिश्रण करतात. चुलीवर तापवून ऊर्ध्वपातन प्रक्रि येद्वारे त्याचे तेल तयार करण्यात येते. त्यात तिळतेल, कापूर आदी घटक योग्य प्रमाणात मिश्रित करून ५० व १०० मिलीच्या बाटल्यांमध्ये पॅकिंग केले जाते. हे तेल संपूर्ण नैसर्गिक पद्धतीने बनवले असल्याने त्याचा सांधेदुखी, पाठदुखी, हातापायांना सूज, पॅरालिसीस, डोकेदुखी आदीवर गुणकारी समजले जाते.विविध पुरस्कार प्राप्तच्आदिवासी महिलांची या गरु ड भरारीला मानदेशी फाउण्डेशनने सहकार्य करत त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे. च्नाशिकसह मुंबई, सातारा या ठिकाणी भरलेल्या प्रदर्शनात त्यांनी सहभाग घेतला असून, विविध पुरस्कार प्राप्त केले आहेत.च्दिवसभरातून जवळपास १५ ते २० लिटर निरगुडीचे गुणकारी तेल तयार करण्यात येत असून, पोलीसपाटील देवीदास भोये यांच्यासह कुटुंबातील व्यक्ती यांचे सहकार्य मिळत असल्याचे त्या दोघी सांगतात.आदिवासी महिलांनी केवळ मजुरीवर अवलंबून न राहता शेतीपूरक अशा जोड व्यवसायाकडे वळणे गरजेचे असून, नैसर्गिक साधन सामग्रीचा योग्य वापर केल्यास आदिवासी कुटुंबाची उन्नती होऊ शकेल.- जयवंती देवीदास भोये,भोयेपाडा (उस्थळे)

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स