शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

चिंचवड ते युरोप ‘केशर’चा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 00:17 IST

नाशिक जिल्ह्यातील हरसूलजवळील चिंचवड या छोट्याशा आदिवासीबहुल गावातील भोये व वाघेरे कुटुंबाचा केशर आंबा यावर्षी युरोपला निघाल्याने जिल्ह्यात प्रथमच इस्त्रायल पद्धतीचा वापर करून आंबा परदेशात पाठविण्याचा मान चिंचवड या गावाला मिळाला आहे. पारंपरिक शेती सोडून आधुनिक तंत्राचा अवलंब करून राज्यात प्रथमच इस्त्रायल व जर्मनपद्धतीने केशर आंबा लागवड करून आदिवासी भागातील जनार्दन वाघेरे ऊर्फ जेडी व अमोल भोये या तरुण दुकलीचा आंबा चिंचवड ते युरोप प्रवास करणार आहे.

नाशिक जिल्ह्यातील हरसूलजवळील चिंचवड या छोट्याशा आदिवासीबहुल गावातील भोये व वाघेरे कुटुंबाचा केशर आंबा यावर्षी युरोपला निघाल्याने जिल्ह्यात प्रथमच इस्त्रायल पद्धतीचा वापर करून आंबा परदेशात पाठविण्याचा मान चिंचवड या गावाला मिळाला आहे. पारंपरिक शेती सोडून आधुनिक तंत्राचा अवलंब करून राज्यात प्रथमच इस्त्रायल व जर्मनपद्धतीने केशर आंबा लागवड करून आदिवासी भागातील जनार्दन वाघेरे ऊर्फ जेडी व अमोल भोये या तरुण दुकलीचा आंबा चिंचवड ते युरोप प्रवास करणार आहे. हरसूल परिसरात पारंपरिक शेती म्हणून भात, नागली, वरई, भुईमूग करतात. निसर्गाची अवकृपा, बाजारपेठेत योग्य मोबदला न मिळणे तसेच मजुरांची चिंता यामुळे वडिलांची जागा होती तेथे फक्त योग्य नियोजन करून अधिक मोबदला मिळेल असे नवीन पीक घ्यायचे ठरविले. वाघेरे कुटुंबातील जनार्दन वाघेरे हे कोल्हापूर येथे कृषी सहायक म्हणून काम  करत असताना त्यांनी इस्त्रायलच्या  शेतीचा अभ्यास केला व चिंचवड येथे आपण अशीच शेती करू शकतो  हे आव्हान स्वीकारून आई-वडील  व भोये कुटुंबाला विश्वासात घेऊन चार एकरावर प्रत्यक्ष काम सुरू  केले.नवीन इस्त्रायल तंत्रज्ञानाने आंबा फळबाग लागवड ३ बाय १४ फुटांवर एकरी १००० झाडांची लागवड केली. लागवड करताना १४ फुटांवर लाइन मारल्या. जेसीबीने चर मारले. चर शेणखत व मातीने भरून १४ नोव्हेंबर २०१३ रोजी रोपांची लागवड केली. ठिबक सिंचन करून पाणी दिले. कोल्हापूर येथे राहून सोशल मीडियावर आंब्याची निगा कशी राखायची याचे ज्ञान आत्मसात करून फोनवर आपल्या व भोये कुटुंबाला सूचना देऊन योग्यवेळी फवारणी करून घेतली. लागवडीसाठी एकरी ८० हजार रुपये खर्च आला. दुसऱ्या वर्षी आंब्याला मोठ्या प्रमाणात मोहर आल्याने सर्व कुटुंब आनंदित झाले. मार्च २०१५ मध्ये झाडांना आंबे लागल्यावर गावात व परिसरात चर्चा सुरू झाली. दुसºया वर्षी ३ टन केशर सेंद्रीय पद्धतीने पिकल्यामुळे नाशिक परिसरातील व्यापारी थेट बागेत येऊन माल खरेदी करू लागले. त्यामुळे बाजारपेठेमध्ये माल पोहोचवण्यासाठी लागणारा वेळ आणि खर्च वाचला.  पहिल्या वर्षी एकरी १,८०,००० ेरुपये, दुसºया वर्षी एकरी १,९०,००० रुपये, तिसºया वर्षी एकरी २,२०,००० रुपये नफा झाला. त्यानंतर प्रत्येक वर्षी आंब्याच्या नवीन जाती, चिकू वगैरे असे नवीन रोपांची लागवड करण्यास सुरुवात केली. २०१६ मध्ये सुंदर दामोदर नर्सरीसुद्धा सुरू करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्याची जबाबदारी अमोल भोये व नितीन भोये या दोघांवर दिली. त्यात अमोल भोये शिक्षक म्हणून पालघर जिल्ह्यात नोकरी करतो. त्यास नितीनची साथ मिळाल्याने हजारो रोपांची लागवड पहिल्या वर्षी करण्यात आली. त्यानंतर आंबा पाहण्यासाठी राज्याबरोबर देशातीलसुद्धा शेतकरी, व्यापारी, कृषी अभ्यासक येऊ लागले. लागलेलं फळ आणि कमी जागेत कमी पैशांत भरपूर नफा यामुळे अनेक शेतकरी जागेवर रोपांची आॅर्डर क रू लागेल. आजमितीस १५००० रोपांची आॅर्डर सुंदर दामोदर नर्सरीकडे आहे. तीन वर्षांत आलेले यश पाहून एक्स्पोर्ट करण्यासाठी प्रयत्न चालू केले. एक्सपोर्ट प्रमाणपत्र कृषी खात्यातील अधिकाºयांच्या मदतीने ५ वर्षांसाठी मिळाले. त्यांच्या नियमानुसार सेंद्रीय खताचा वापर केला. फेसबुकच्या माध्यमातून नामधारी एक्सपोर्ट कंपनीने ते बघितले व त्यांनी १२० रुपये किलो या भावाने माल ठरवला.  त्यासाठी कंपनीचे माणसे बागेत येऊन गेले व एक्स्पोर्ट साठी लागणारे साहित्य जसे कि प्रत्येक फळ ला पैकींग साठी लागणारी इंपोर्टेड बॅग दिली. आज २५० ते ३०० ग्राम वजनाचे फळ प्रत्येक झाडास आले आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी