शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

नद्यांच्या उगमस्थानातील आदिवासी गावेच पाण्यासाठी व्याकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:14 IST

नितीन बोरसे, सटाणा : सह्याद्रीच्या पर्वतरांगा ...गड-किल्ले आणि त्यावरील निसर्गसंपदा या निसर्गसौंदर्याने नटलेल्या बागलाणच्या पश्चिमेकडील डोंगर-दर्‍यांमधील आदिवासी परिसर मोसम ...

नितीन बोरसे, सटाणा : सह्याद्रीच्या पर्वतरांगा ...गड-किल्ले आणि त्यावरील निसर्गसंपदा या निसर्गसौंदर्याने नटलेल्या बागलाणच्या पश्चिमेकडील डोंगर-दर्‍यांमधील आदिवासी परिसर मोसम आणि आरम या दोन प्रमुख नद्यांसोबतच कळवणमधील पुनंद नदी यांचे उगमस्थान आहे. मात्र तीन तालुक्यांची तहान भागविणारा उगम परिसर उन्हाळ्यात पाण्यासाठी नेहमीच व्याकूळलेला असतो. त्यामुळे या आदिवासी गावांची तहान भागविण्यासाठी ठोस पाणीपुरवठा योजनांची गरज आहे .

बागलाण तालुक्यात सलग दोन वर्षांपासून पाऊस चांगल्या प्रमाणात बरसल्यामुळे पिण्याच्या पाण्यासह शेतीला आज तरी मुबलक प्रमाणात पाणी आहे. तालुक्यातील मोसम, आरम आणि कळवणकडे जाणारी पुनंद अशा तीन मोठ्या नद्यांचे उगमस्थान एतिहासिक किल्ला साल्हेर आहे. याच नद्यांवर अनुक्रमे हरणबारी, केळझर आणि पुनंद या तीन मध्यम प्रकल्पांची उभारणी केली आहे. गेल्या दोन वर्षांपासून हे तिन्ही प्रकल्प ऑगस्ट महिन्यातच ओव्हर फ्लो झाल्यामुळे लाभक्षेत्रात यंदा मुबलक प्रमाणात पाणी आहे. आजच्या घडीला ११६६ दशलक्ष घनफूट क्षमतेच्या हरणबारी धरणात ६५० दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक आहे. ५७२ दशलक्ष घनफूट पाण्याची क्षमता असलेल्या केळझर धरणात २१६ दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे साहजिकच पाणीटंचाईची ओरड नसल्यासारखी दिसून येते. असे असले तरी बागलाणसह मालेगाव, कळवणची तहान भागविणार्‍या साल्हेर परिसरातील २२ वाड्या-पाड्यांची परिस्थिती या उलट आहे. या भागातील साल्हेरसह आठ पाडे साळवण, घुळमाळ, मानूरचे बारा पाडे येथे आजही फेब्रुवारी महिन्यात पाणीटंचाई डोके वर काढते. या भागातील सुमारे ७५ रहिवासी मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात . एकीकडे पाणीटंचाई, दुसरीकडे मजुरीला केल्याशिवाय पोटाची खळगी कशी भरणार, या विवंचनेत या भागातील आदिवासी आहेत. त्यामुळे मजुरी आणि पाणीटंचाई या दुहेरी संकटावर मात करण्यासाठी येथील आदिवासी कुटुंबे देशी भागात स्थलांतरित होत आहेत. त्यामुळे या भागातील पाणी संकट दूर करण्यासाठी केळझर अथवा हरणबारी धरणातून ठोस पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करणे काळाची गरज आहे.

-------------

सटाणेकरांना मिळणार पाणी

सटाणा शहरासाठी पुनंद प्रकल्पातून स्वतंत्र पाणीपुरवठा योजना मजूर करण्यात आली आहे. त्याचे काम पूर्णत्वास आले आहे. शहरांतर्गत जलवाहिन्या टाकण्याचे कामदेखील अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे येत्या आठवड्यात योजनेची चाचणी घेऊन १ मे महाराष्ट्रदिनी शहराला पूर्ण क्षमतेने पाणी मिळणार आहे. आज जरी ही योजना कार्यान्वित नसली तरी ठेंगोडा पाणीपुरवठा योजना शहराची तहान भागवत असल्यामुळे पाणीटंचाई आज तरी भासत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.

--------------------

टंचाई ग्रस्त गावे

तालुक्यातील कातरवेल, रातीर, राहुड, वघानेपाडा, दोधनपाडा, चिराई या गावांना पाणीटंचाई ही पाचवीला पूजलेली आहे. तालुक्यात पाणीटंचाईचे डोके येथूनच वर निघत असते. फेब्रुवारी, मार्च महिन्यात टँकर मागणीला सुरुवात होते. आजच्या घडीला या गावांनी टँकर मागणीचे प्रस्ताव प्रांताधिकाऱ्यांकडे सादर केले असून, दोन दिवसांत त्याला मंजुरी मिळून टँकर सुरू करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

-----------------

टँकरग्रस्त गावे -६,

एकूण हातपंप ६२२ , सुरू ६२०, बंद २

-----------------------

बागलाण तालुक्यातील प्रमुख नद्यांचे उगमस्थान असलेल्या साल्हेर परिसरात तीव्र पाणीटंचाई असून, महिलांना पाण्यासाठी अशी कसरत करावी लागत आहे. (१९ सटाणा १/२)

===Photopath===

190421\19nsk_11_19042021_13.jpg

===Caption===

१९ सटाणा १/२