शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
2
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
3
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
4
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
5
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
6
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
7
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
8
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
9
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
10
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
11
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
12
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
13
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
14
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
15
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
16
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
17
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
18
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
19
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
20
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक

टमाटा २ रूपये किलो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 15:17 IST

४० रूपये जाळी,  बॉर्डर बंदमुळे परदेशात निर्यात बंद,शेतकरी चिंतातूर

ठळक मुद्दे४० रूपये जाळी  बॉर्डर बंदमुळे परदेशात निर्यात बंद,शेतकरी चिंतातूर

संदीप झिरवाळपंचवटी :  गेल्या काही वर्षभरापुर्वी ५० ते ६० रूपये प्रतिकिलो असा बाजारभाव गाठणाऱ्या टमाटा मालाला नाशिक बाजारसमितीत प्रति २० किलो जाळीला केवळ ४० रूपये (२ रूपये प्रति किलो) असा मातीमोल बाजारभाव मिळत असल्याने नाशिक जिल्हयातील शेकडो टमाटा उत्पादक शेतकºयांनी नाराजी व्यक्त केली आहे. गुजरातसह अन्य राज्यात स्थानिक टमाटा माल सुरू झाल्याने तसेच राज्यातील काही जिल्हयातील टमाटा मुंबई व उपनगरात मोठया प्रमाणात विक्र ीसाठी दाखल होत असल्याने बाजारभाव कोसळले असल्याचे व्यापाºयांनी सांगितले. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून टमाटा मालाला २ ते ३ रूपये किलोच्या पुढे बाजारभाव नसल्याने काही टमाटा उत्पादक शेतकºयांनी टमाटा खुडणे बंद करून टमाटयाचे उभे पिक जनावरांसाठी सोडून दिले आहे. गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील काही ठिकाणच्या भागात नाशिकच्या बाजारसमितीतून पाठविल्या जाणाºया टमाटा मालाची निर्यात थांबली आहे. तर गेल्या वर्षभरापासून भारत पाकिस्तान बॉर्डर बंद असल्याने नाशिकच्या बाजारसमितीतून पाकिस्तान, बांग्लादेशात टमाटा माल पाठविणे बंद केले आहे. सध्या गुजरात राज्यातील वापी पर्यंत टमाटा माल जात आहे. याशिवाय मुंबईकडे घोटी, नाशिक, वाडा परिसरातून टमाटा मालाची निर्यात केली जात आहे. व्यापारी वर्गाकडून टमाटा खरेदी केली जात असला तरी टमाटा मालाला उठाव कमी असल्याने टमाटा खरेदी करायला कोणी पुढे येत नसल्याचे चित्र आहे. नाशिक बाजारसमितीत काही दिवसांपासून टमाटयाच्या २० किलो जाळीला ४० ते ६० रूपये असा अत्यल्प बाजारभाव मिळत आहे. योग्य बाजारभाव मिळत नाही तसेच लागवड व दळणवळण खर्च निघत नसल्याने टमाटा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. किरकोळ व आठवडे बाजारात १० रूपयात दिड ते दोन किलो दराने ग्राहकांना टमाटा उपलब्ध होत आहे. सध्या टमाटा मालाची आवक आहे तर उठाव नाही. त्यातच अन्य बाजारपेठेतून माल खरेदी करून तो दुसºया बाजारपेठेत रवाना करण्यासाठी मोठा दळणवळण खर्च लागतो. परिणामी व्यापारी देखिल स्थानिक बाजारपेठेतून टमाटा खरेदी करून अन्यत्र पाठवित असल्याने पैशांची व वेळेचीही बचत होत आहे.

टॅग्स :Nashikनाशिकagricultureशेती