शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
2
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
5
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
6
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
7
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
8
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
9
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
10
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
11
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
12
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
13
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
14
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
15
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
16
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
17
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
18
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
19
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
20
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

परिवहन विभाग झाले खडबडून जागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 00:17 IST

देवळा- मालेगाव रस्त्यावर मेशी धोबीघाटातील वळणावर झालेल्या बस व अ‍ॅपेरिक्षा अपघातानंतर येथील परिवहन विभागाचे अधिकारी खडबडून जागे झाले आहेत. रस्ता सुरक्षेच्या दृष्टिकोनातून खासगी आॅटोरिक्षांची पुढील १५ दिवस विशेष तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. मालेगाव विभागात आतापर्यंत सहा अ‍ॅपेरिक्षांवर कारवाई करण्यात आली.

ठळक मुद्देमेशी अपघात । अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई, अवैध प्रवासी वाहतूक ठरतेय जीवघेणी

मालेगाव : देवळा- मालेगाव रस्त्यावर मेशी धोबीघाटातील वळणावर झालेल्या बस व अ‍ॅपेरिक्षा अपघातानंतर येथील परिवहन विभागाचे अधिकारी खडबडून जागे झाले आहेत. रस्ता सुरक्षेच्या दृष्टिकोनातून खासगी आॅटोरिक्षांची पुढील १५ दिवस विशेष तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. मालेगाव विभागात आतापर्यंत सहा अ‍ॅपेरिक्षांवर कारवाई करण्यात आली.धोबीघाटात झालेल्या बस व रिक्षा अपघातात २६ जण ठार तर ३३ जण जखमी झाले. भीषण अपघातामुळे अवैध प्रवासी वाहतूक पुन्हा एकदा चर्चेत आल्याने परिवहन विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी अपघातातील मृतांच्या वारसांची व येथील सामान्य रुग्णालयातील जखमींच्या प्रकृतीची विचारपूस केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला होता. यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी अवैध प्रवासी वाहतुकीबाबत प्रश्न विचारले होते. याची परिवहन मंत्री परब यांनी गंभीर दखल घेतली आहे. मुंबई परिवहन आयुक्तांनी खासगी आॅटोरिक्षांच्या तपासणीचे फर्मान सोडले आहे. अपघाताचे कार्यक्षेत्र मालेगाव उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बीडकर यांचे असल्याने त्यांनी आदेश धडकताच सहा वाहनांवर कारवाई केली. सहा वायू वेग पथके मालेगाव, कळवण, सटाणा, देवळा व नांदगाव तालुक्यातील रस्त्यांवर कारवाईकामी तैनात ठेवली आहेत. खासगी संवर्गातील नोंदणी झालेल्या अॉटोरिक्षा प्रवासी वाहतुकीचा परवाना नसताना बेकायदा वाहतूक करताना आढळल्यास थेट कारवाई केली जात आहे. अशा वाहनांचा अपघात झाला तर प्रवासी कुठल्याही विमा संरक्षणास पात्र राहत नाही. त्यामुळे नागरिकांनी सुरक्षेचा विचार करून खासगी अ‍ॅपेरिक्षांमधून प्रवास करणे टाळावे असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन विभागाने केले आहे. दरम्यान प्रवासी वाहतूक करताना आढळणाºया खासगी आॅटोरिक्षांवर थेट जप्तीची कारवाई होत आहे. जप्त वाहने आरटीओ कार्यालय, पोलीस ठाणे, एसटी डेपो किंवा अन्यत्र ठेवली जाताहेत. मालकाकडून दंड वसूल तर चालकाचा परवाना निलंबित करून वाहनाची नोंदणी रद्द केली जाईल.मेशी धोबीघाटातील अपघातानंतर अवैध प्रवासी वाहतुकीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मालेगाव परिवहन विभागाच्या कक्षेत सर्वाधिक अपघात मालेगाव- सटाणा रस्त्यावर झाले आहेत. यापूर्वी २८ डिसेंबर २०१७ रोजी शेमळी गावाजवळ मालट्रकने अ‍ॅपेरिक्षाला दिलेल्या धडकेत सात प्रवासी जागीच ठार झाले होते. त्यानंतर हा मोठा भीषण अपघात झाला आहे. सटाणा ते मालेगाव, मालेगाव- नामपूर, चाळीसगाव चौफुली ते कळवाडी फाटा, मनमाड चौफुली ते उमराणे या ठिकाणांवर अ‍ॅपेरिक्षाद्वारे क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक केली जाते. मालेगाव परिवहन कार्यालयाच्या नाकावर टिचून शहरात मोठ्या प्रमाणात खासगी प्रवासी वाहतूक करणाºया वाहनांचे थांबे आहेत. बसस्थानकाजवळूनही प्रवासी वाहतूक केली जाते.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीस