शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
2
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
3
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
4
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
5
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
6
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
7
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
8
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
9
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
10
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
11
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
12
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
13
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
14
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
15
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
16
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
17
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
18
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
19
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
20
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक

दुष्काळसदृश परिस्थितीचा आज आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 01:55 IST

आॅगस्टचा दुसरा आठवडा उलटूनही जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये सरासरीच्या ५० टक्केही पाऊस न पडल्यामुळे शेतकऱ्यांची पीक पेरणी वाया जाण्याची तसेच दुबार पेरणीही होण्याची शक्यता मावळल्यामुळे निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीचा मंगळवारी आढावा घेण्यात येणार आहे.

नाशिक : आॅगस्टचा दुसरा आठवडा उलटूनही जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये सरासरीच्या ५० टक्केही पाऊस न पडल्यामुळे शेतकऱ्यांची पीक पेरणी वाया जाण्याची तसेच दुबार पेरणीही होण्याची शक्यता मावळल्यामुळे निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीचा मंगळवारी आढावा घेण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकाºयांनी सर्व संबंधित खात्याच्या प्रमुखांची बैठक बोलाविली आहे.जिल्ह्यात ९७ टक्के पीक पेरणी झाली असली तरी, जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्या-पासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे अगोदरच उशिराने मान्सूनचे आगमन झाल्यामुळे पेरण्या लांबणीवर पडलेल्या असताना, आता पिकांना नेमक्या पाण्याची गरज असताना त्याने पाठ फिरविली आहे. पंधरा पैकी ८ तालुक्यांत ५० टक्केही पाऊस झालेला नसल्यामुळे तेथील पिके धोक्यात आली असून, आता पाऊस पडला तरी, दुबार पेरणीची संधीही शेतकºयांना मिळण्याविषयी साशंकता व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थितीत ग्रामीण भागातील पिण्याचे पाण्याचे स्त्रोत आटू लागल्याने टॅँकरची मागणी वाढली आहे. लोकप्रतिनिधींकडून रोहयो कामांची तसेच टॅँकरची मागणी केली जात आहे. त्यामुळे जिल्ह्णात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, त्याबाबतची माहिती जाणून घेण्यासाठी मंगळवारी जिल्हाधिकाºयांनी कृषी, महसूल, वीज, पाटबंधारे, भूजल सर्वेक्षण, पशुसंवर्धन, खात्याची संयुक्त बैठक बोलविली असून, त्यात पीक परिस्थिती, चाराटंचाई, प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेची सद्यस्थिती, टॅँकरने पाणीपुरवठा, धरणातील पाणीसाठा आदी माहिती मागविली आहे.

टॅग्स :droughtदुष्काळ