शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
2
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
3
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
4
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
5
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
6
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
7
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
8
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
9
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
10
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
11
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
12
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
13
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
14
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
15
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
16
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
17
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
18
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
19
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
20
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...

नद्यांच्या उगमस्थानातील आदिवासी गावेच पाण्यासाठी व्याकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:14 IST

नितीन बोरसे, सटाणा : सह्याद्रीच्या पर्वतरांगा ...गड-किल्ले आणि त्यावरील निसर्गसंपदा या निसर्गसौंदर्याने नटलेल्या बागलाणच्या पश्चिमेकडील डोंगर-दर्‍यांमधील आदिवासी परिसर मोसम ...

नितीन बोरसे, सटाणा : सह्याद्रीच्या पर्वतरांगा ...गड-किल्ले आणि त्यावरील निसर्गसंपदा या निसर्गसौंदर्याने नटलेल्या बागलाणच्या पश्चिमेकडील डोंगर-दर्‍यांमधील आदिवासी परिसर मोसम आणि आरम या दोन प्रमुख नद्यांसोबतच कळवणमधील पुनंद नदी यांचे उगमस्थान आहे. मात्र तीन तालुक्यांची तहान भागविणारा उगम परिसर उन्हाळ्यात पाण्यासाठी नेहमीच व्याकूळलेला असतो. त्यामुळे या आदिवासी गावांची तहान भागविण्यासाठी ठोस पाणीपुरवठा योजनांची गरज आहे .

बागलाण तालुक्यात सलग दोन वर्षांपासून पाऊस चांगल्या प्रमाणात बरसल्यामुळे पिण्याच्या पाण्यासह शेतीला आज तरी मुबलक प्रमाणात पाणी आहे. तालुक्यातील मोसम, आरम आणि कळवणकडे जाणारी पुनंद अशा तीन मोठ्या नद्यांचे उगमस्थान एतिहासिक किल्ला साल्हेर आहे. याच नद्यांवर अनुक्रमे हरणबारी, केळझर आणि पुनंद या तीन मध्यम प्रकल्पांची उभारणी केली आहे. गेल्या दोन वर्षांपासून हे तिन्ही प्रकल्प ऑगस्ट महिन्यातच ओव्हर फ्लो झाल्यामुळे लाभक्षेत्रात यंदा मुबलक प्रमाणात पाणी आहे. आजच्या घडीला ११६६ दशलक्ष घनफूट क्षमतेच्या हरणबारी धरणात ६५० दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक आहे. ५७२ दशलक्ष घनफूट पाण्याची क्षमता असलेल्या केळझर धरणात २१६ दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे साहजिकच पाणीटंचाईची ओरड नसल्यासारखी दिसून येते. असे असले तरी बागलाणसह मालेगाव, कळवणची तहान भागविणार्‍या साल्हेर परिसरातील २२ वाड्या-पाड्यांची परिस्थिती या उलट आहे. या भागातील साल्हेरसह आठ पाडे साळवण, घुळमाळ, मानूरचे बारा पाडे येथे आजही फेब्रुवारी महिन्यात पाणीटंचाई डोके वर काढते. या भागातील सुमारे ७५ रहिवासी मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात . एकीकडे पाणीटंचाई, दुसरीकडे मजुरीला केल्याशिवाय पोटाची खळगी कशी भरणार, या विवंचनेत या भागातील आदिवासी आहेत. त्यामुळे मजुरी आणि पाणीटंचाई या दुहेरी संकटावर मात करण्यासाठी येथील आदिवासी कुटुंबे देशी भागात स्थलांतरित होत आहेत. त्यामुळे या भागातील पाणी संकट दूर करण्यासाठी केळझर अथवा हरणबारी धरणातून ठोस पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करणे काळाची गरज आहे.

-------------

सटाणेकरांना मिळणार पाणी

सटाणा शहरासाठी पुनंद प्रकल्पातून स्वतंत्र पाणीपुरवठा योजना मजूर करण्यात आली आहे. त्याचे काम पूर्णत्वास आले आहे. शहरांतर्गत जलवाहिन्या टाकण्याचे कामदेखील अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे येत्या आठवड्यात योजनेची चाचणी घेऊन १ मे महाराष्ट्रदिनी शहराला पूर्ण क्षमतेने पाणी मिळणार आहे. आज जरी ही योजना कार्यान्वित नसली तरी ठेंगोडा पाणीपुरवठा योजना शहराची तहान भागवत असल्यामुळे पाणीटंचाई आज तरी भासत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.

--------------------

टंचाई ग्रस्त गावे

तालुक्यातील कातरवेल, रातीर, राहुड, वघानेपाडा, दोधनपाडा, चिराई या गावांना पाणीटंचाई ही पाचवीला पूजलेली आहे. तालुक्यात पाणीटंचाईचे डोके येथूनच वर निघत असते. फेब्रुवारी, मार्च महिन्यात टँकर मागणीला सुरुवात होते. आजच्या घडीला या गावांनी टँकर मागणीचे प्रस्ताव प्रांताधिकाऱ्यांकडे सादर केले असून, दोन दिवसांत त्याला मंजुरी मिळून टँकर सुरू करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

-----------------

टँकरग्रस्त गावे -६,

एकूण हातपंप ६२२ , सुरू ६२०, बंद २

-----------------------

बागलाण तालुक्यातील प्रमुख नद्यांचे उगमस्थान असलेल्या साल्हेर परिसरात तीव्र पाणीटंचाई असून, महिलांना पाण्यासाठी अशी कसरत करावी लागत आहे. (१९ सटाणा १/२)

===Photopath===

190421\19nsk_11_19042021_13.jpg

===Caption===

१९ सटाणा १/२