शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

ग्राहकांच्या डोक्यावर ‘टायटल इन्शुरन्स’चा बोजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 01:17 IST

आधीच ९८ टक्के लोकांना घराच्या किमती परवडत नसताना आता सरकारने ‘रेरा’ कायद्यांतर्गत टायटल इन्शुरन्स नावाचा नवा फेरा आणला आहे. हा इन्शुरन्स काढणे जमीनमालक व विकासक यांना सक्तीचे होणार असल्याने आपसुकच घरांच्या किमती आणखी भडकणार आहेत.

नाशिक : आधीच ९८ टक्के लोकांना घराच्या किमती परवडत नसताना आता सरकारने ‘रेरा’ कायद्यांतर्गत टायटल इन्शुरन्स नावाचा नवा फेरा आणला आहे. हा इन्शुरन्स काढणे जमीनमालक व विकासक यांना सक्तीचे होणार असल्याने आपसुकच घरांच्या किमती आणखी भडकणार आहेत. परदेशात टायटल इन्शुरन्स आहे. परदेशी गुंतवणूकदारांना आर्कषित करण्यासाठीच देशातही असा इन्शुरन्स असावा, अशी टूम रेरा कायद्यात आहे. इन्शुरन्सचे हे लचांड आता सामान्य ग्राहकांच्या डोक्यावर राहणार आहे. विशेष म्हणजे टायटल इन्शुरन्सची अंमलबजावणी करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे.  जमिनीचा इन्शुरन्स काढणे म्हणजे टायटल इन्शुरन्स असून, हे टायटल इन्शुरन्स जमिनीचा मालक करतो. त्यासाठी मालकाला किंवा विकासकाला नियमित वार्षिक विमा हप्ता भरावा लागतो. त्यामुळे विकासकाचा खर्च वाढेल. हा खर्च तो फ्लॅट विकत घेणाऱ्या ग्राहकांच्या खिशातून वसूल करेल. त्यामुळे पर्यायाने घरांच्या किमती वाढण्यावर त्याचा थेट परिणाम होणार असल्याचे मत बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. रेरा कायद्यातील कलम १६ नुसार बांधकाम व्यावसायिकांना आता टायटल इन्शुरन्स करणे बंधनकारक केले जाणार आहे.  टायटल इन्शुरन्स केले, तर प्रति चौरस फूट १५० ते २०० रु पये वाढणार आहेत. त्याचा फटका परवडणाºया घरांनाही बसेल. टायटल इन्शुरन्स करण्यासाठी बिल्डरला इमारत विकास प्रकल्पातील अंदाजे २ ते ३ टक्के रक्कम मोजावी लागेल.व्यवहारात पारदर्शकतापरदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी सरकार टायटल इन्शुरन्स करून घ्यायला बिल्डरांना सक्ती करत आहे. त्यामुळे स्थावर मालमत्तेत गुंतवलेले पैसे बुडतील, अशी जी भीती परदेशी गुंतवणूकदारांना वाटते, ती कमी होईल. गुंतवणुकीचा ओघ वाढेल. इन्शुरन्समुळे जमीन नेमकी कोणाच्या मालकीची आहे हे समजते. त्यामुळे गुंतवणूकदारांचे पैसे बुडत नाहीत. संपूर्ण व्यवहारात पारदर्शकता असते.

टॅग्स :Homeघरconsumerग्राहक