शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

मध्य रेल्वे मार्गाची वाहतूक सेवा पूर्णपणे विस्कळीतच

By admin | Updated: June 21, 2015 01:47 IST

मध्य रेल्वे मार्गाची वाहतूक सेवा पूर्णपणे विस्कळीतच

नाशिकरोड : मुंबई-ठाणे भागात शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे दाणादाण उडालेल्या मध्य रेल्वे मार्गाची वाहतूक सेवा शनिवारी दुसऱ्या दिवशीदेखील पूर्णपणे विस्कळीतच होती. नाशिककरांच्या दृष्टीने मुंबईला जाण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या पंचवटी, राज्यराणी, गोदावरी या तीन गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या, तर मुंबईहून सुटणाऱ्या सर्वच गाड्या ८-१० तास उशिराने धावत होत्या. अनेक गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आल्याने व रेल्वे प्रशासनाकडून योग्य माहिती मिळत नसल्याने प्रवाशांचे दुसऱ्या दिवशीही अतोनात हाल झाले.चार दिवसांपूर्वी बुधवारी पहाटे मध्य प्रदेश इटारशी रेल्वेस्थानकांवरील रुट रिले इंटर लॉकिंग पॅनलला आग लागल्याने मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झालेली आहे. सिग्नल यंत्रणा बंद असल्याने इटारसीवरून खंडवामार्गे नाशिक- मुंबईला येणाऱ्या रेल्वे या इटारसीवरून भोपाळ, उज्जैन, वडदोरा, वसईमार्गे मुंबईला सोडण्यात येत आहे, तर मुंबईहून नाशिक, खंडवामार्गे इटारसीहून पुढे जाणाऱ्या रेल्वे या गाड्या मुंबई, कल्याण, वसई, वडदोरा या मार्गे इटारसीला सोडण्यात येत आहे. रुट रिले इंटर लॉकिंग पॅनलचे दुरुस्तीचे काम अद्याप पूर्ण न झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक सेवा विस्कळीत झालेली आहे. त्यातच शुक्रवारी मुंबई-ठाणे परिसरात झालेल्या मुसळधार पावसाचे पाणी रेल्वेस्थानकात मोठ्या प्रमाणात साचल्याने मध्य रेल्वेच्या वाहतूक सेवेची दाणादाण उडून गेली आहे. यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. नाशिककरांना मुंबईला जाण्यासाठी महत्त्वाची असलेली पंचवटी एक्स्प्रेस शनिवारी सकाळी इगतपुरीला रद्द करून पुन्हा माघारी बोलविण्यात आली. तर गोदावरी, राज्यराणी एक्स्प्रेस या मनमाडलाच रद्द करण्यात आल्या होत्या. इटारसी-भुसावळ-नाशिक मार्गे मुंबईला जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या यांचे मार्ग बदलण्यात आल्याने शुक्रवारपासून बहुतेक गाड्या नाशिकला आल्याच नाहीत. या मार्गे काही आलेल्या गाड्या या ५-६ तास उशिरा टप्याटप्याने धावत होत्या.औरंगाबाद-मुंबई तपोवन एक्स्प्रेस शुक्रवारी देवळाली रेल्वेस्थानकावर रद्द करण्यात आली. ही तपोवन एक्स्प्रेस देवळालीहून पुन्हा शनिवारी औरंगाबादला रवाना झाली. शुक्रवारी रात्री अडीच वाजता नाशिकरोड रेल्वेस्थानकावर येणारी नागपूर-मुंबई विदर्भ एक्स्प्रेस सात तास उशिराने शनिवारी सकाळी साडेनऊ वाजता नाशिकरोड रेल्वेस्थानकावर आल्यावर रद्द करण्यात आली. शनिवारी तिच्या निर्धारित वेळेला रात्री १०.४० वाजता नाशिकरोडहून विदर्भ एक्स्प्रेस नागपूरला रवाना झाली. नागपूर-मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेस शनिवारी सकाळी निफाड रेल्वे स्थानकावर रद्द करण्यात येऊन सायंकाळी ७ वाजता निफाडवरून पुन्हा नागपुरला रवाना झाली. (प्रतिनिधी)