शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
4
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
5
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
6
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
7
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
8
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
9
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
10
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
11
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
12
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
13
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
14
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
15
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
16
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
17
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
18
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
19
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
20
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 

टमाट्याला कवडीमोल भाव : तोडणी बंद करण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 00:22 IST

बागलाण तालुक्यातील ग्रामीण भागासह पश्चिम पट्ट्यात सध्या टमाट्याला घरातून पैसे टाकूनही केवळ तीन ते चार रुपये किलो बाजारभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना टमाट्याची तोडणी बंद करण्याची वेळ आली आहे.

औंदाणे : बागलाण तालुक्यातील ग्रामीण भागासह पश्चिम पट्ट्यात सध्या टमाट्याला घरातून पैसे टाकूनही केवळ तीन ते चार रुपये किलो बाजारभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना टमाट्याची तोडणी बंद करण्याची वेळ आली आहे.  येथील ग्रामीण भागात औंदाणे, तरसाळी, भाक्षी, मुळाणे, मुंजवाड परिसरातील तळवाडे दिगर, किकवारी, दसाणे, केरसाणे, मोरकुरे, पठावे, डांगसौंदाणे, जोरण आदी गावांतील शेतकºयांनी टमाट्याला चांगला बाजारभाव मिळेल या आशेने मोठ्या प्रमाणात लागवड केली; मात्र सध्या टमाट्यास अतिशय कमी बाजारभाव मिळत आहे. या बाजारभावात शेतकºयाचा खर्चसुद्धा निघत नाही.  शेतकरी मेटाकुटीस आला आहे. कारण टमाट्याला औषध फवारणी, बांधणी, मिल्चिंग पेपर, तसेच मांडव व तोडणी असा एकरी एक लाख रुपये खर्च करूनही आज टमाट्याला तीन-चार रुपये प्रतिकिलो दर मिळत असल्यामुळे शेतकºयांचा खर्चही निघत नाही. त्यामुळे टमाटे तोडून बाजारात विक्रीसाठी नेले असता त्याचा खर्च-सुद्धा निघत नाही व उलट शेतकºयांना पदरचे पैसे भरावे लागतात. गेली दोन-तीन वर्षं टमाटे पिकामध्ये शेतकºयांना फटका बसत आहे. हल्ली कोणत्याही कारणाने टमाट्याला भाव मिळत नाही. या पिकाला खर्च मोठ्या प्रमाणावर येतो. टमाटे हे नाशवंत पीक असल्यामुळे ते साठवून ठेवता येत नाही. बहुतेक शेतकºयांनी टमाट्याची शेतातील तोडणी बंद केली आहे. त्यामुळे शेतात टमाट्याचा खच पडला आहे.सध्या तळवाडे दिगर व परिसरातील टमाटे उत्पादक शेतकरी आपला माल सूरत, नवापूर, नंदुरबार, मालेगाव, बिल्ली मोरा आदी शहरात विक्र ीसाठी नेत आहे. मात्र, तिथे प्रतिक्रेट्स (जाळी) सरासरी ५० ते ६० दर मिळत असून, माल नेण्याचे भाडे ४५ ते ५० रु पये त्यात तोलाई, वाराई, हमाली जाते.शेतकºयांना टमाटे तोडणीसाठी १५ रु पये प्रतिक्रेट्स खर्च येतो म्हणजे ते बाजारात नेण्यासाठी ५० ते ६० रुपये खर्च येतो. तेवढाच भाव मिळत असल्यामुळे बाकीचा खर्च घरातून टाकण्याची वेळ आज टमाटे उत्पादक शेतकºयांवर आली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी