शहरं
Join us  
Trending Stories
1
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
2
मोठी बातमी! विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
3
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
4
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
5
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
6
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
7
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
8
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
9
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
10
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
11
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
12
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?
13
Mumbai: धक्कादायक! अडीच वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून हत्या; आईसह तिच्या प्रियकराला अटक
14
अनिल अंबानी पुन्हा ॲक्शन मोडमध्ये! मुकेश अंबानींना देणार टक्कर? भूतानसोबत २००० कोटींचा करार
15
प्यार तूने क्या किया! डिजिटल अफेअर्स म्हणजे काय, भारतात का लोकप्रिय होतोय रिलेशनशिप ट्रेंड?
16
IPL मध्ये आतापर्यंत खेळले १२०० क्रिकेटर्स, पण 'ही' कामगिरी करणारा साई सुदर्शन 'एकमेव'!!
17
जिथे होते लष्कर-ए-तोयबाचे तळ, तिथेच १४ दिवस प्रशिक्षण घेत होती ज्योती मल्होत्रा! नवा खुलासा
18
ब्रम्होस: पाकिस्तानचे ११ एअरबेस उगाच नाही भेदले...; भारताला माजी राष्ट्रपतींनी दिलेली 'भेट'
19
मॅनेजरच्या वागणुकीनं नैराश्य, कामाच्या दबावामुळे २५ वर्षीय इंजिनिअरनं उचललं टोकाचं पाऊल
20
Jalgaon Shiv Sena Office: शिवसेनेच्या कार्यालयात भूत? कार्यकर्त्यांमध्ये घबराट, गुलाबराव पाटलांनी काढली समजूत

प्रचलित पद्धतीने लिलाव करा

By admin | Updated: July 26, 2016 22:24 IST

सटाणा : कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी अडविला राज्यमार्ग

सटाणा : कांदा व्यापाऱ्यांनी गोणी पद्धतीने कांदा लिलाव सुरू करण्याची भूमिका घेतल्याने बागलाणमधील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी या विरोधात मंगळवारी अचानक विंचूर-प्रकाशा राज्यमार्ग रोखून धरत आपला संताप व्यक्त केला. येत्या ४८ तासात गोणी पद्धतीचा निर्णय मागे घेऊन प्रचलित पद्धतीने कांदा लिलाव सुरू न केल्यास उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी प्रशासनाला दिला आहे.व्यापारी व बाजार समिती यंत्रणेची भूमिका शेतकऱ्यांना वेठीस धरणारी असल्याने आज संतप्त झालेल्या शंभर ते दीडशे शेतकऱ्यांनी अचानक शहरातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याजवळ ठिय्या देऊन विंचूर-प्रकाशा राज्यमार्ग तब्बल एक तास रोखून धरला. यामुळे पोलीस यंत्रणेची चांगलीच धावपळ उडाली होती. पक्षीय मतभेद बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या हितासाठी सर्र्वांनी एकत्र येण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. एक तास चाललेल्या या रास्ता रोको आंदोलनात अरविंद सोनवणे, पांडुरंग सोनवणे, बिंदूशेठ शर्मा, सुभाष पाटील, देवीदास अहिरे, राकेश बाळासाहेब सोनवणे यांनी मनोगतातून कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या. यावेळी कांदा उत्पादक शेतकरी किरण रौंदळ, राजेंद्र रौंदळ, नीलेश सोनवणे, बबलू रौंदळ, तुकाराम बोरसे, कचरू तिवारी, यतीश रौंदळ, सुरेश सोनवणे, तुकाराम बोरसे, दिलीप अहिरे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. रास्ता रोको आंदोलनात जनार्दन सोनवणे, आनंद सोनवणे, अभिमन सोनवणे, जिभाऊ बच्छाव, ओंकार मोगरे, बाळासाहेब सोनवणे, दौलत अहिरे, हिरामण गांगुर्डे, लक्ष्मण अहिरे, माधव सोनवणे, श्रीराम सोनवणे, हेमंत खैरनार, सचिन सोनवणे, सुरेश नंदाळे, श्रावण फटांगडे, कल्पेश ठोके, भिका गोसावी, व्यंकट सोनवणे, पंडित खैरनार, दिनेश देवरे, योगेश सूर्यवंशी, सचिन अहिरे, आधार जाधव, अमृत जाधव, नारायण सोनवणे, हरी खैरनार आदिंसह कांदा उत्पादक शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)