शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
4
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
5
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
6
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
7
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
8
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
9
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
10
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
11
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
12
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
13
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
14
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
15
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
16
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
17
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
18
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
19
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
20
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...

ग्राहकांच्या डोक्यावर ‘टायटल इन्शुरन्स’चा बोजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 01:17 IST

आधीच ९८ टक्के लोकांना घराच्या किमती परवडत नसताना आता सरकारने ‘रेरा’ कायद्यांतर्गत टायटल इन्शुरन्स नावाचा नवा फेरा आणला आहे. हा इन्शुरन्स काढणे जमीनमालक व विकासक यांना सक्तीचे होणार असल्याने आपसुकच घरांच्या किमती आणखी भडकणार आहेत.

नाशिक : आधीच ९८ टक्के लोकांना घराच्या किमती परवडत नसताना आता सरकारने ‘रेरा’ कायद्यांतर्गत टायटल इन्शुरन्स नावाचा नवा फेरा आणला आहे. हा इन्शुरन्स काढणे जमीनमालक व विकासक यांना सक्तीचे होणार असल्याने आपसुकच घरांच्या किमती आणखी भडकणार आहेत. परदेशात टायटल इन्शुरन्स आहे. परदेशी गुंतवणूकदारांना आर्कषित करण्यासाठीच देशातही असा इन्शुरन्स असावा, अशी टूम रेरा कायद्यात आहे. इन्शुरन्सचे हे लचांड आता सामान्य ग्राहकांच्या डोक्यावर राहणार आहे. विशेष म्हणजे टायटल इन्शुरन्सची अंमलबजावणी करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे.  जमिनीचा इन्शुरन्स काढणे म्हणजे टायटल इन्शुरन्स असून, हे टायटल इन्शुरन्स जमिनीचा मालक करतो. त्यासाठी मालकाला किंवा विकासकाला नियमित वार्षिक विमा हप्ता भरावा लागतो. त्यामुळे विकासकाचा खर्च वाढेल. हा खर्च तो फ्लॅट विकत घेणाऱ्या ग्राहकांच्या खिशातून वसूल करेल. त्यामुळे पर्यायाने घरांच्या किमती वाढण्यावर त्याचा थेट परिणाम होणार असल्याचे मत बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. रेरा कायद्यातील कलम १६ नुसार बांधकाम व्यावसायिकांना आता टायटल इन्शुरन्स करणे बंधनकारक केले जाणार आहे.  टायटल इन्शुरन्स केले, तर प्रति चौरस फूट १५० ते २०० रु पये वाढणार आहेत. त्याचा फटका परवडणाºया घरांनाही बसेल. टायटल इन्शुरन्स करण्यासाठी बिल्डरला इमारत विकास प्रकल्पातील अंदाजे २ ते ३ टक्के रक्कम मोजावी लागेल.व्यवहारात पारदर्शकतापरदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी सरकार टायटल इन्शुरन्स करून घ्यायला बिल्डरांना सक्ती करत आहे. त्यामुळे स्थावर मालमत्तेत गुंतवलेले पैसे बुडतील, अशी जी भीती परदेशी गुंतवणूकदारांना वाटते, ती कमी होईल. गुंतवणुकीचा ओघ वाढेल. इन्शुरन्समुळे जमीन नेमकी कोणाच्या मालकीची आहे हे समजते. त्यामुळे गुंतवणूकदारांचे पैसे बुडत नाहीत. संपूर्ण व्यवहारात पारदर्शकता असते.

टॅग्स :Homeघरconsumerग्राहक