शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

आज बैलपोळा : पशुगणनेनुसार जिल्ह्यात बैलांची संख्या सव्वापाच लाख

By admin | Updated: September 1, 2016 00:42 IST

जिल्ह्यात ‘सर्जा-राजा’पेक्षा गोमाता अधिक

गणेश धुरी : नाशिकबळीराजाच्या कुटुंबातील महत्त्वाचा घटक मानल्या जाणाऱ्या ‘सर्जा-राजा’ची संख्या घटू लागल्याने आगामी काळात शेतकामासाठी बळीराजाला वेगळे नियोजन करावे लागण्याची चिन्हे आहेत. जिल्ह्यात झालेल्या १९व्या पशुगणनेनुसार एकूण १२ लाख ५३ हजार ३९८ पशुसंख्येपैकी जवळपास सात लाख २८ हजार ८४९ गायी व पाच लाख २४ हजार ५४९ बैलांची नोंदणी करण्यात आली आहे. त्यामुळे १९व्या पशुगणनेनुसार सर्जा-राजापेक्षा गोमातांची संख्याच अधिक वाढल्याचे बोलले जाते.असे असले तरी आधुनिक स्पर्धेच्या काळात बैलांपेक्षा गायींची संख्या वाढत असल्याचे पशुगणनेतून स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यात असलेल्या एकूण गाय गटाची संख्या साडेबारा लाखांच्या आत असून, त्यात सर्वाधिक साडेसात लाख संख्या गायींची आहे, तर बैलांची संख्या सव्वापाच लाखांच्या घरात आहे. बैलांपेक्षा गायींची संख्या अधिक असण्याची वेगवेगळी कारणे असली तरी, आजही देशात गोपालक आणि गोपूजकांची संख्या जास्त असल्यानेच बैलांपेक्षा गायींची संख्या अधिक असल्याचे बोलले जाते. जिल्ह्यात असलेल्या बैलांची सर्वांत कमी संख्या नाशिक तालुक्यात अवघी १६ हजार ८७४ आहे, तर सर्वाधिक संख्या मालेगाव तालुक्यात ५८ हजार ५३४ इतकी आहे, तर गायींची सर्वांत कमी संख्या पेठ तालुक्यात १४ हजार ३१७ तर सर्वाधिक गायींची संख्या पुन्हा मालेगाव तालुक्यातच ९१ हजार ३८६ इतकी आहे. नाशिकला वाढते शहरीकरण बैलांची संख्या घटण्यास कारणीभूत असल्याचे मानले जाते. तर पेठ तालुक्यात डोंगराळ आणि जंगली भाग असल्याने हिंस्रपशुंमुळे तेथे गायींची संख्या कमी असल्याचे बोलले जाते.