शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळीदरम्यानच करणार होते ब्लास्ट, पण...; दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात धक्कादायक खुलासा!
2
गुप्त दौरा... अन डील पक्की...! इस्रायल भारताला दोन शक्तिशाली क्षेपणास्त्रे देणार; पाकिस्तान, चीन सगळेच टप्प्यात...
3
Delhi Blast : "मला डिस्टर्ब करू नका, महत्त्वाचं काम करतोय..."; कुटुंबाशी अनेक महिने बोलायचा नाही उमर
4
गाड्या पुढे सरकल्या अन्....; दिल्ली कार स्फोटाचा 'तो' भीषण VIDEO पहिल्यांदाच समोर, CCTV पडले बंद
5
३० हजारांपेक्षा कमी आहे सॅलरी तरी, SIP द्वारे बनवू शकता १ कोटींचा फंड; महिन्याला किती करावी लागेल गुंतवणूक?
6
"सकाळी मुलीला शाळेत सोडायला गेली अन् पतीसह एकाने बंधक बनवले, मग..."; IAS पत्नीचा खळबळजनक दावा
7
Accident:पोलीस व्हॅनच्या धडकेत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, परिसरात हळहळ!
8
२३ नोव्हेंबरपर्यंत कोकण रेल्वेवर मेगा ब्लॉक; सेवांवर मोठा परिणाम, तुमचं तिकीट याच वेळेत आहे?
9
Samudra Shastra: नुसत्या हसण्यावरून स्वभाव ओळखता येतो? समुद्र शास्त्रात मिळते उत्तर
10
वनडे करिअर टिकवण्यासाठी हिटमॅन रोहित शर्माला BCCI ची 'ती' अट मान्य; विराट कोहलीचं काय?
11
Groww IPO Listing: केवळ ५% होता GMP, पण कंपनीची धमाकेदार एन्ट्री; पहिल्याच दिवशी 'या' शेअरनं दिला २३% पेक्षा जास्त फायदा
12
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणी महत्त्वाची अपडेट, संशयितांना कार विकणारा डीलर ताब्यात!
13
Delhi Blast : २६ जानेवारी, दिवाळीला स्फोट करण्याचा होता प्लॅन, पण...; दिल्ली स्फोट प्रकरणात मुझम्मिलचा मोठा खुलासा
14
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात आणखी एक दहशतवादी डॉक्टर अटकेत; देशभरात छापेमारी सुरू...
15
निवृत्तीनंतरचे जीवन सुरक्षित! एकदाच गुंतवणूक करा आणि आयुष्यभर १ लाखाहून अधिक पेन्शन मिळवा
16
“महायुती विजयी झाली पाहिजे”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांना सूचना
17
प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मैत्रिणीचा दिल्ली स्फोटात मृत्यू, दु:ख व्यक्त करत म्हणाली, "इतका क्रूर..."
18
कोल्हापूर: बिबट्याच्या हल्ल्यात बैल ठार, गगनबावडा तालुक्यात भीतीचे वातावरण
19
पतीसोबत तलाक, मग बनली प्रोफेसर; 'जैश-ए-मोहम्मद'मध्ये महिलांच्या भर्तीची होती जबाबदारी! दहशतवादी डॉ. शाहीनची संपूर्ण कुंडली
20
AQIS: मुंब्रा येथील शिक्षकाच्या घरावर एटीएसचा छापा; पुण्यातील'अल-कायदा' प्रकरणाशी कनेक्शन

आज आरटीईटी तिसरी सोडत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 01:15 IST

आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या आरटीई प्रवेशप्रक्रियेत दोन फेºया झाल्यानंतर तिसºया फेरीची प्रतीक्षा संपली असून, बुधवारी (दि.१३) आरटीई प्रवेशाची तिसरी सोडत काढण्यात येणार आहे; परंतु तांत्रिक अडचणींमुळे आॅनलाइन सिस्टिमद्वारे पालकांना एसएमएस पाठविले जाणार नाहीत.

नाशिक : आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या आरटीई प्रवेशप्रक्रियेत दोन फेºया झाल्यानंतर तिसºया फेरीची प्रतीक्षा संपली असून, बुधवारी (दि.१३) आरटीई प्रवेशाची तिसरी सोडत काढण्यात येणार आहे; परंतु तांत्रिक अडचणींमुळे आॅनलाइन सिस्टिमद्वारे पालकांना एसएमएस पाठविले जाणार नाहीत. त्यामुळे मुख्याध्यापकांनी पालकांना फोन करून माहिती द्यावी तसेच शाळेच्या नोटीस बोर्डवर यादी प्रदर्शित करावी अशा सूचाना शिक्षण विभागाने केल्या आहे. वेबसाइटच्या होमपेजवरही अर्जाचा क्रमांक टाकून विद्यार्थ्यांच्या पालकांना माहिती मिळविता येणार असल्याचे शिक्षण विभागाने कळविले आहे.  आरटीईच्या २५ टक्के राखीव प्रवेशासाठी जिल्हा परिषद कार्यालयात तिसरी लॉटरी काढण्यात येणार आहे. त्यानंतर पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी व मनपाचे शिक्षण मंडळ प्रशासन अधिकारी यांच्या कार्यालयात निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच शाळा मुख्याध्यापकांनाही त्यांच्या लॉगइनवर यादी उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्याचप्रमाणे नाशिक मनपा क्षेत्रासाठी पोलीस मुख्यालय परिसरातील शाळा क्रमांक १६ मध्येही निवड यादी उपलब्ध करून दिली जाणार आहे. आरटीई अंतर्गत आतापर्यंत दोन फेºयांमध्ये तीन हजार ३८२ विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले असून आरटीईच्या तीन हजार २०२ जागांसाठी बुधवारी (दि. १३) तिसरी सोडत काढली जाणार आहे.तिस-या फेरीसाठी ३ हजार २०२ जागाया सोडतीपूर्वी प्रवेशप्रक्रियेपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांनाही आॅनलाइन अर्ज दाखल करण्याची संधी मिळाली असून, या संधीचा ७०३ विद्यार्थ्यांना फायदा झाला आहे. त्यामुळे आता आरटीईसाठी एकूण ११ हजार ११८ अर्ज प्राप्त झाले असून, त्यापैकी प्रथम फेरीत निवड झालेल्या ३००१ विद्यार्थ्यांपैकी २१८४ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत, तर दुसºया फेरीत निवड झालेल्या १९०२ विद्यार्थ्यांपैकी ११९८ प्रवेश पूर्ण  झाले असून, आतापर्यंत निवड झालेल्या ४ हजार ९०३ जागांपैकी ३ हजार ३८२ जागांवर प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाली आहे. तिसºया फेरीसाठी ३ हजार २०२ जागा उपलब्ध असून, त्यासाठी उर्वरित विद्यार्थ्यांच्या अर्जांमधून बुधवारी सोडत काढण्यात येणार आहे.

टॅग्स :Schoolशाळा