शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
3
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
4
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
6
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
7
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
8
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
9
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
10
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
11
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
12
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
13
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
14
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
15
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
16
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
17
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
18
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
19
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
20
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव

आदिवासी विद्यार्थ्यांचा हरवला ‘आधार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 00:10 IST

आदिवासी विकास विभागातील विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या वतीने आधार कार्ड नोंदणी सुरू करण्याचे आदेश दिलेले असतानाही आदिवासी आश्रमशाळांच्या नावाने सुरू झालेली केंद्रे गावात स्थलांतरित करण्यात आली आणि आता तर आधार अपडेटसाठीची यंत्रणाच नसल्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ लागली आहे.

ठळक मुद्देयोजना कागदावरच अनेक योजनांची निव्वळ घोषणा; विद्यार्थ्यांची गैरसोय

नाशिक : आदिवासी विकास विभागातील विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या वतीने आधार कार्ड नोंदणी सुरू करण्याचे आदेश दिलेले असतानाही आदिवासी आश्रमशाळांच्या नावाने सुरू झालेली केंद्रे गावात स्थलांतरित करण्यात आली आणि आता तर आधार अपडेटसाठीची यंत्रणाच नसल्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ लागली आहे.विद्यार्थ्यांसाठीच्या अनेक शैक्षणिक योजनांसाठी आधारकार्ड महत्त्वाचे असल्याने शासकीय आणि अनुदानित आश्रमशाळा, शासकीय वसतिगृहे येथे विद्यार्थ्यांसाठी आधारकार्ड नोंदणीची व्यवस्था करण्याचे आदेश आदिवासी विभागाने मागीलवर्षीच दिले होते. मात्र बहुतांश आश्रमशाळांमधील आधारकार्ड नोंदणी केंद्रे ही गावातील महत्त्वाच्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांची वणवण झाली. बहुतांश पालक आणि विद्यार्थ्यांनी रांगेत उभे राहून आधारकार्ड मिळविले, परंतु आश्रमशाळांमधून आधारकार्ड काढणाऱ्यांची संख्या अत्यंत कमी आहे. आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात यावी, आधारकार्ड नोंदणी, जातीचे दाखले आणि वैधता प्रमाणपत्रांसाठीचे शिबिरे घेऊन विद्यार्थ्यांना दस्ताऐवजांची माहिती देण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात आला मात्र प्रत्यक्षात आधारकेंद्रे ही गावातच राहिली तर वैधता प्रमाणपत्राची परवड कमी होताना दिसत नाही.आता तर आधारकार्ड अपटेडसाठी आश्रमशाळांमध्ये सुविधाच नसल्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शासकीय कार्यालये, टपाल कार्यालयांमध्ये आधार अपडेटची व्यवस्था करण्यात आली असली तरी शासकीय आश्रमशाळा आणि वसतिगृहे असल्याने तेथेही आधार अपडेटची व्यवस्था असावी, अशी मागणी सातत्याने करूनही आश्रमशाळा आणि वसतिगृहासाठीचे केंद्रे गुंडाळण्यात आल्याचा आरोप विद्यार्थी संघटना करीत आहेत. आदिवासी उपाययोजना क्षेत्र व बिगर आदिवासी उपाययोजना क्षेत्र यामध्ये राबविण्यात येणाºया योजनांची माहितीपर सत्रांचे आयोजन करावे, यामध्ये रोजगार संधी, शेती विषयक योजना, आरोग्य व पोषक विषयक योजनांची माहिती, वन उत्पादने व शेतीमाल यावर आधारित उद्योगांची माहिती देण्याचे नियोजन आहे. प्रत्यक्षात असे कार्यक्रम होताना मात्र दिसत नाहीत.जात वैधता शिबिराची औपचारिकताआदिवासी विद्यार्थ्यांच्या जातवैधतेचा प्रश्न सर्वाधिक गंभीर आहे. त्यामुळे आदिवासी आश्रमशाळा आणि वसतिगृहांमध्येच जातवैधतेसाठीचे निकष आणि कागदपत्रांचे पुरावे यांची कार्यशाळा घेण्याचे आदेश आदिवासी विकास विभागाने दिलेले आहेत. मात्र अशी शिबिरे घेऊनही जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना कागदपत्रांची जमवाजमव आणि सुनावणीसाठी धावाधाव करावी लागते. आदिवासी विकास विभागात प्राप्त प्रकरणांमध्ये किमान ४० टक्के प्रकरणे ही सुनावणीच असतात. जर आदिवासी भागात शिबिरे घेऊनही अशी परिस्थिती असेल तर मग शिबिरांची औपचारिकता कशासाठी? असा प्रश्न विचारला जात आहे.

टॅग्स :Trible Development Schemeआदिवासी विकास योजनाNashikनाशिक