शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटकांनो सावधान...पुढे धोका आहे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:11 IST

घोटी : नाशिक तसेच नगर जिल्ह्याच्या सरहद्दीवर इगतपुरी तालुक्यातील पर्यटन स्थळी, गड, किल्ले, धरणाचा परिसर, सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये जाणार ...

घोटी : नाशिक तसेच नगर जिल्ह्याच्या सरहद्दीवर इगतपुरी तालुक्यातील पर्यटन स्थळी, गड, किल्ले, धरणाचा परिसर, सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये जाणार असाल तर सावधान. कारण गेल्या दीड वर्षापासून कोरोनामुळे ही पर्यटनस्थळे बंद असून, या मानवी वावर कमी झाल्याने हिंस्र श्वापदांचा संचार वाढला आहे, तर अनेक ठिकाणी झाडी वाढून वाटा बंद झाल्या आहेत. त्यामुळे पावसाळी पर्यटनाला जाताना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे.

नाशिक-नगरच्या सरहद्दीवरील सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये गिर्यारोहकांसाठी आवडीचे किल्ले आहेत. त्यात अलंगगड, मदनगड, कुलंगगड यांचेसह

हरिहरगड, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसूबाई, त्रिंगलवाडी किल्ला, विश्रामगड, औंदागड, कावनई किल्ला, भास्करगड, बितनगड, मोरधन, बळवंतगड या प्रमुख किल्ल्यांचा समावेश आहे. या किल्ल्यांवरील वनराई दोन वर्षांच्या काळात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या ठिकाणचे रस्ते निसरडे झाले आहेत. झाडी वाढल्याने वाटा बंद झाल्या असल्याने किल्ले, शिखर सर करणे धोक्याचे बनले आहे.

लॉकडाऊनमुळे घरातच बसून कंटाळा आलेल्या पर्यटकांना आता इगतपुरीचा परिसर खुणावू लागला आहे. इगतपुरी तालुक्यासह नगर जिल्ह्यातील भंडारदरा, ठाणे जिल्ह्यातील विहीगाव येथील अशोका फॉल्स, इगतपुरी तालुक्यातील भावली धबधबा, काळुस्ते धरण, भाम धरण, वैतरणा धरण, कसारा घाट अशा विविध ठिकाणी पर्यटकांचा ओघ मोठ्या प्रमाणात असतो.

शनिवार, रविवार विकेंडला ठाणे, मुंबई, नाशिक, नगर जिल्ह्यातील पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करीत असतात. या पर्यटन स्थळावर कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून पोलिसांनी नाकाबंदी केली असली तरी छुप्या मार्गाने पर्यटक जात आहेत; परंतु पर्यटन स्थळावरील धबधबे, धरण स्थळावरील जमीन दलदलीची झाली असल्याने धोके वाढले आहेत. तलाव, धरणांचे किनाऱ्यावर पाण्याचा अंदाज येत नसल्याने मोठ्या संकटांना सामोरे जावे लागू शकते. येणाऱ्या पावसाळ्यात पर्यटनस्थळी स्वतःला व कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी पाण्यामध्ये, जंगलात न उतरण्याचा सल्ला वन विभागाचे अधिकारी व गिर्यारोहकांनी दिला आहे.

इन्फो

निर्जनस्थळी धोका अधिक...

गेल्या दीड वर्षापासून जंगलात मानवी वावर कमी झाल्याने हिंस्र श्वापदांचा वावर वाढला आहे. त्यांच्या संख्येतही वाढ झाल्याचे वन विभागाकडून सांगण्यात येत आहे. झाडेझुडपे वाढल्याने घनदाट अरण्य तयार झाले आहे. काजवा महोत्सव दरवर्षी भंडारदरा परिसरात भरत असतो. यावर्षी मोठ्या संकटाचा सामना पर्यटकांना करावा लागला आहे. सध्या पावसाला सुरुवात झाली आहे. धबधबे मुक्तपणे ओसंडून वाहायला सुरुवात झाली आहे. हा परिसर पर्यटकांना खुणावत असला तरी निर्जनस्थळी जाणे धोकादायक ठरू शकते.

कोट:

पर्यावरणाचा आस्वाद घेण्यासाठी यावर्षी स्वतःसह परिवाराला निर्जनस्थळी जाणे टाळणे गरजेचे आहे. निसरडे रस्ते, वाढती वनराई यामुळे पर्यटन स्थळावरील धोके वाढले आहेत. माहितीच्या ठिकाणीच जावे. लहान मुलांना शक्यतो जंगलात घेऊन जाणे टाळावे. किल्ल्यावर चढाई करणे यावर्षी जिकरीचे असून काही किल्ल्यांवरील वाटा नष्ट झाल्या आहेत. जास्त पर्जन्यवृष्टी होणाऱ्या ठिकाणी जाणे टाळावे. धबधब्यावरील संभाव्य धोका वाढल्याने काळजी घेण्याची गरज आहे.

-भगीरथ मराडे, गिर्याराेहक