शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

नगररचना पुन्हा रडारवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 00:11 IST

नाशिक : शहर विकास आराखड्यातील विविध शासकीय खात्यांसाठी आरक्षित भूखंडाचा महापालिकेने विनाकारण टीडीआर दिल्याच्या घटना उघड झाल्यानंतर नगररचना विभागाच्या विविध अधिकाऱ्यांवर संशय बळावला आहे. महापालिकेचे दायित्व नसताना मोबदला दिलाच कसा? असा प्रश्न स्थायी समितीच्या बैठकीत उपस्थित करण्यात आला आहे.

नाशिक : शहर विकास आराखड्यातील विविध शासकीय खात्यांसाठी आरक्षित भूखंडाचा महापालिकेने विनाकारण टीडीआर दिल्याच्या घटना उघड झाल्यानंतर नगररचना विभागाच्या विविध अधिकाऱ्यांवर संशय बळावला आहे. महापालिकेचे दायित्व नसताना मोबदला दिलाच कसा? असा प्रश्न स्थायी समितीच्या बैठकीत उपस्थित करण्यात आला आहे.प्रशासनाने स्थायी समितीसमोर अहवाल ठेवावा असा ठराव शुक्रवारी (दि.१२) झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत करण्यात आला आहे. यापूर्वी समितीनेच नऊ भूसंपादनाचे प्रस्ताव मंजूर केले असले तरी त्यातील आठ प्रस्तावांचे ठराव प्रशासनाकडे न पाठविता ते रोखण्याचेदेखील या बैठकीत ठरविण्यात आले. स्थायी समितीची बैठक सभापती गणेश गिते यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.यावेळी सुधाकर बडगुजर यांनी यासंदर्भात मुद्दे मांडले आणि प्रशासनाला जाब विचारला. विविध कारणांमुळे शहर विकास आराखड्यात असलेल्या नऊ आरक्षित भूखंडांचे भूसंपादन रद्द करण्याचा प्रस्ताव मांडले होते गेल्या सभेत यावर चर्चा होऊन ते मंजूर झाली असले तरी त्यावर शुक्रवारी (दि.१२) पुन्हा समितीत जोरदार चर्चा झाली. देवळाली येथील सुमारे ६० हजार चौरस मीटर भूखंड रेल्वे विभागासाठी आरक्षित असताना रेल्वेने मोबदला देणे सोडून महापालिकेने टीडीआर दिला. तसेच सर्व्हे नंबर १८८ /१ ब हा १९९७ सालीच महामार्ग विभागाने ताब्यात घेतला असून, या जागेच्या सातबारा उताºयावर राष्ट्रीय महामार्ग विभागाचे नाव लावण्यात आले आहे, असे असताना २००९ मध्ये महापालिकेने या जागेचे भूसंपादन सुरू केले असे अनेक प्रकार बडगुजर यांनी उघडीस आणले. त्यामुळे भूसंपादन रद्द करण्याच्या एकूण नऊ प्रस्तावांपैकी एक प्रस्ताव उच्च न्यायालयाचे आदेश असताना ते आदेश वगळता सर्व प्रस्ताव रोखण्याची मागणी केली.यावेळी मलनिस्सारण केंद्रासाठी साहित्य पुरवण्याच्या एका विषयावर राहुल दिवे यांनी मलनिस्सारण केंद्रातून प्रक्रिया न करताच टाकळी परिसरात पाणी सोडले जात असल्याचा आरोप केला. कल्पना पांडे यांनीदेखील विविध विषयांबाबत शहर अभियंता संजय घुगे यांना जाब विचारला.----------------------शौचालय घोटाळा झाल्याचा आरोपजुने नाशिक भागात कोरोना संसर्ग वाढत असून, त्याबाबत चर्चा करताना समीना मेमन यांनी प्रतिबंधित क्षेत्रात सार्वजनिक शौचालयामुळे लोक फिरत असतात, असे सांगतानाच त्यांनी स्वच्छ शहर अभियानाअंतर्गत मोठा शौचालय घोटाळा झाल्याचा आरोप केला. ज्यांच्या घरात अगोदरच व्यक्तिगत शौचालये आहे, त्यांना पुन्हा अनुदान देण्यात आले आणि गरजवंताना मात्र टाळण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.

टॅग्स :Nashikनाशिक