शहरं
Join us  
Trending Stories
1
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
2
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
3
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
4
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
5
"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
6
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
7
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
8
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
10
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
11
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
12
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ
13
यूपीपाठोपाठ दिल्लीत एन्काउंटरमध्ये वाढ, जूनच्या पहिल्या पाच दिवसांत पाच एन्काउंटर
14
नेपाळच्या ७ हजार लोकांना अमेरिका सोडावी लागणार, अमेरिकेने विशेष देशाचा दर्जा काढून घेतला
15
अंध वकिलाकडून सुप्रीम कोर्टात प्रथमच युक्तिवाद, भारतीय न्यायव्यवस्थेत ऐतिहासिक क्षण
16
जळक्या नोटा : न्या. वर्मांपुढे आता राजीनाम्याचाच पर्याय
17
मणिपूर पेटले, निदर्शकांनी अंगावर घेतले पेट्रोल ओतून
18
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
19
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
20
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  

टॉवर सुरूही झाला अन् लगेच बंदही !

By admin | Updated: July 9, 2014 01:37 IST

अधिकाऱ्यांची धावपळ : संसदेत होणार प्रश्न उपस्थित

 

नांदगाव : सर्वत्र ३जी - ४जीचे वारे वाहत असताना तालुक्यातील २-जीची सेवा सुरळीत देण्यात भारत संचार निगम लिमिटेड अपयशी ठरत असल्याने ग्राहकांनी इतर खासगी कंपन्यांकडे जाणे पसंत केले. एकूणच तालुक्यातील बीएसएनएल सेवेच्या तक्रारींचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच अधिकाऱ्यांची धावपळ झाली, तर गेल्या आठवड्यापासून बंद असलेला जामदरीचा मोबाइल टॉवर जसा सुरू झाला तसाच बंदही पडला हेविशेष.दूरसंचार क्षेत्रात दिवसेंदिवस स्पर्धा वाढत असताना बीएसएनएलकडून मात्र उदासीन भूमिका घेतली जात असल्याने त्याचा भुर्दंड सर्वसामान्य ग्राहकांना बसतो आहे. खासगी कंपन्यांकडून ३-जीची सेवा उपलब्ध करून दूरसंचार क्षेत्रात आघाडी घेतली आहे, तर दुसरीकडे बीएसएनएलकडून २-जीही सेवा सुरळीत दिली जात नसल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी आहेत. एकीकडे खासगी कंपन्या लाखो रुपये कमवित आहेत, तर दुसरीकडे बीएसएनएल तोट्यात जात असल्याचे चित्र आहे. याचा ग्रामीण भागातील ग्राहकांना मोठा फटका बसतो आहे. वाढती इंटरनेट व कॉल्सचा सेवा लहरींच्या कार्यक्षमतेवरच परिणाम होतो ही बाब असली तरी त्यासाठीची आधुनिक साधनसामग्री तालुक्यात पुरविण्यात आली आहे. मात्र ती कार्यान्वित करण्यात आणि अधिकची सामग्री मिळाली नसल्यानेच सेवा सुरळीत करण्यास अडचणी येत आहेत. त्याचा परिणाम मात्र ग्राहकांच्या सेवेवर होऊन ते दूर जाण्यात होतो आहे. याबाबत खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी नाशिक जिल्ह्यातील दूरसंचार सेवेसंदर्भात प्रश्न संसदेत उपस्थित केला होता. येत्या काळातही याबाबत पाठपुरावा केला जाणार असल्याचे सांगण्यात आले.(वार्ताहर)