शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
2
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
3
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
4
अमेरिकेत महागाईचा भडका; टॅरिफमुळे भारतीय वस्तूंवर लावलेले ५०% आयात शुल्क ग्राहकांना भोवणार
5
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
6
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
7
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!
8
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
9
उत्तरकाशीच्या धरालीत १००हून अधिक लोक बेपत्ता; ४०० जणांना वाचवले, ३०० यात्रेकरू सुरक्षित
10
कबुतरखान्यात दाणे टाकण्यावर हायकोर्टाची बंदी कायम, हटविण्यास उच्च न्यायालयाचा नकार
11
न्या. वर्मा यांचे वर्तन विश्वासार्ह नाही; महाभियोगाची शिफारस रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार 
12
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
13
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
14
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
15
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
16
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
17
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
18
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
19
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
20
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...

वेठबिगारीच्या पाशातून आदिवासी कुटूंबाची सुटका !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2019 14:16 IST

त्र्यंबकेश्वर : वेठबिगारीच्या पाशात अडकलेल्या एका आदिवासी कुटूंबाची सुटका करण्यात श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांना यश मिळाले आहे. याप्रकरणी मोखाडा पोलीस ठाण्यात मालकाविरु द्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्र्यंबकेश्वर : वेठबिगारीच्या पाशात अडकलेल्या एका आदिवासी कुटूंबाची सुटका करण्यात श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांना यश मिळाले आहे. याप्रकरणी मोखाडा पोलीस ठाण्यात मालकाविरु द्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील बोट्याची वाडी या गावातील आदिवासी कुटुंबाला वेठबिगार म्हणून बंधक बनवलेल्या कुटुंबातील तीन लोकांना घरी पाठवले मात्र परत येण्याची अट घालून त्यांच्या १३ वर्षीय मुलीला बंधक बनवून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. श्रमजीवी संघटनेचे विवेक पंडित यांची या गावात झालेली अचानक भेट हा गंभीर प्रकार उघड होण्यास कारण ठरली. नंतर पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या कुटुंबाला वेठबिगारीच्या पाशातून मुक्त केले, याबाबत या कुटुंबाने मुक्त होताच मोखाडा पोलीस ठाणे गाठत तक्र ार दाखल केली आहे.मोहन भिका दिवे याने दिलेल्या फिर्यादीनुसार मोहन यांचे कुटुंब मोखाड्यात बोट्याची वाडी येथे राहतात. पूर्वी ते भिवंडीतील पडघ्याला वीटभट्टीवर कामासाठी जायचे. मागील गणपती उत्सवाच्या दरम्यान उल्हासनगर येथील योगेश वायले यांनी काम आहे म्हणून मोहन, त्याचे आई-वडील, गौरी (७ वर्षे) , बायडी (९वर्ष) आणि शैला (१३ वर्षे ) या बहिणींसोबत हे पूर्ण कुटुंब उल्हासनगर येथे नेले. तिथे वीटभट्टीजवळ एका खोलीत त्यांना ठेवले, विटांचे तुकडे भरणे, शेतातील काम, वीट भरायला - उतरवायला गाडीवर अशी अनेक कामे करून घेतली. सुट्या मजुराला ( रोजंदारीच्या) ४०० रूपये देणारा मालक या बंधक मजुरांना केवळ २०० व महिलेला १०० मजुरी देत होता. स्वत:कडे काम नसले की बाहेर कामाला पाठवून तिकडून येणाºया मजुरीच्या पन्नास टक्के रक्कम मालक घेत असे.दिवाळीमध्ये या लोकांनी घरी जायचे सांगितले तर मालकाने त्यांना विरोध केला. मग तेरा वर्षीय शैला हिला बंधक बनवून ठेवले व हे कुटुंब परत यावे म्हणून शैलाला ताब्यात ठेवतो असे सांगत एक रु पया दिला नाही. जवळ वाचलेले हजार रु पये घेऊन कसेबसे हे कुटुंब मोखाड्यात पोहचले. मुलगी मालकाकडे बंधक, खिशात दमडी नाही अशा स्थितीत या कुटुंबाची दिवाळी अंधारात गेली. घरी शासकीय योजनेतून घरकुल आलेले असल्याने मोहनचे वडील घरीच थांबले. गावातील कुणाकडून तरी वडिलांनी ५०० रूपये उसनवारी घेऊन मोहनच्या वडिलांनी म्हणजे भिका दिवे यांनी मोहन, त्याची आई आणि तीन बहिणींसोबत त्यांना पुन्हा उल्हासनगर येथे पाठविले. कारण आपली छोटी मुलगी तिकडेच मालकाकडे होती.परत गेल्यावर मोहन आणि कुटुंबाने कच्या विटा एकावर एक रचून झोपडे बनवून राहायची व्यवस्था केली. त्यानंतर योगेश आणि त्याचा भाऊ राजू यांच्याकडे किंवा बाहेर मजुरीचे काम करावे लागेल, बाहेर मिळालेल्या ३०० रूपये मजुरीतून १०० रु पये द्यायचा कधी ते ही देत नसे, राजू हा गौरीला मारहाण करायचा शिवीगाळ करायचा. काम झाल्यावर मजुरांना पाय धरायला लावायचा, मोहनची आई आणि बहिणींना देखील अनेकदा पाय धरायला लावायचा मग हजेरी लिहायचा. त्रास वाढत चाललेला, पळून जावे वाटायचे मात्र शेठच्या भीतीने निमूट काम करत राहण्याशिवाय पर्याय नव्हता. याबाबत मोहनने वडील भिका दिवे यांना याबाबत फोन करून सांगितलेले. शेवटी त्याने गावात याबाबत माहिती दिली. ही बाब श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांना कळताच त्यांनी तातडीने या कुटुंबाला मुक्त करण्यासाठी कार्यकर्त्यांना सूचना दिल्या. मोखाड्यातुन पांडू मालक, गणेश माळी, उल्हास भानुशाली यांच्यासह राजेश चन्ने, वासू वाघे इत्यादी कल्याण अंबरनाथमधील कार्यकर्त्यांनी हिल लाईन पोलीस ठाणे गाठले. नुकत्याच झालेल्या निवडणुकी दरम्यान विवेक पंडित यांचे या गावात जाणे येणे सुरु होते. पंडित यांनी लक्ष घालत सदर कुटूंबाची सुटका केली.

टॅग्स :Nashikनाशिक