शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

टमाटे दोन रुपये किलो !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 00:11 IST

सध्या टोमॅटोचा दर फारच कमी झाला आहे. पाकिस्तानने भारताकडून शेतमाल आयातबंदीचा निर्णय घेतल्याने त्याचा थेट फटका लासलगावच्या टोमॅटोला बसला आहे.

लासलगाव : सध्या टोमॅटोचा दर फारच कमी झाला आहे. पाकिस्तानने भारताकडून शेतमाल आयातबंदीचा निर्णय घेतल्याने त्याचा थेट फटका लासलगावच्या टोमॅटोला बसला आहे. टोमॅटोचे दर मध्यंतरी एक हजार रुपयांपर्यंत पोहोचले होते; मात्र टोमॅटोची निर्यात पूर्णपणे बंद झाल्याने तोच टोमॅटो आज दोनशे रु पये भावाने विक्री होत आहे. म्हणजेच शेतकºयांच्या हाती प्रतिकिलो दोन ते दहा रु पये इतकेच मोल पडत आहे.लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आॅगस्ट महिन्यात टोमॅटोची ७६९४५ क्र ेट्स इतकी आवक झाली होती. या टोमॅटोला कमीत कमी ५१ रु पये, जास्तीत जास्त एक हजार रुपये तर सरासरी सातशे रुपयांपर्यंत भाव मिळाले होते. सप्टेंबर महिन्यात ३३१३२६ क्र ेट्स एवढी मोठ्या प्रमाणात टोमॅटोची आवक लासलगाव बाजार समितीत झाली होती; मात्र आॅगस्ट महिन्याच्या तुलनेत सप्टेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात टोमॅटोच्या दरात घसरण पाहायला मिळाली. टोमॅटोचे दर जास्तीत जास्त ४२१ इतके तर सरासरी केवळ २०० रुपये इतका दर टोमॅटोला मिळाल्याने शेतकºयांच्या पदरी मोठी निराशा पडली आहे. सर्वात जास्त शेतमालाची आयात करणाºया पाकिस्तानने आज भारताकडून कुठलाही शेतमाल न घेण्याचा निर्णय घेतल्याने पाकिस्तानची बॉर्डर लासलगावच्या टोमॅटोसाठीही बंद पडली आहे, त्यामुळे त्याचा थेट फटका टोमॅटोच्या भावावर झाला आहे. हजार रुपयांचा टोमॅटो आज कवडीमोल भावाने विकण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे. मध्य प्रदेश, रतलाम, शिवपुरी या ठिकाणी स्थानिक मालाचे आगमन झाल्याने तेथेही नाशिक जिल्ह्यातील टोमॅटोला मागणी नाही. अशा परिस्थितीत वातावरणात दररोज मोठे बदल होत असल्याने टोमॅटो पाणी सोडत आहे. आपल्याकडे कांद्याचे दर वाढले की भारत सरकारकडून कांदा पाकिस्तानातून आयात केला जातो; मात्र आज टोमॅटोच्या बाबतीत ही वेळ आल्याने सरकार टोमॅटोचे दर वाढण्यासाठी पाकिस्तानची बॉर्डर खुली करणार का असा प्रश्न शेतकºयांना पडला आहे. ााकिस्तान बॉर्डर खुली झाली तर शेतकर्यांच्या हाती चार पैसे मिळतील व शेतकरयांचे नुकसान टळेल त्यामुळे भारत सरकारच्या निर्णयाकडे टोमॅटो उत्पादक लक्ष लावून आहेत .