शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

आदिवासींनी पाझर तलाव केला पुनर्जीवित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 05:06 IST

त्र्यंबकेश्वर तालुक्यात जुन्या जलसंवर्धन रचनेतील १९७०च्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर तयार केलेला तब्बल ४६ वर्षांपूर्वीचा पाझर तलाव लक्ष्मणपाड्याच्या आदिवासींनी पुनर्जीवित केला आहे.

- अझहर शेख नाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात जुन्या जलसंवर्धन रचनेतील १९७०च्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर तयार केलेला तब्बल ४६ वर्षांपूर्वीचा पाझर तलाव लक्ष्मणपाड्याच्या आदिवासींनी पुनर्जीवित केला आहे. त्यामुळे तीन पाड्यांवरील ९० कुटुंबांतील ३०० आदिवासी व २०० जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे.सर्वाधिक पाऊस होऊनही आॅक्टोबरनंतर या तालुक्यातील आदिवासी गावे, पाड्यांवर पिण्याच्या पाण्याची चणचण भासते. विहिरीदेखील तळ गाठतात. नदी-नाले, ओहोळ आटतात. त्यामुळे टँकरवर भिस्त असते. पहिने ग्रामपंचायतीच्या हद्दीतील लक्ष्मणपाडा शिवारातील डोंगरपायथ्याला असलेल्या पाझर तलाव पुनर्जीवित करण्यासाठी लक्ष्मणपाडा, जावईवाडी, दगडमाळ पाड्यांवरील आदिवासी एकत्र आले. यंत्रणेच्या उपलब्धतेसाठी शासकीय पातळीवरून प्रतिसाद मिळाला नाही. जलयुक्त शिवारांतर्गतही आदिवासी ग्रामस्थांचे गाºहाणे लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकाऱ्यांनी ऐकले नाही. गावकºयांनी श्रमदानाची तयारी केली आणि खोलीकरणाचे काम हाती घेतले. त्यांना ‘बॉश’ उद्योग समूहाची मदत व मार्गदर्शन मिळाले. कल्याणकारी कामांतर्गत कंपनीने यंत्रणा उपलब्ध करून देत तीनही पाड्यांवरील मनुष्यबळाचा वापर करत लोकसहभागातून मृत झालेल्या तलावाला पुनर्जीवित केले.>शेतीचे उत्पादन सुधारलेपाझर तलावाची दुरुस्ती व पुनर्जीवनाअगोदर मार्चपासून पावसाळ्यापर्यंत त्यामध्ये केवळ पाच ते सात फूट इतके पाणी नजरेस पडत होते. त्यामुळे जवळच्या एका विहिरीवर तीन गावांमधील ९० कुटुंबांची झुंबड उडत असल्याचे चित्र दिसत होते. मात्र हे चित्र बदलले असून, परिसरातील शेतीची उत्पादन क्षमताही सुधारली आहे.नाशिकमधील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आदिवासींनी एकत्र येत पाझर तलावाचे खोलीकरण केल्याने पाण्याच्या साठवणूकक्षमतेत झालेली वाढ. पाझर तलाव सध्या असा ओसंडून वाहत आहे.नाशिकमधील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पहिने ग्रामपंचायतीच्या हद्दीतील पाझर तलावाची खोलीकरणापूर्वी सुमारे दीड वर्षापूर्वी अशी अवस्था होती. त्यामुळे पाझर तलाव असून नसल्यासारखा झाला होता.

टॅग्स :Nashikनाशिक