शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

वेठबिगारीच्या पाशातून आदिवासी कुटूंबाची सुटका !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2019 14:16 IST

त्र्यंबकेश्वर : वेठबिगारीच्या पाशात अडकलेल्या एका आदिवासी कुटूंबाची सुटका करण्यात श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांना यश मिळाले आहे. याप्रकरणी मोखाडा पोलीस ठाण्यात मालकाविरु द्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्र्यंबकेश्वर : वेठबिगारीच्या पाशात अडकलेल्या एका आदिवासी कुटूंबाची सुटका करण्यात श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांना यश मिळाले आहे. याप्रकरणी मोखाडा पोलीस ठाण्यात मालकाविरु द्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील बोट्याची वाडी या गावातील आदिवासी कुटुंबाला वेठबिगार म्हणून बंधक बनवलेल्या कुटुंबातील तीन लोकांना घरी पाठवले मात्र परत येण्याची अट घालून त्यांच्या १३ वर्षीय मुलीला बंधक बनवून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. श्रमजीवी संघटनेचे विवेक पंडित यांची या गावात झालेली अचानक भेट हा गंभीर प्रकार उघड होण्यास कारण ठरली. नंतर पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या कुटुंबाला वेठबिगारीच्या पाशातून मुक्त केले, याबाबत या कुटुंबाने मुक्त होताच मोखाडा पोलीस ठाणे गाठत तक्र ार दाखल केली आहे.मोहन भिका दिवे याने दिलेल्या फिर्यादीनुसार मोहन यांचे कुटुंब मोखाड्यात बोट्याची वाडी येथे राहतात. पूर्वी ते भिवंडीतील पडघ्याला वीटभट्टीवर कामासाठी जायचे. मागील गणपती उत्सवाच्या दरम्यान उल्हासनगर येथील योगेश वायले यांनी काम आहे म्हणून मोहन, त्याचे आई-वडील, गौरी (७ वर्षे) , बायडी (९वर्ष) आणि शैला (१३ वर्षे ) या बहिणींसोबत हे पूर्ण कुटुंब उल्हासनगर येथे नेले. तिथे वीटभट्टीजवळ एका खोलीत त्यांना ठेवले, विटांचे तुकडे भरणे, शेतातील काम, वीट भरायला - उतरवायला गाडीवर अशी अनेक कामे करून घेतली. सुट्या मजुराला ( रोजंदारीच्या) ४०० रूपये देणारा मालक या बंधक मजुरांना केवळ २०० व महिलेला १०० मजुरी देत होता. स्वत:कडे काम नसले की बाहेर कामाला पाठवून तिकडून येणाºया मजुरीच्या पन्नास टक्के रक्कम मालक घेत असे.दिवाळीमध्ये या लोकांनी घरी जायचे सांगितले तर मालकाने त्यांना विरोध केला. मग तेरा वर्षीय शैला हिला बंधक बनवून ठेवले व हे कुटुंब परत यावे म्हणून शैलाला ताब्यात ठेवतो असे सांगत एक रु पया दिला नाही. जवळ वाचलेले हजार रु पये घेऊन कसेबसे हे कुटुंब मोखाड्यात पोहचले. मुलगी मालकाकडे बंधक, खिशात दमडी नाही अशा स्थितीत या कुटुंबाची दिवाळी अंधारात गेली. घरी शासकीय योजनेतून घरकुल आलेले असल्याने मोहनचे वडील घरीच थांबले. गावातील कुणाकडून तरी वडिलांनी ५०० रूपये उसनवारी घेऊन मोहनच्या वडिलांनी म्हणजे भिका दिवे यांनी मोहन, त्याची आई आणि तीन बहिणींसोबत त्यांना पुन्हा उल्हासनगर येथे पाठविले. कारण आपली छोटी मुलगी तिकडेच मालकाकडे होती.परत गेल्यावर मोहन आणि कुटुंबाने कच्या विटा एकावर एक रचून झोपडे बनवून राहायची व्यवस्था केली. त्यानंतर योगेश आणि त्याचा भाऊ राजू यांच्याकडे किंवा बाहेर मजुरीचे काम करावे लागेल, बाहेर मिळालेल्या ३०० रूपये मजुरीतून १०० रु पये द्यायचा कधी ते ही देत नसे, राजू हा गौरीला मारहाण करायचा शिवीगाळ करायचा. काम झाल्यावर मजुरांना पाय धरायला लावायचा, मोहनची आई आणि बहिणींना देखील अनेकदा पाय धरायला लावायचा मग हजेरी लिहायचा. त्रास वाढत चाललेला, पळून जावे वाटायचे मात्र शेठच्या भीतीने निमूट काम करत राहण्याशिवाय पर्याय नव्हता. याबाबत मोहनने वडील भिका दिवे यांना याबाबत फोन करून सांगितलेले. शेवटी त्याने गावात याबाबत माहिती दिली. ही बाब श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांना कळताच त्यांनी तातडीने या कुटुंबाला मुक्त करण्यासाठी कार्यकर्त्यांना सूचना दिल्या. मोखाड्यातुन पांडू मालक, गणेश माळी, उल्हास भानुशाली यांच्यासह राजेश चन्ने, वासू वाघे इत्यादी कल्याण अंबरनाथमधील कार्यकर्त्यांनी हिल लाईन पोलीस ठाणे गाठले. नुकत्याच झालेल्या निवडणुकी दरम्यान विवेक पंडित यांचे या गावात जाणे येणे सुरु होते. पंडित यांनी लक्ष घालत सदर कुटूंबाची सुटका केली.

टॅग्स :Nashikनाशिक