शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

नाशिक बाजार समितीत टमाटा २ रुपये किलो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 01:04 IST

गेल्या काही वर्षांपूर्वी ५० ते ६० रुपये प्रतिकिलो असा बाजारभाव गाठणाऱ्या टमाटा मालाला नाशिक बाजार समितीत प्रति २० किलो जाळीला केवळ ४० रुपये (२ रुपये प्रतिकिलो) असा मातीमोल बाजारभाव मिळत असल्याने नाशिक परिसरासह जिल्ह्यातील शेकडो टमाटा उत्पादक शेतकºयांनी नाराजी व्यक्त केली आहे.

संदीप झिरवाळ ।पंचवटी : गेल्या काही वर्षांपूर्वी ५० ते ६० रुपये प्रतिकिलो असा बाजारभाव गाठणाऱ्या टमाटा मालाला नाशिक बाजार समितीत प्रति २० किलो जाळीला केवळ ४० रुपये (२ रुपये प्रतिकिलो) असा मातीमोल बाजारभाव मिळत असल्याने नाशिक परिसरासह जिल्ह्यातील शेकडो टमाटा उत्पादक शेतकºयांनी नाराजी व्यक्त केली आहे. गुजरातसह अन्य राज्यांत स्थानिक टमाटा माल सुरू झाल्याने तसेच राज्यातील काही जिल्ह्यातील टमाटा मुंबई व उपनगरात मोठ्या प्रमाणात विक्र ीसाठी दाखल होत असल्याने बाजारभाव कोसळले असल्याचे व्यापाºयांनी सांगितले. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून टमाटा मालाला २ ते ३ रुपये किलोच्या पुढे बाजारभाव नसल्याने काही टमाटा उत्पादक शेतकºयांनी टमाटा खुडणे बंद करून टमाट्याचे उभे पीक जनावरांसाठी सोडून दिले आहे. गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील काही ठिकाणच्या भागात नाशिकच्या बाजार समितीतून पाठविल्या जाणाºया टमाटा मालाची निर्यात थांबली आहे. तर गेल्या वर्षभरापासून भारत-पाकिस्तान बॉर्डर बंद असल्याने नाशिकच्या बाजार समितीतून पाकिस्तान, बांगलादेशात टमाटा माल पाठविणे बंद केले आहे. सध्या गुजरात राज्यातील वापीपर्यंत टमाटा माल जात आहे.  याशिवाय मुंबईकडे घोटी, नाशिक, वाडा परिसरातून टमाटा मालाची निर्यात केली जात आहे. व्यापारी वर्गाकडून टमाटा खरेदी केला जात असला तरी टमाटा मालाला उठाव कमी असल्याने खरेदी करायला कोणी पुढे येत नसल्याचे चित्र आहे.  नाशिक बाजार समितीत काही दिवसांपासून टमाट्याच्या २० किलो जाळीला ४० ते ६० रुपये असा अत्यल्प बाजारभाव मिळत आहे. योग्य बाजारभाव मिळत नाही तसेच लागवड व दळणवळण खर्च निघत नसल्याने टमाटा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. किरकोळ व आठवडे बाजारात १० रुपयांत दीड ते दोन किलो दराने ग्राहकांना टमाटा उपलब्ध होत आहे.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डFarmerशेतकरी