शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

जिल्ह्यातील आदिवासी होणार विस्थापित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 01:10 IST

नाशिक : वर्षानुवर्षे वनजमिनींवर अतिक्रमण करूनही त्याबाबतचे आवश्यक पुरावे सादर न करणाऱ्या व जिल्हास्तरीय समितीने अंतिमत: अमान्य केलेल्या वनजमिनींवरील दाव्यांवर अतिक्रमण करून असलेल्या आदिवासींना वनजमिनींवरून हाकलण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने त्याचा फटका नाशिक जिल्ह्यातील १८ हजार ६९६ दावेधारक असलेले सुमारे पन्नास हजारांहून अधिक आदिवासींना बसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

ठळक मुद्देसर्वोच्च न्यायालय : १८ हजार दावेदारांच्या ताब्यात पन्नास हजार एकर जागा

नाशिक : वर्षानुवर्षे वनजमिनींवर अतिक्रमण करूनही त्याबाबतचे आवश्यक पुरावे सादर न करणाऱ्या व जिल्हास्तरीय समितीने अंतिमत: अमान्य केलेल्या वनजमिनींवरील दाव्यांवर अतिक्रमण करून असलेल्या आदिवासींना वनजमिनींवरून हाकलण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने त्याचा फटका नाशिक जिल्ह्यातील १८ हजार ६९६ दावेधारक असलेले सुमारे पन्नास हजारांहून अधिक आदिवासींना बसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.या दावेधारकांच्या ताब्यात सद्य:स्थितीत सुमारे ५० हजार एकर वनजमीन असून, भविष्यात या प्रश्नावरून पुन्हा संघर्ष पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.आदिवासींना त्यांच्या वनजमिनींचा हक्क मिळावा यांसह विविध मागण्यांसाठी किसान मोर्चाने गुरुवारी सकाळपासूनच नाशिक ते मुंबई लॉँग मार्च काढलेला असताना त्यातच सर्वोच्च न्यायालयाचा वनजमिनींवरील अतिक्रमणांच्या मुद्द्यावर अंतिम निर्णय जाहीर झाल्याने मोर्चेकरी आदिवासींची एकीकडे समजूत घालण्याचे व दुसरीकडे सर्वाेच्च न्यायालयात सरकारची बाजू मांडण्याचा दुहेरी पेच राज्य सरकारपुढे उभा ठाकला आहे.प्रामुख्याने बहुतांशी वनजमिनींवर २००५ नंतरचे अतिक्रमण असणे, जमीन प्रत्यक्षात ताब्यात नसताना दावा दाखल करणे, वनहक्क अधिनियमा-नुसार आवश्यक पुरावे नसणे, कुटुंबातील एका व्यक्तीचा एक दावा मंजूर असताना पुन्हा दुसºया व्यक्तीच्या नावे दावा करणे, बिगरआदिवासी दावेदारांनी ७५ वर्षांचा रहिवास सिद्ध न करणे, एकच पुरावा अनेक दाव्यांना जोडणे अशा विविध कारणांवरून समितीने १८,६९६ दावे अमान्य केले आहेत. अर्थातच या जमिनींवर दावे करणाºयांनी अप्रत्यक्षपणे वनजमिनीवर बेकायदेशीर अतिक्रमणच केल्याचे मानले जात आहे. काही दाव्यांची फेरतपासणी सुरूसर्वोच्च न्यायालयापुढे दाखल करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार न्यायालयाने२२ हजार आदिवासी कुटुंबांना वनजमिनींवरून दि. २४ जुलैपर्यंत हाकलून लावण्याचे आदेश सरकारला दिले असले तरी एकट्या नाशिक जिल्ह्यात १८ हजारांहून अधिक दावे दाखल करणाºया कुटुंबांमध्येच पन्नास हजारांहून अधिक आदिवासींचा रहिवास आहे. त्यांच्या ताब्यात ५० हजार एकर वनजमीन आहे. यातील काही दाव्यांची फेरतपासणी सुरू आहे.राज्यात सर्वाधिक वनहक्कचे दावे नाशिक जिल्ह्यातूनच दाखल झाले असून, दावे मंजूर करण्यातही जिल्ह्याने अव्वल क्रमांक पटकाविला आहे. जिल्ह्यातच सन २००६ पासून सुमारे ५०,८३३ वन दावे दाखल होते. उपविभागस्तरीय समित्यांनी केलेली छाननी, जिल्हास्तरीय समितीने मान्य केलेल्या दाव्यांपैकी जवळपास १८,६९६ वन दावे विविध पातळीवर तपासणी करून अमान्य करण्यात आले आहेत.