शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
3
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
4
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
5
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
6
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
7
Dahi Handi 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
8
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
9
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
10
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
11
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
12
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
13
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
14
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
15
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
16
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
17
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
18
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
19
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
20
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द

टमाटे दोन रुपये किलो !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 00:11 IST

सध्या टोमॅटोचा दर फारच कमी झाला आहे. पाकिस्तानने भारताकडून शेतमाल आयातबंदीचा निर्णय घेतल्याने त्याचा थेट फटका लासलगावच्या टोमॅटोला बसला आहे.

लासलगाव : सध्या टोमॅटोचा दर फारच कमी झाला आहे. पाकिस्तानने भारताकडून शेतमाल आयातबंदीचा निर्णय घेतल्याने त्याचा थेट फटका लासलगावच्या टोमॅटोला बसला आहे. टोमॅटोचे दर मध्यंतरी एक हजार रुपयांपर्यंत पोहोचले होते; मात्र टोमॅटोची निर्यात पूर्णपणे बंद झाल्याने तोच टोमॅटो आज दोनशे रु पये भावाने विक्री होत आहे. म्हणजेच शेतकºयांच्या हाती प्रतिकिलो दोन ते दहा रु पये इतकेच मोल पडत आहे.लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आॅगस्ट महिन्यात टोमॅटोची ७६९४५ क्र ेट्स इतकी आवक झाली होती. या टोमॅटोला कमीत कमी ५१ रु पये, जास्तीत जास्त एक हजार रुपये तर सरासरी सातशे रुपयांपर्यंत भाव मिळाले होते. सप्टेंबर महिन्यात ३३१३२६ क्र ेट्स एवढी मोठ्या प्रमाणात टोमॅटोची आवक लासलगाव बाजार समितीत झाली होती; मात्र आॅगस्ट महिन्याच्या तुलनेत सप्टेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात टोमॅटोच्या दरात घसरण पाहायला मिळाली. टोमॅटोचे दर जास्तीत जास्त ४२१ इतके तर सरासरी केवळ २०० रुपये इतका दर टोमॅटोला मिळाल्याने शेतकºयांच्या पदरी मोठी निराशा पडली आहे. सर्वात जास्त शेतमालाची आयात करणाºया पाकिस्तानने आज भारताकडून कुठलाही शेतमाल न घेण्याचा निर्णय घेतल्याने पाकिस्तानची बॉर्डर लासलगावच्या टोमॅटोसाठीही बंद पडली आहे, त्यामुळे त्याचा थेट फटका टोमॅटोच्या भावावर झाला आहे. हजार रुपयांचा टोमॅटो आज कवडीमोल भावाने विकण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे. मध्य प्रदेश, रतलाम, शिवपुरी या ठिकाणी स्थानिक मालाचे आगमन झाल्याने तेथेही नाशिक जिल्ह्यातील टोमॅटोला मागणी नाही. अशा परिस्थितीत वातावरणात दररोज मोठे बदल होत असल्याने टोमॅटो पाणी सोडत आहे. आपल्याकडे कांद्याचे दर वाढले की भारत सरकारकडून कांदा पाकिस्तानातून आयात केला जातो; मात्र आज टोमॅटोच्या बाबतीत ही वेळ आल्याने सरकार टोमॅटोचे दर वाढण्यासाठी पाकिस्तानची बॉर्डर खुली करणार का असा प्रश्न शेतकºयांना पडला आहे. ााकिस्तान बॉर्डर खुली झाली तर शेतकर्यांच्या हाती चार पैसे मिळतील व शेतकरयांचे नुकसान टळेल त्यामुळे भारत सरकारच्या निर्णयाकडे टोमॅटो उत्पादक लक्ष लावून आहेत .