शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
3
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
4
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
5
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
6
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
7
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
8
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
9
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
10
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
11
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
12
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
13
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
14
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
15
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
16
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
17
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
18
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
19
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
20
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली

टमाट्याला कवडीमोल भाव : तोडणी बंद करण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 00:22 IST

बागलाण तालुक्यातील ग्रामीण भागासह पश्चिम पट्ट्यात सध्या टमाट्याला घरातून पैसे टाकूनही केवळ तीन ते चार रुपये किलो बाजारभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना टमाट्याची तोडणी बंद करण्याची वेळ आली आहे.

औंदाणे : बागलाण तालुक्यातील ग्रामीण भागासह पश्चिम पट्ट्यात सध्या टमाट्याला घरातून पैसे टाकूनही केवळ तीन ते चार रुपये किलो बाजारभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना टमाट्याची तोडणी बंद करण्याची वेळ आली आहे.  येथील ग्रामीण भागात औंदाणे, तरसाळी, भाक्षी, मुळाणे, मुंजवाड परिसरातील तळवाडे दिगर, किकवारी, दसाणे, केरसाणे, मोरकुरे, पठावे, डांगसौंदाणे, जोरण आदी गावांतील शेतकºयांनी टमाट्याला चांगला बाजारभाव मिळेल या आशेने मोठ्या प्रमाणात लागवड केली; मात्र सध्या टमाट्यास अतिशय कमी बाजारभाव मिळत आहे. या बाजारभावात शेतकºयाचा खर्चसुद्धा निघत नाही.  शेतकरी मेटाकुटीस आला आहे. कारण टमाट्याला औषध फवारणी, बांधणी, मिल्चिंग पेपर, तसेच मांडव व तोडणी असा एकरी एक लाख रुपये खर्च करूनही आज टमाट्याला तीन-चार रुपये प्रतिकिलो दर मिळत असल्यामुळे शेतकºयांचा खर्चही निघत नाही. त्यामुळे टमाटे तोडून बाजारात विक्रीसाठी नेले असता त्याचा खर्च-सुद्धा निघत नाही व उलट शेतकºयांना पदरचे पैसे भरावे लागतात. गेली दोन-तीन वर्षं टमाटे पिकामध्ये शेतकºयांना फटका बसत आहे. हल्ली कोणत्याही कारणाने टमाट्याला भाव मिळत नाही. या पिकाला खर्च मोठ्या प्रमाणावर येतो. टमाटे हे नाशवंत पीक असल्यामुळे ते साठवून ठेवता येत नाही. बहुतेक शेतकºयांनी टमाट्याची शेतातील तोडणी बंद केली आहे. त्यामुळे शेतात टमाट्याचा खच पडला आहे.सध्या तळवाडे दिगर व परिसरातील टमाटे उत्पादक शेतकरी आपला माल सूरत, नवापूर, नंदुरबार, मालेगाव, बिल्ली मोरा आदी शहरात विक्र ीसाठी नेत आहे. मात्र, तिथे प्रतिक्रेट्स (जाळी) सरासरी ५० ते ६० दर मिळत असून, माल नेण्याचे भाडे ४५ ते ५० रु पये त्यात तोलाई, वाराई, हमाली जाते.शेतकºयांना टमाटे तोडणीसाठी १५ रु पये प्रतिक्रेट्स खर्च येतो म्हणजे ते बाजारात नेण्यासाठी ५० ते ६० रुपये खर्च येतो. तेवढाच भाव मिळत असल्यामुळे बाकीचा खर्च घरातून टाकण्याची वेळ आज टमाटे उत्पादक शेतकºयांवर आली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी