शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
2
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
3
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
4
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
5
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
6
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
7
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
8
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
9
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
10
Christmas Sale 2025: स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
11
युती होताच दाखवलं शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतरच पहिलं भाषण; भाजपनं राज ठाकरेंना डिवचलं
12
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
13
नोकरी गेली तरी भीती नाही, तुमच्या कर्जाचा हप्ता आता विमा कंपनी भरेल; नक्की काय आहे प्रकरण?
14
उल्हासनगरात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांचा भाजपात प्रवेश
15
"आमचा हिंदुत्ववाद केवळ पूजापद्धतीवर आधारित नाही तर..."; CM फडणवीसांनी ठाकरे बंधूंना सुनावलं
16
मेष वार्षिक राशिभविष्य २०२६: 'आत्मिक शांती' आणि प्रगतीचे वर्ष; आव्हाने पेलून गाठता येणार यशाचे शिखर!
17
प्राजक्ताच्या स्वप्नातील राजकुमार आहे तरी कसा? लग्नासाठी तिची एकच अट; सिंगल राहण्यामागचं खरं कारण समोर
18
जालना महापालिकेत भाजपानं युती न केल्यास सर्व पर्याय खुले; शिंदेसेनेचे आमदार खोतकरांचा इशारा
19
Vijay Hazare Trophy : हिटमॅनचा हिट शो जारी! मुंबईच्या संघाकडून खेळण्यासाठी मैदानात उतरला अन्...
20
३१ डिसेंबरला उघडणार या वर्षाचा अखेरचा आयपीओ; प्राईज बँड ₹९०, पाहा GMP सह अनेक डिटेल्स
Daily Top 2Weekly Top 5

नद्यांच्या उगमस्थानातील आदिवासी गावेच पाण्यासाठी व्याकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:14 IST

नितीन बोरसे, सटाणा : सह्याद्रीच्या पर्वतरांगा ...गड-किल्ले आणि त्यावरील निसर्गसंपदा या निसर्गसौंदर्याने नटलेल्या बागलाणच्या पश्चिमेकडील डोंगर-दर्‍यांमधील आदिवासी परिसर मोसम ...

नितीन बोरसे, सटाणा : सह्याद्रीच्या पर्वतरांगा ...गड-किल्ले आणि त्यावरील निसर्गसंपदा या निसर्गसौंदर्याने नटलेल्या बागलाणच्या पश्चिमेकडील डोंगर-दर्‍यांमधील आदिवासी परिसर मोसम आणि आरम या दोन प्रमुख नद्यांसोबतच कळवणमधील पुनंद नदी यांचे उगमस्थान आहे. मात्र तीन तालुक्यांची तहान भागविणारा उगम परिसर उन्हाळ्यात पाण्यासाठी नेहमीच व्याकूळलेला असतो. त्यामुळे या आदिवासी गावांची तहान भागविण्यासाठी ठोस पाणीपुरवठा योजनांची गरज आहे .

बागलाण तालुक्यात सलग दोन वर्षांपासून पाऊस चांगल्या प्रमाणात बरसल्यामुळे पिण्याच्या पाण्यासह शेतीला आज तरी मुबलक प्रमाणात पाणी आहे. तालुक्यातील मोसम, आरम आणि कळवणकडे जाणारी पुनंद अशा तीन मोठ्या नद्यांचे उगमस्थान एतिहासिक किल्ला साल्हेर आहे. याच नद्यांवर अनुक्रमे हरणबारी, केळझर आणि पुनंद या तीन मध्यम प्रकल्पांची उभारणी केली आहे. गेल्या दोन वर्षांपासून हे तिन्ही प्रकल्प ऑगस्ट महिन्यातच ओव्हर फ्लो झाल्यामुळे लाभक्षेत्रात यंदा मुबलक प्रमाणात पाणी आहे. आजच्या घडीला ११६६ दशलक्ष घनफूट क्षमतेच्या हरणबारी धरणात ६५० दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक आहे. ५७२ दशलक्ष घनफूट पाण्याची क्षमता असलेल्या केळझर धरणात २१६ दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे साहजिकच पाणीटंचाईची ओरड नसल्यासारखी दिसून येते. असे असले तरी बागलाणसह मालेगाव, कळवणची तहान भागविणार्‍या साल्हेर परिसरातील २२ वाड्या-पाड्यांची परिस्थिती या उलट आहे. या भागातील साल्हेरसह आठ पाडे साळवण, घुळमाळ, मानूरचे बारा पाडे येथे आजही फेब्रुवारी महिन्यात पाणीटंचाई डोके वर काढते. या भागातील सुमारे ७५ रहिवासी मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात . एकीकडे पाणीटंचाई, दुसरीकडे मजुरीला केल्याशिवाय पोटाची खळगी कशी भरणार, या विवंचनेत या भागातील आदिवासी आहेत. त्यामुळे मजुरी आणि पाणीटंचाई या दुहेरी संकटावर मात करण्यासाठी येथील आदिवासी कुटुंबे देशी भागात स्थलांतरित होत आहेत. त्यामुळे या भागातील पाणी संकट दूर करण्यासाठी केळझर अथवा हरणबारी धरणातून ठोस पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करणे काळाची गरज आहे.

-------------

सटाणेकरांना मिळणार पाणी

सटाणा शहरासाठी पुनंद प्रकल्पातून स्वतंत्र पाणीपुरवठा योजना मजूर करण्यात आली आहे. त्याचे काम पूर्णत्वास आले आहे. शहरांतर्गत जलवाहिन्या टाकण्याचे कामदेखील अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे येत्या आठवड्यात योजनेची चाचणी घेऊन १ मे महाराष्ट्रदिनी शहराला पूर्ण क्षमतेने पाणी मिळणार आहे. आज जरी ही योजना कार्यान्वित नसली तरी ठेंगोडा पाणीपुरवठा योजना शहराची तहान भागवत असल्यामुळे पाणीटंचाई आज तरी भासत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.

--------------------

टंचाई ग्रस्त गावे

तालुक्यातील कातरवेल, रातीर, राहुड, वघानेपाडा, दोधनपाडा, चिराई या गावांना पाणीटंचाई ही पाचवीला पूजलेली आहे. तालुक्यात पाणीटंचाईचे डोके येथूनच वर निघत असते. फेब्रुवारी, मार्च महिन्यात टँकर मागणीला सुरुवात होते. आजच्या घडीला या गावांनी टँकर मागणीचे प्रस्ताव प्रांताधिकाऱ्यांकडे सादर केले असून, दोन दिवसांत त्याला मंजुरी मिळून टँकर सुरू करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

-----------------

टँकरग्रस्त गावे -६,

एकूण हातपंप ६२२ , सुरू ६२०, बंद २

-----------------------

बागलाण तालुक्यातील प्रमुख नद्यांचे उगमस्थान असलेल्या साल्हेर परिसरात तीव्र पाणीटंचाई असून, महिलांना पाण्यासाठी अशी कसरत करावी लागत आहे. (१९ सटाणा १/२)

===Photopath===

190421\19nsk_11_19042021_13.jpg

===Caption===

१९ सटाणा १/२