लॉकडाऊनमधील पर्यटनबंदी केवळ कागदावरच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2020 11:47 PM2020-07-06T23:47:24+5:302020-07-07T01:25:01+5:30

नाशिक जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण फैलावत आहे. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी पर्यटनस्थळांवर बंदी कायम ठेवली आहे. मात्र त्र्यंबकेश्वर, भावली, गंगापूर भागात रविवारी (दि.५) झालेल्या गर्दीमुळे ही बंदी केवळ कागदावरच आहे की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Tourism ban in lockdown only on paper! | लॉकडाऊनमधील पर्यटनबंदी केवळ कागदावरच!

लॉकडाऊनमधील पर्यटनबंदी केवळ कागदावरच!

Next
ठळक मुद्देवर्षासहली सर्रास सुरू : गंगापूर, अंजनेरी, त्र्यंबकेश्वर, भावली भागात लोंढे

नाशिक : जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण फैलावत आहे. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी पर्यटनस्थळांवर बंदी कायम ठेवली आहे. मात्र त्र्यंबकेश्वर, भावली, गंगापूर भागात रविवारी (दि.५) झालेल्या गर्दीमुळे ही बंदी केवळ कागदावरच आहे की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
नाशिक शहर व परिसरातील लोक वीकेण्डला पावसाळी सहलींचा आनंद घेण्यासाठी शहराबाहेरील निसर्गरम्य ठिकाणी तसेच धरण परिसरांमध्ये भटकंतीकरिता बाहेर पडत असल्याचे चित्र आहे. यामध्ये तरुणाईची संख्या अधिक आहे. लॉकडाऊन शिथिल करण्यात आला असला तरीदेखील पर्यटनाकरिता प्रवासावर निर्बंध कायम आहे. मात्र नागरिक नियम झुगारून पावसाळी सहलींचा आनंद लुटण्यासाठी अंजनेरी, पहिने-पेगलवाडी परिसरातील ओहोळ व धबधब्याच्या ठिकाणी गर्दी करत असल्याने पोलिसांकडून नाकाबंदी करत दंडात्मक कारवाई केली जात आहे. तसेच हरसूल पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक विशाल टकले यांच्या मार्गदर्शनाखाली कश्यपी धरण परिसरात गस्त सुरू होती.
शहरासह जिल्ह्यात यावर्षी कोरोनाचे संक्रमण तेजीत असल्यामुळे नागरिकांनी पर्यटनासाठी घराबाहेर पडू नये तसेच पावसाळ्यात धरण परिसर, धबधबे व डोंगररांगा, घाटमाथ्याच्या परिसरात भटकंती टाळावी जेणेकरून दुर्घटनांना निमंत्रण मिळणार नाही. तीन दिवसांपूर्वीच वासाळी शिवारातील एका पाझर तलावात बुडून अंबडमधील दोघा मित्रांचा मृत्यू झाला होता.
भावली धरणाकडे जाणाºया पिंप्रीसदो गावाच्या फाट्यावर महामार्गालगतच इगतपुरी पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात आली आहे. या ठिकाणावरून पर्यटकांना माघारी पाठविले जात होते. तसेच पिंप्रीसदो ते थेट भावली धबधब्यापर्यंत पोलिसांनी गस्तही वीकेण्डला वाढविली होती.कोरोनामुळे या भागातील वर्षासहल पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.
कोरोनामुळे जिल्ह्यात कोठेही पर्यटनासाठी जाण्यास परवानगी नाही. यामुळे नागरिकांनी इगतपुरी, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील धरण, धबधब्यांच्या परिसरात निसर्गरम्य ठिकाणी जाणे टाळावे. पोलीस ठाणेप्रमुखांना कारवाई करण्याचे आदेश दिले आहे.
- डॉ. आरती सिंह
पोलीस अधीक्षक, नाशिक जिल्हा

Web Title: Tourism ban in lockdown only on paper!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.