शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

परिवहन विभाग झाले खडबडून जागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 00:17 IST

देवळा- मालेगाव रस्त्यावर मेशी धोबीघाटातील वळणावर झालेल्या बस व अ‍ॅपेरिक्षा अपघातानंतर येथील परिवहन विभागाचे अधिकारी खडबडून जागे झाले आहेत. रस्ता सुरक्षेच्या दृष्टिकोनातून खासगी आॅटोरिक्षांची पुढील १५ दिवस विशेष तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. मालेगाव विभागात आतापर्यंत सहा अ‍ॅपेरिक्षांवर कारवाई करण्यात आली.

ठळक मुद्देमेशी अपघात । अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई, अवैध प्रवासी वाहतूक ठरतेय जीवघेणी

मालेगाव : देवळा- मालेगाव रस्त्यावर मेशी धोबीघाटातील वळणावर झालेल्या बस व अ‍ॅपेरिक्षा अपघातानंतर येथील परिवहन विभागाचे अधिकारी खडबडून जागे झाले आहेत. रस्ता सुरक्षेच्या दृष्टिकोनातून खासगी आॅटोरिक्षांची पुढील १५ दिवस विशेष तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. मालेगाव विभागात आतापर्यंत सहा अ‍ॅपेरिक्षांवर कारवाई करण्यात आली.धोबीघाटात झालेल्या बस व रिक्षा अपघातात २६ जण ठार तर ३३ जण जखमी झाले. भीषण अपघातामुळे अवैध प्रवासी वाहतूक पुन्हा एकदा चर्चेत आल्याने परिवहन विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी अपघातातील मृतांच्या वारसांची व येथील सामान्य रुग्णालयातील जखमींच्या प्रकृतीची विचारपूस केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला होता. यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी अवैध प्रवासी वाहतुकीबाबत प्रश्न विचारले होते. याची परिवहन मंत्री परब यांनी गंभीर दखल घेतली आहे. मुंबई परिवहन आयुक्तांनी खासगी आॅटोरिक्षांच्या तपासणीचे फर्मान सोडले आहे. अपघाताचे कार्यक्षेत्र मालेगाव उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बीडकर यांचे असल्याने त्यांनी आदेश धडकताच सहा वाहनांवर कारवाई केली. सहा वायू वेग पथके मालेगाव, कळवण, सटाणा, देवळा व नांदगाव तालुक्यातील रस्त्यांवर कारवाईकामी तैनात ठेवली आहेत. खासगी संवर्गातील नोंदणी झालेल्या अॉटोरिक्षा प्रवासी वाहतुकीचा परवाना नसताना बेकायदा वाहतूक करताना आढळल्यास थेट कारवाई केली जात आहे. अशा वाहनांचा अपघात झाला तर प्रवासी कुठल्याही विमा संरक्षणास पात्र राहत नाही. त्यामुळे नागरिकांनी सुरक्षेचा विचार करून खासगी अ‍ॅपेरिक्षांमधून प्रवास करणे टाळावे असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन विभागाने केले आहे. दरम्यान प्रवासी वाहतूक करताना आढळणाºया खासगी आॅटोरिक्षांवर थेट जप्तीची कारवाई होत आहे. जप्त वाहने आरटीओ कार्यालय, पोलीस ठाणे, एसटी डेपो किंवा अन्यत्र ठेवली जाताहेत. मालकाकडून दंड वसूल तर चालकाचा परवाना निलंबित करून वाहनाची नोंदणी रद्द केली जाईल.मेशी धोबीघाटातील अपघातानंतर अवैध प्रवासी वाहतुकीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मालेगाव परिवहन विभागाच्या कक्षेत सर्वाधिक अपघात मालेगाव- सटाणा रस्त्यावर झाले आहेत. यापूर्वी २८ डिसेंबर २०१७ रोजी शेमळी गावाजवळ मालट्रकने अ‍ॅपेरिक्षाला दिलेल्या धडकेत सात प्रवासी जागीच ठार झाले होते. त्यानंतर हा मोठा भीषण अपघात झाला आहे. सटाणा ते मालेगाव, मालेगाव- नामपूर, चाळीसगाव चौफुली ते कळवाडी फाटा, मनमाड चौफुली ते उमराणे या ठिकाणांवर अ‍ॅपेरिक्षाद्वारे क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक केली जाते. मालेगाव परिवहन कार्यालयाच्या नाकावर टिचून शहरात मोठ्या प्रमाणात खासगी प्रवासी वाहतूक करणाºया वाहनांचे थांबे आहेत. बसस्थानकाजवळूनही प्रवासी वाहतूक केली जाते.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीस