शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
4
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
5
'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
6
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
8
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
9
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
10
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
11
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
12
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
13
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
14
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
15
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
16
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
17
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
18
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
19
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
20
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी

नद्यांच्या उगमस्थानातील आदिवासी गावेच पाण्यासाठी व्याकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:14 IST

नितीन बोरसे, सटाणा : सह्याद्रीच्या पर्वतरांगा ...गड-किल्ले आणि त्यावरील निसर्गसंपदा या निसर्गसौंदर्याने नटलेल्या बागलाणच्या पश्चिमेकडील डोंगर-दर्‍यांमधील आदिवासी परिसर मोसम ...

नितीन बोरसे, सटाणा : सह्याद्रीच्या पर्वतरांगा ...गड-किल्ले आणि त्यावरील निसर्गसंपदा या निसर्गसौंदर्याने नटलेल्या बागलाणच्या पश्चिमेकडील डोंगर-दर्‍यांमधील आदिवासी परिसर मोसम आणि आरम या दोन प्रमुख नद्यांसोबतच कळवणमधील पुनंद नदी यांचे उगमस्थान आहे. मात्र तीन तालुक्यांची तहान भागविणारा उगम परिसर उन्हाळ्यात पाण्यासाठी नेहमीच व्याकूळलेला असतो. त्यामुळे या आदिवासी गावांची तहान भागविण्यासाठी ठोस पाणीपुरवठा योजनांची गरज आहे .

बागलाण तालुक्यात सलग दोन वर्षांपासून पाऊस चांगल्या प्रमाणात बरसल्यामुळे पिण्याच्या पाण्यासह शेतीला आज तरी मुबलक प्रमाणात पाणी आहे. तालुक्यातील मोसम, आरम आणि कळवणकडे जाणारी पुनंद अशा तीन मोठ्या नद्यांचे उगमस्थान एतिहासिक किल्ला साल्हेर आहे. याच नद्यांवर अनुक्रमे हरणबारी, केळझर आणि पुनंद या तीन मध्यम प्रकल्पांची उभारणी केली आहे. गेल्या दोन वर्षांपासून हे तिन्ही प्रकल्प ऑगस्ट महिन्यातच ओव्हर फ्लो झाल्यामुळे लाभक्षेत्रात यंदा मुबलक प्रमाणात पाणी आहे. आजच्या घडीला ११६६ दशलक्ष घनफूट क्षमतेच्या हरणबारी धरणात ६५० दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक आहे. ५७२ दशलक्ष घनफूट पाण्याची क्षमता असलेल्या केळझर धरणात २१६ दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे साहजिकच पाणीटंचाईची ओरड नसल्यासारखी दिसून येते. असे असले तरी बागलाणसह मालेगाव, कळवणची तहान भागविणार्‍या साल्हेर परिसरातील २२ वाड्या-पाड्यांची परिस्थिती या उलट आहे. या भागातील साल्हेरसह आठ पाडे साळवण, घुळमाळ, मानूरचे बारा पाडे येथे आजही फेब्रुवारी महिन्यात पाणीटंचाई डोके वर काढते. या भागातील सुमारे ७५ रहिवासी मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात . एकीकडे पाणीटंचाई, दुसरीकडे मजुरीला केल्याशिवाय पोटाची खळगी कशी भरणार, या विवंचनेत या भागातील आदिवासी आहेत. त्यामुळे मजुरी आणि पाणीटंचाई या दुहेरी संकटावर मात करण्यासाठी येथील आदिवासी कुटुंबे देशी भागात स्थलांतरित होत आहेत. त्यामुळे या भागातील पाणी संकट दूर करण्यासाठी केळझर अथवा हरणबारी धरणातून ठोस पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करणे काळाची गरज आहे.

-------------

सटाणेकरांना मिळणार पाणी

सटाणा शहरासाठी पुनंद प्रकल्पातून स्वतंत्र पाणीपुरवठा योजना मजूर करण्यात आली आहे. त्याचे काम पूर्णत्वास आले आहे. शहरांतर्गत जलवाहिन्या टाकण्याचे कामदेखील अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे येत्या आठवड्यात योजनेची चाचणी घेऊन १ मे महाराष्ट्रदिनी शहराला पूर्ण क्षमतेने पाणी मिळणार आहे. आज जरी ही योजना कार्यान्वित नसली तरी ठेंगोडा पाणीपुरवठा योजना शहराची तहान भागवत असल्यामुळे पाणीटंचाई आज तरी भासत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.

--------------------

टंचाई ग्रस्त गावे

तालुक्यातील कातरवेल, रातीर, राहुड, वघानेपाडा, दोधनपाडा, चिराई या गावांना पाणीटंचाई ही पाचवीला पूजलेली आहे. तालुक्यात पाणीटंचाईचे डोके येथूनच वर निघत असते. फेब्रुवारी, मार्च महिन्यात टँकर मागणीला सुरुवात होते. आजच्या घडीला या गावांनी टँकर मागणीचे प्रस्ताव प्रांताधिकाऱ्यांकडे सादर केले असून, दोन दिवसांत त्याला मंजुरी मिळून टँकर सुरू करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

-----------------

टँकरग्रस्त गावे -६,

एकूण हातपंप ६२२ , सुरू ६२०, बंद २

-----------------------

बागलाण तालुक्यातील प्रमुख नद्यांचे उगमस्थान असलेल्या साल्हेर परिसरात तीव्र पाणीटंचाई असून, महिलांना पाण्यासाठी अशी कसरत करावी लागत आहे. (१९ सटाणा १/२)

===Photopath===

190421\19nsk_11_19042021_13.jpg

===Caption===

१९ सटाणा १/२