शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिंदेसेनेनेच युती तोडली, आम्ही तर दहा दिवसांपासून...", भाजपा नेत्याने ठरलेले जागावाटपही सांगून टाकले
2
उत्तर भारतीय महापौर बसेल इतके नगरसेवक निवडून आणू; भाजपा नेते कृपाशंकर सिंह यांचं विधान
3
शिंदेसेनेने १४ विद्यमान नगरसेवकांना नाकारली उमेदवारी; कुणाला डावलले, कुणाला मिळाले तिकीट?
4
Viral Video: "मॅडम असं करू नका!", प्रवासी तरुणीचं कॅब चालकासोबत चुकीचं वर्तन, काय केलं?
5
IND W vs SL W: हरमनप्रीतची कडक फिफ्टी; अरुंधतीनं तर २४५ च्या स्ट्राईक रेटनं धावा करत लुटली मैफील
6
निष्ठावंतांना डावललं, भाजपात मोठी बंडाळी; उद्धवसेनेतून आलेल्या माजी नगरसेवकाला दिली उमेदवारी
7
BMC Election: अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ९४ शिलेदार रिंगणात; ५२ लाडक्या बहिणींना संधी
8
निर्मात्याकडून एका रात्रीची ऑफर, भररस्त्यात गोंधळ... सूर्याचं नाव घेणारी खुशी मुखर्जी कोण?
9
आरपीआय महायुतीतून बाहेर पडली का? रामदास आठवलेंनी मांडली भूमिका; म्हणाले, "काही पक्ष मुंबईत दादागिरी करू पाहताहेत"
10
Nashik: नाशिक भाजपमध्ये तिकीट वॉर! आमदार सीमा हिरे आणि इच्छुक उमेदवारांमध्ये राडा, नेमकं काय घडलं?
11
सोशल मीडियावरील अश्लील कंटेन्टबद्दल भारत सरकारने घेतला मोठा निर्णय; कडक शब्दांत दिला इशारा
12
एकनाथ शिंदेंनी हेरले ठाकरेंचे मोहरे, मुंबईतील मराठीबहुल पट्ट्यात 'बंडखोरां'ना तिकीट; गेम फिरणार?
13
PMC Election 2026: वकील आला अन् बातमी फुटली; अजित पवारांकडून गुंड आंदेकरच्या घरातील दोघींना तिकीट
14
धडामsss.... एका लाथेत कंपनीचा 'सीएओ' जमिनीवर आपटला! T800 रोबोटचा थरारक Video Viral
15
कोण आहे १७ वर्षीय G Kamalini? जिला स्मृतीच्या जागी मिळाली टीम इंडियाकडून T20I पदार्पणाची संधी
16
परभणीत उद्धवसेना आणि काँग्रेसची आघाडी; १२ जागांवर मैत्रीपूर्ण लढती
17
"९९ टक्के युती झाली होती, पण अर्जून खोतकरांचे म्हणणं होतं की..."; युती तुटल्याची लोणीकरांकडून घोषणा, भाजपा स्वबळावर लढणार
18
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, मॅचविनर खेळाडू जाणार संघाबाहेर, अचानक घटलं सहा किलो वजन  
19
Mumbai Accident: कोस्टल रोडवर तीन वाहनांमध्ये जोरदार धडक! दोन जण जखमी, अपघात नेमका कसा घडला?
20
Shravan Singh : Video - मोठा होऊन काय होणार?, जवानांची सेवा करणाऱ्या चिमुकल्याने जिंकलं मोदींचं मन
Daily Top 2Weekly Top 5

चुकीचे नियोजन करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करा

By admin | Updated: September 1, 2015 23:52 IST

राष्ट्रवादीची मागणी : मुख्यमंत्र्यांनाही धरले जबाबदार

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पहिल्या पर्वणीदरम्यान अतिरेकी बंदोबस्त आणि शहरभर बांबंूच्या बॅरिकेडिंगचे नियोजन करणाऱ्या पोलीस आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात याव्यात, प्रसंगी दोषी असल्यास कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.पत्रकार परिषदेत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विरोधी पक्षनेते आमदार धनंजय मुंडे व माजी उपमुख्यमंत्री आ. छगन भुजबळ यांच्यासह नेत्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी तटकरे व भुजबळ यांनी सिंहस्थ कुंभमेळ्यातील चुकीच्या नियोजनाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासह पोलीस व महसूल यंत्रणेतील अधिकाऱ्यांना दोषी धरले. आ. छगन भुजबळ यांनी सांगितले की, सिंहस्थ कुंभमेळ्याबाबत असलेल्या सर्वोच्च समितीचे अध्यक्ष मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांना पहिल्या पर्वणीदरम्यान झालेल्या गोेंधळाबाबत जबाबदारी झटकता येणार नाही. आता पोलीस रमणी आयोगाचा हवाला देऊन नियोजन केल्याचे सांगत असले तरी याबाबत आधीच माहिती का देण्यात आली नाही. पोलिसांनीही एक आव्हान म्हणून कुंभमेळा पर्वणीचे नियोजन स्वीकारले पाहिजे. अनुभवी असलेल्या लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांना विश्वासात न घेताच हे नियोजन करण्यात आल्याने ते फसले, अशी कोपरखळीही भुजबळ यांनी मारली. यावेळी विरोधी पक्षनेते आ.धनंजय मुंडे यांनी दुष्काळाबाबत शरद पवार यांनी मराठवाड्यात दौरा केल्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दौरा करीत असल्याची टीका केली, तर मुख्यमंत्र्यांचा मराठवाडा दौरा म्हणजे ‘बैल गेला आणि झोेपा केला’ या प्रकारातील असूनही आता दौरा करण्यापेक्षा प्रत्यक्ष दुष्काळातील नियोजनाच्या उपाययोजना करणे महत्त्वाचे आहे. संपूर्ण कर्जमाफी, वीज बील माफी, सक्तीची वसुली थांबविणे,सरकारी यंत्रणेमार्फत चारा छावण्या सुरू करणे, या उपाययोजना करण्याची मागणी तटकरे यांनी केली. यावेळी आ.जयंत जाधव, जि.प.अध्यक्ष विजयश्री चुंबळे, आ.हेमंत टकले, शिवाजी चुंबळे, भारती पवार, छबू नागरे, विष्णुपंत म्हैसधुणे, शोभा मगर, प्रेरणा बलकवडे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)४मुख्यमंत्र्यांनी आवाहन करावेसिंहस्थ पर्वणी काळादरम्यान मुंबईहून येणारी वाहतूक थेट भिवंडीहून वळविण्यात आली होती. दुकाने बंद ठेवण्यात आली होती. जगात कुठेही घडत नसेल, ते अमरधामही बंद ठेवण्यात आले. या सर्वांबाबत नाशिककरांमध्ये तीव्र संताप व्यक्त झाला असून, याबाबत आगामी पर्वणीत सुधारणा न झाल्यास राष्ट्रवादी कॉँग्रेस रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असे आमदार छगन भुजबळ यांनी सांगितले. आता स्वत: मुख्यमंत्र्यांनी नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी सर्व अटी शिथिल करून भाविकांना येण्याचे आवाहन केले पाहिजे.