शहरं
Join us  
Trending Stories
1
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
4
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
5
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
6
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
7
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
8
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
9
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
10
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
11
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
12
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
13
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
15
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
16
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
17
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
18
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
19
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
20
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 

८० कोटींचे थकले देणे : तीन विभागांची अंदाजपत्रकात केलेली तरतूद संपुष्टात

By admin | Updated: September 30, 2014 23:25 IST

पालिकेत आर्थिक आणीबाणी

नाशिक : अपुरा निधी आणि कामांचा ताण जास्त यामुळे पालिकेची आर्थिक स्थिती डबघाईस आली असताना, पाणीपुरवठा, बांधकाम आणि विद्युत या तीन विभागांसाठी अंदाजपत्रकात करण्यात आलेली तरतूदच संपुष्टात आली आहे. आयुक्तांनी केलेली तरतूद संपुष्टात आली असल्याने आता त्याऐवजी स्थायी समितीने फुगवलेल्या निधीनुसार खर्च करायचा, तर त्यासाठी निधीच शिल्लक नसल्याने कायदेशीर पेच निर्माण झाला आहे. त्याचा परिणाम म्हणून नवीन कामे तर नाहीच उलट ८० कोटी रुपयांची देयके थकली आहेत.एलबीटी लागू झाल्यानंतर मुळातच उत्पन्नात घट झाली आहे. त्यातच निधीची उपलब्धता लक्षात न घेता गेल्या काही वर्षांत सर्रास कामे मंजूर करण्यात येत असल्याने दायित्व मोठ्या प्रमाणात आहे. त्यातच कुंभमेळ्याच्या कामांचा बोजा पडला आहे. अशा स्थितीत कामे करणे जिकिरीचे असल्याने गेल्या तीन ते चार प्रभारी आयुक्तांनी पालिकेची कामे स्लोडाऊन केली आहेत. तरीही आर्थिक ताण वाढला आहे. फेबु्रवारी महिन्यात पालिकेचे अंदाजपत्रक आयुक्तांनी सादर केले. १८७५ कोटी ६९ लाख रुपयांच्या या अंदाजपत्रकात बांधकाम, जलदाय व्यवस्था, विद्युत विभाग, भूसंपादन, पाणीपुरवठा अशा वेगवेगळ्या विभागांसाठी तरतूद करण्यात आली होती. स्थायी समितीने अंदाजपत्रक फुगवल्यानंतर त्यात ही तरतूद वाढविण्यात आली. बांधकाम विभागासाठी १३५५ कोटी रुपये, पाणीपुरवठा विभागासाठी ८७ कोटी रुपये, विद्युत विभागासाठी २४ कोटी ५१ लाख रुपये अशा विविध प्रकारच्या तरतुदी करण्यात आल्या होत्या; परंतु तत्पूर्वी आयुक्तांनी या विभागाकरिता केलेल्या तरतुदींची रक्कमच संपुष्टात आली आहे. त्यामुळे आता काय करावे, असा प्रश्न संबंधित विभागांसमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे या विभागांची देयके बाजूला ठेवण्यात आली असून, देयकांची ही रक्कम ८० कोटी रुपयांच्या घरात आहे. स्थायी समितीवर आयुक्तांनी सादर केलेल्या रकमेची तरतूद संपुष्टात आल्याने आता स्थायी समितीने केलेल्या शिफारसीनुसार निधी द्यावा, अशी संबंधित विभागांची मागणी आहे; परंतु आयुक्तांनी अपेक्षित केलेले उत्पन्नच मिळालेले नसताना स्थायी समितीने आणखी फुगवून उत्पन्नवाढ दर्शविली. त्यावर आधारित केलेल्या तरतुदींचा विचार कसा करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. (प्रतिनिधी)