शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
3
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
4
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
5
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
6
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
7
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
8
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
9
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
10
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
11
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
12
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
13
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
14
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
15
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
16
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
17
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
18
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
19
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
20
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."

आज वाजणार शाळेची पहिली घंटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 01:00 IST

नाशिक : शालेय सुट्या संपून जून महिन्यात नवीन शैक्षणिक वर्षाला प्रारंभ होत असून, शुक्रवारी (दि. १५) सकाळी शाळेची पहिली घंटा वाजणार आहे. नवीन शैक्षणिक वर्षातील पहिल्या दिवसाची विद्यार्थी आणि पालकांनादेखील उत्सुकता आहे. नवीन गणवेश, नवी कोरी पुस्तके, नवे मित्र-मैत्रिणी आणि जुन्या मित्रांची भेट अशा उत्सुकतेच्या वातावरणात पुन्हा एकदा शाळेच्या परिसरात किलबिलाट होणार असून, सुमारे दीड हजार चिमुकले शाळेत पहिले पाऊल ठेवणार आहे.

ठळक मुद्देशाळा सज्ज : नवागतांच्या स्वागताची तयारी; शाळांच्या आवारात पुन्हा होणार किलबिलाट

नाशिक : शालेय सुट्या संपून जून महिन्यात नवीन शैक्षणिक वर्षाला प्रारंभ होत असून, शुक्रवारी (दि. १५) सकाळी शाळेची पहिली घंटा वाजणार आहे. नवीन शैक्षणिक वर्षातील पहिल्या दिवसाची विद्यार्थी आणि पालकांनादेखील उत्सुकता आहे. नवीन गणवेश, नवी कोरी पुस्तके, नवे मित्र-मैत्रिणी आणि जुन्या मित्रांची भेट अशा उत्सुकतेच्या वातावरणात पुन्हा एकदा शाळेच्या परिसरात किलबिलाट होणार असून, सुमारे दीड हजार चिमुकले शाळेत पहिले पाऊल ठेवणार आहे.नवीन शैक्षणिक वर्षाला शुक्रवारपासून प्रारंभ होणार असून, शासनाच्या परिपत्रकानुसार जिल्ह्यातील सर्वच शाळा शुक्रवारी सुरू होणार आहेत. शाळेचा पहिला दिवस हा विद्यार्थ्यांच्या स्वागताचा असल्याने शाळेत प्रथम पाऊल ठेवणाºया चिमुकल्याचे स्वागत केले जाणार आहे. ग्रामीण भागात चिमुकल्यांच्या मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे तर शहरात अनेक शाळांनी नावीन्यपूर्ण कल्पना राबवून मुलांच्या स्वागताची तयारी केली आहे.शाळा सुरू होण्याच्या एक दिवस अगोदरच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाºयांनी शाळेचे रंगरूप पालटले आहे. असंख्य शाळा नव्या रंगात रंगल्या आहेत तर शाळांचा परिसर आणि वर्गखोल्या फुलांनी तसेच चित्रांनी सजविण्यात आलेल्या आहेत. सर्व शिक्षा अभियानांतर्गत शाळेच्या पहिल्या दिवशी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना नवीन पाठ्यपुस्तकांचे वाटप केले जाणार आहे. यासाठीची सर्व तयारी शाळांनी केली असून पुस्तक वाटपाच्या कार्यक्रमाचीदेखील आखणी केलेली आहे. शहरातील अनुदानित, विनाअनुदानित तसेच मान्यताप्राप्त शाळा १५ तारखेला सुरू होणार आहेत. शहारातील महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्ताकांचे वाटप केले जाणार आहे.समायोजनामुळे गजबजणार शाळायंदा अनेक शाळांचे समायोजन करण्यात आल्याने शाळांमध्ये विद्यार्थी संख्या वाढणार असून, पुरेशी शिक्षकसंख्यादेखील असल्याने विद्यार्थ्यांची सोय होणार असल्याचे शिक्षण विभागाने म्हटले आहे. कमी पटसंख्या असलेल्या शाळा यंदा बंद करून जवळच्या शाळेत स्थलांतरित करण्यात आले आहे. शहर आणि जिल्ह्यात एकूण सुमारे ७५ शाळांचे समायोजन करण्यात आल्याने ओस पडलेल्या शाळा गजबजणार आहेत.92महापालिकेच्या शाळा89शहरातील अनुदानित92शहरातील विनाअनुदानित1200माध्यमिक शाळा प्राथमिक शाळा3331