शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
5
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
6
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
7
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
8
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
9
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
10
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
11
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
12
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
13
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
14
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
15
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
16
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
17
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
18
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
19
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
20
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!

आज बैलपोळा : पशुगणनेनुसार जिल्ह्यात बैलांची संख्या सव्वापाच लाख

By admin | Updated: September 1, 2016 00:42 IST

जिल्ह्यात ‘सर्जा-राजा’पेक्षा गोमाता अधिक

गणेश धुरी : नाशिकबळीराजाच्या कुटुंबातील महत्त्वाचा घटक मानल्या जाणाऱ्या ‘सर्जा-राजा’ची संख्या घटू लागल्याने आगामी काळात शेतकामासाठी बळीराजाला वेगळे नियोजन करावे लागण्याची चिन्हे आहेत. जिल्ह्यात झालेल्या १९व्या पशुगणनेनुसार एकूण १२ लाख ५३ हजार ३९८ पशुसंख्येपैकी जवळपास सात लाख २८ हजार ८४९ गायी व पाच लाख २४ हजार ५४९ बैलांची नोंदणी करण्यात आली आहे. त्यामुळे १९व्या पशुगणनेनुसार सर्जा-राजापेक्षा गोमातांची संख्याच अधिक वाढल्याचे बोलले जाते.असे असले तरी आधुनिक स्पर्धेच्या काळात बैलांपेक्षा गायींची संख्या वाढत असल्याचे पशुगणनेतून स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यात असलेल्या एकूण गाय गटाची संख्या साडेबारा लाखांच्या आत असून, त्यात सर्वाधिक साडेसात लाख संख्या गायींची आहे, तर बैलांची संख्या सव्वापाच लाखांच्या घरात आहे. बैलांपेक्षा गायींची संख्या अधिक असण्याची वेगवेगळी कारणे असली तरी, आजही देशात गोपालक आणि गोपूजकांची संख्या जास्त असल्यानेच बैलांपेक्षा गायींची संख्या अधिक असल्याचे बोलले जाते. जिल्ह्यात असलेल्या बैलांची सर्वांत कमी संख्या नाशिक तालुक्यात अवघी १६ हजार ८७४ आहे, तर सर्वाधिक संख्या मालेगाव तालुक्यात ५८ हजार ५३४ इतकी आहे, तर गायींची सर्वांत कमी संख्या पेठ तालुक्यात १४ हजार ३१७ तर सर्वाधिक गायींची संख्या पुन्हा मालेगाव तालुक्यातच ९१ हजार ३८६ इतकी आहे. नाशिकला वाढते शहरीकरण बैलांची संख्या घटण्यास कारणीभूत असल्याचे मानले जाते. तर पेठ तालुक्यात डोंगराळ आणि जंगली भाग असल्याने हिंस्रपशुंमुळे तेथे गायींची संख्या कमी असल्याचे बोलले जाते.