शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

टमाटे दोन रुपये किलो !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 00:11 IST

सध्या टोमॅटोचा दर फारच कमी झाला आहे. पाकिस्तानने भारताकडून शेतमाल आयातबंदीचा निर्णय घेतल्याने त्याचा थेट फटका लासलगावच्या टोमॅटोला बसला आहे.

लासलगाव : सध्या टोमॅटोचा दर फारच कमी झाला आहे. पाकिस्तानने भारताकडून शेतमाल आयातबंदीचा निर्णय घेतल्याने त्याचा थेट फटका लासलगावच्या टोमॅटोला बसला आहे. टोमॅटोचे दर मध्यंतरी एक हजार रुपयांपर्यंत पोहोचले होते; मात्र टोमॅटोची निर्यात पूर्णपणे बंद झाल्याने तोच टोमॅटो आज दोनशे रु पये भावाने विक्री होत आहे. म्हणजेच शेतकºयांच्या हाती प्रतिकिलो दोन ते दहा रु पये इतकेच मोल पडत आहे.लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आॅगस्ट महिन्यात टोमॅटोची ७६९४५ क्र ेट्स इतकी आवक झाली होती. या टोमॅटोला कमीत कमी ५१ रु पये, जास्तीत जास्त एक हजार रुपये तर सरासरी सातशे रुपयांपर्यंत भाव मिळाले होते. सप्टेंबर महिन्यात ३३१३२६ क्र ेट्स एवढी मोठ्या प्रमाणात टोमॅटोची आवक लासलगाव बाजार समितीत झाली होती; मात्र आॅगस्ट महिन्याच्या तुलनेत सप्टेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात टोमॅटोच्या दरात घसरण पाहायला मिळाली. टोमॅटोचे दर जास्तीत जास्त ४२१ इतके तर सरासरी केवळ २०० रुपये इतका दर टोमॅटोला मिळाल्याने शेतकºयांच्या पदरी मोठी निराशा पडली आहे. सर्वात जास्त शेतमालाची आयात करणाºया पाकिस्तानने आज भारताकडून कुठलाही शेतमाल न घेण्याचा निर्णय घेतल्याने पाकिस्तानची बॉर्डर लासलगावच्या टोमॅटोसाठीही बंद पडली आहे, त्यामुळे त्याचा थेट फटका टोमॅटोच्या भावावर झाला आहे. हजार रुपयांचा टोमॅटो आज कवडीमोल भावाने विकण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे. मध्य प्रदेश, रतलाम, शिवपुरी या ठिकाणी स्थानिक मालाचे आगमन झाल्याने तेथेही नाशिक जिल्ह्यातील टोमॅटोला मागणी नाही. अशा परिस्थितीत वातावरणात दररोज मोठे बदल होत असल्याने टोमॅटो पाणी सोडत आहे. आपल्याकडे कांद्याचे दर वाढले की भारत सरकारकडून कांदा पाकिस्तानातून आयात केला जातो; मात्र आज टोमॅटोच्या बाबतीत ही वेळ आल्याने सरकार टोमॅटोचे दर वाढण्यासाठी पाकिस्तानची बॉर्डर खुली करणार का असा प्रश्न शेतकºयांना पडला आहे. ााकिस्तान बॉर्डर खुली झाली तर शेतकर्यांच्या हाती चार पैसे मिळतील व शेतकरयांचे नुकसान टळेल त्यामुळे भारत सरकारच्या निर्णयाकडे टोमॅटो उत्पादक लक्ष लावून आहेत .