शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

आदिवासी मजुरांची घरवापसी संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 23:35 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने संपूर्ण भारत १४ एप्रिलपर्यंत लॉकडाउन केल्यामुळे सर्वच व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळे रस्ते बंद झाल्याने आणि हाताला कामही न उरल्याने पेठ तालुक्यातील रोजगारासाठी स्थलांतरित झालेल्या शेकडो शेतमजुरांचा घरवापसीचा प्रश्न अवघड बनला आहे.

ठळक मुद्देकोरोना इफेक्ट : रस्ते बंद, शिधा संपला, हाताला काम नाही

पेठ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने संपूर्ण भारत १४ एप्रिलपर्यंत लॉकडाउन केल्यामुळे सर्वच व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळे रस्ते बंद झाल्याने आणि हाताला कामही न उरल्याने पेठ तालुक्यातील रोजगारासाठी स्थलांतरित झालेल्या शेकडो शेतमजुरांचा घरवापसीचा प्रश्न अवघड बनला आहे.मार्च महिना हा तसा द्राक्ष काढणीचा कालावधी असतो. याच काळात पेठ व सुरगाणा तालुक्यातील शेकडो शेतमजूर जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर रोजगारासाठी स्थलांतरित होत असतात. कोरोनाच्या प्रादुर्भावमुळे सर्वत्र संचारबंदी लागू झाल्याने आता या मजुरांनाही गावाकडची ओढ लागली आहे. हाताला काम नाही, सोबत आणलेला शिधाही संपला, शासन घराबाहेर पडू देत नाही, सर्व वाहतूक व्यवस्था ठप्प झाल्याने गावाकडे जावे तरी कसे या विवंचनेत मजूर सापडले आहेत. गत दोन दिवसापासून आपत्ती व्यवस्थापन कक्ष, पोलीस व प्रशासनाच्या मदतीने आदिवासी भागातील सामाजिक संस्था व कार्यकर्ते या शेतमजूरांना आधार देत असून शासकिय प्रक्रि या पुर्ण करून टप्याटप्याने मजूरांना गावाकडे पाठवले जात आहे. गिरणारे, गंगापूर, पाथर्डी परिसरात हरसूल व त्या भागातील शेतमजूरांनी वाहनाअभावी ३५ ते ४० कि.मी. अंतर पायपीट करत आपले घर गाठलेआहे.दरम्यान, पेठ तालुक्यातील मजुरीसाठी गेलेले काही लोक इतर भागात अडकलेले असू शकतात. तरी याबाबतीत काही माहिती मिळाल्यास ती तहसील कार्यालयास द्यावी, माहिती देताना त्यांचे मूळ गाव, किती लोक आहेत व नेमके कुठे आहेत त्याची माहिती द्यावी, असे आवाहन पेठ तालुक्याचे तहसीलदार, संदीप भोसले यांनी केले आहे.आदिवासी भागातील घरातील काम करण्यायोग्य जोडपी रोजगारासाठी स्थलांतरीत होत असतात. त्यांची शाळेतील व लहान मुले मात्र आजी आजोबा किंवा शेजाऱ्यांच्या भरवशावर गावीच राहतात. सध्या सर्वत्र कोरोना बाबत काळजी घेतली जात असतांना स्थलांतरीत झालेल्या आई वडिलांना गावी असलेल्या मुले व नातेवाईकांची काळजी वाटू लागली आहे. त्यामुळे कसेही करून गाव गाठण्यासाठी मजूर ताटकळत आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य