शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
6
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
7
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
8
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
9
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
10
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
11
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
12
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
13
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
14
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
15
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
16
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
17
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

भेटी लागे जीवा...! संत निवृत्तिनाथांची पालखी थाटामाटात पंढरपूरकडे प्रस्थान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2022 11:31 IST

पालखी सोहळा सलग २७ दिवस चालणार आहे, १८ दिवस परतीचा प्रवास आहे.

त्र्यंबकेश्वर (नाशिक)- कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून खंडित झालेली संत निवृत्तिनाथांची आषाढी पायी दिंडी आज, सोमवारी सकाळी १० वाजता मोठ्या थाटामाटात पंढरपूरकडे रवाना झाली. निवृत्तीनाथांच्या पादुका चांदीच्या रथात विराजमान झाल्यानंतर कुशावर्त तीर्थावर वाजत गाजत नेण्यात आल्या, तेथे नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर यांनी सपत्नीक पूजा केली.

पालखी सोहळा सलग २७ दिवस चालणार आहे, १८ दिवस परतीचा प्रवास आहे. ९ जुलै रोजी पालखी पंढरपूरला पोहोचणार असून १० जुलैला एकादशीला निवृत्तीनाथांची विठुरायाशी भेट होणार आहे. सलग दोन वर्ष कोरोना लॉकडाउन असल्याने पायी दिंडीला पारखा झालेला वारकरी यंदा मात्र पालखीसोबत चालण्यासाठी आतूर झाला होता. विठुरायाच्या ओढीने काही दिवसांपासून वारकरी तयारीला लागले होते.  त्र्यंबकेश्वर हे वारकरी संप्रदायाचे आद्यपीठ आहे. 

संत ज्ञानेश्वर माऊली यांचे गुरू तथा थोरले बंधु संत निवृत्तिनाथ यांना त्र्यंबकेश्वरच्या ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणा दरम्यान योगीराज गहिनीनाथांचा अनुग्रह लाभला. त्यांनी तो गुरुप्रसाद माउली ज्ञानेश्वरांना दिला येथील पालखी सोहळा शतकोत्तर आहे. दोन दिवसांपासुन भाविक ब्रह्मगिरी पर्वतावर दर्शनासाठी प्रदक्षिणेसाठी जात त्यामुळे शहर गजबजले आहे. वारीसाठी परभणी, बीड, औरंगाबाद, जालनासह मराठावाड्यातून वाहनाने वारकरी भाविक येथे दाखल झाले होते.

टॅग्स :NashikनाशिकPandharpurपंढरपूर