नाशिक : अंबड औद्योगिक वसाहतीतील एका भूखंडावर असलेली सुमारे अडीचशे तेतीनशे झाडे एप्रिल अखेरीस तोडण्यात आली आहे. यासंदर्भात महापलिकेकडेतक्रार करून दखल घेण्यात आली नसल्याची तक्रार पर्यावरण कार्यकर्त्यानेकेली आहे. महापालिकेने यांसदर्भात उदासिनता दाखवल्याने संबंधीतकार्यकर्त्याने पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे तक्रार केलीआहे.सध्या लॉक डाऊन आणि संचारबंदी असल्याने वृक्ष तोड करणाऱ्यांना फावले आहे.यापूर्वी त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरीच्या परीसरातील जंगलात वृक्ष तोडझाली होती. संंबधीतांचा माग काढत वनखात्याने संबंधीतांवर कारवाई केलीहोती. मात्र, शहरात अशाप्रकारच्या वृक्षतोडीकडे दुर्लक्ष होत आहे.यासंदर्भात पर्यावरण प्रेमी आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा सरचिटणीसवैभव देशमुख यांनी महापालिकेकडे तक्रार केली आहे. अंबड येथील सुमीतकंपनीच्या भूखंडावर असलेली बहारदार करंज, निलगीरी आणि अन्य सुमारेअडीचशे ते तीनशे झाडे २८ ते ३० एप्रिल दरम्यान तोडण्यात आली. इतक्यामोठ्या प्रमाणात नियोजनबध्द पध्दतीने वृक्षतोड होत असताना देखीलमहापालिकेल्या किंवा औद्योगिक विकास महामंडळाला त्याचा पत्तालही लागलानाही, हे सारेच शंकास्पद आहे. या वसाहतीत जाणाऱ्या आणि येणाºया काहीनागरीकांनी वृक्ष तोड बघून हळहळ व्यक्त करतानाच यासंदर्भात तक्रारकरण्याचा प्रयत्न केला परंतु प्रतिसाद मिळाला नाही.एकीकडे स्मार्ट सिटी अंतर्गत पर्यावरण स्नेही उपक्रम राबविल्याचेसांगितले जात असताना दुसरीकडे ढासळत्या पर्यावरण संतुलनाकडे दुर्लक्षकेले जात आहे. यासंदर्भात महापालिकेच्या उद्यान विभागाने दखल न घेतल्यानेकार्यकर्त्यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे तक्रार केलीआहे.त्यांनी प्रशासनाला त्याची दखल घेण्यास सांगितले आहे. या प्रकरणाचीगंभीर दखल घेऊन संबंधीतांवर कारवाई करण्याची मागणी देशमुख यांनी केलीआहे.
लॉक डाऊनची संधी साधून अंबड येथे वृक्षतोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 19:20 IST
शहरात अशाप्रकारच्या वृक्षतोडीकडे दुर्लक्ष होत आहे. यासंदर्भात पर्यावरण प्रेमी आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा सरचिटणीस वैभव देशमुख यांनी महापालिकेकडे तक्रार केली आहे
लॉक डाऊनची संधी साधून अंबड येथे वृक्षतोड
ठळक मुद्देपर्यावरण प्रेमींची नाराजीमहापालिकेकडून कारवाई नसल्याची तक्रार