शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी विद्यार्थ्यांचा हरवला ‘आधार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 00:10 IST

आदिवासी विकास विभागातील विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या वतीने आधार कार्ड नोंदणी सुरू करण्याचे आदेश दिलेले असतानाही आदिवासी आश्रमशाळांच्या नावाने सुरू झालेली केंद्रे गावात स्थलांतरित करण्यात आली आणि आता तर आधार अपडेटसाठीची यंत्रणाच नसल्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ लागली आहे.

ठळक मुद्देयोजना कागदावरच अनेक योजनांची निव्वळ घोषणा; विद्यार्थ्यांची गैरसोय

नाशिक : आदिवासी विकास विभागातील विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या वतीने आधार कार्ड नोंदणी सुरू करण्याचे आदेश दिलेले असतानाही आदिवासी आश्रमशाळांच्या नावाने सुरू झालेली केंद्रे गावात स्थलांतरित करण्यात आली आणि आता तर आधार अपडेटसाठीची यंत्रणाच नसल्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ लागली आहे.विद्यार्थ्यांसाठीच्या अनेक शैक्षणिक योजनांसाठी आधारकार्ड महत्त्वाचे असल्याने शासकीय आणि अनुदानित आश्रमशाळा, शासकीय वसतिगृहे येथे विद्यार्थ्यांसाठी आधारकार्ड नोंदणीची व्यवस्था करण्याचे आदेश आदिवासी विभागाने मागीलवर्षीच दिले होते. मात्र बहुतांश आश्रमशाळांमधील आधारकार्ड नोंदणी केंद्रे ही गावातील महत्त्वाच्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांची वणवण झाली. बहुतांश पालक आणि विद्यार्थ्यांनी रांगेत उभे राहून आधारकार्ड मिळविले, परंतु आश्रमशाळांमधून आधारकार्ड काढणाऱ्यांची संख्या अत्यंत कमी आहे. आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात यावी, आधारकार्ड नोंदणी, जातीचे दाखले आणि वैधता प्रमाणपत्रांसाठीचे शिबिरे घेऊन विद्यार्थ्यांना दस्ताऐवजांची माहिती देण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात आला मात्र प्रत्यक्षात आधारकेंद्रे ही गावातच राहिली तर वैधता प्रमाणपत्राची परवड कमी होताना दिसत नाही.आता तर आधारकार्ड अपटेडसाठी आश्रमशाळांमध्ये सुविधाच नसल्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शासकीय कार्यालये, टपाल कार्यालयांमध्ये आधार अपडेटची व्यवस्था करण्यात आली असली तरी शासकीय आश्रमशाळा आणि वसतिगृहे असल्याने तेथेही आधार अपडेटची व्यवस्था असावी, अशी मागणी सातत्याने करूनही आश्रमशाळा आणि वसतिगृहासाठीचे केंद्रे गुंडाळण्यात आल्याचा आरोप विद्यार्थी संघटना करीत आहेत. आदिवासी उपाययोजना क्षेत्र व बिगर आदिवासी उपाययोजना क्षेत्र यामध्ये राबविण्यात येणाºया योजनांची माहितीपर सत्रांचे आयोजन करावे, यामध्ये रोजगार संधी, शेती विषयक योजना, आरोग्य व पोषक विषयक योजनांची माहिती, वन उत्पादने व शेतीमाल यावर आधारित उद्योगांची माहिती देण्याचे नियोजन आहे. प्रत्यक्षात असे कार्यक्रम होताना मात्र दिसत नाहीत.जात वैधता शिबिराची औपचारिकताआदिवासी विद्यार्थ्यांच्या जातवैधतेचा प्रश्न सर्वाधिक गंभीर आहे. त्यामुळे आदिवासी आश्रमशाळा आणि वसतिगृहांमध्येच जातवैधतेसाठीचे निकष आणि कागदपत्रांचे पुरावे यांची कार्यशाळा घेण्याचे आदेश आदिवासी विकास विभागाने दिलेले आहेत. मात्र अशी शिबिरे घेऊनही जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना कागदपत्रांची जमवाजमव आणि सुनावणीसाठी धावाधाव करावी लागते. आदिवासी विकास विभागात प्राप्त प्रकरणांमध्ये किमान ४० टक्के प्रकरणे ही सुनावणीच असतात. जर आदिवासी भागात शिबिरे घेऊनही अशी परिस्थिती असेल तर मग शिबिरांची औपचारिकता कशासाठी? असा प्रश्न विचारला जात आहे.

टॅग्स :Trible Development Schemeआदिवासी विकास योजनाNashikनाशिक