शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांचा आनंद गगनात मावेना; लेक दिविजाला दहावीत 92.60% गुण...
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
4
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
5
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
6
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
7
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
8
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
9
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
10
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
11
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
12
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
13
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
14
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
15
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
16
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
17
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
18
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
19
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
20
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार

‘टायर प्लॅन्ट’ मोजतोय घटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 00:41 IST

राज्य परिवहन महामंडळाचे टायर प्लॅन्ट अखेरची घटका मोजत असून, चोवीस तास चालणारे हे प्रकल्प आता अवघ्या एका शिफ्टवर येऊन ठेपले आहेत.

नाशिक : राज्य परिवहन महामंडळाचे टायर प्लॅन्ट अखेरची घटका मोजत असून, चोवीस तास चालणारे हे प्रकल्प आता अवघ्या एका शिफ्टवर येऊन ठेपले आहेत. त्यातही कमी मनुष्यबळामुळे कर्मचाऱ्यांवर ताण येत असल्याने महामंडळाला सदर प्रकल्प चालवायचा आहे की बंद करायचा, असा प्रश्न कर्मचाऱ्यांकडून विचारला जात आहे.राज्य परिवहन महामंडळाचे राज्यात विविध ठिकाणी नऊ प्रकल्प असून, नाशिकमध्येदेखील टायर नूतनीकरणाचा प्रकल्प आहे.या प्रकल्पाची अवस्थादेखील यापेक्षा वेगळी नाही. पूर्वी चोवीस तास चालणाºया या प्रकल्पात जवळपास ९५ कर्मचारी कार्यरत होते. तीनही सत्रामध्ये चोवीस तास प्रकल्प चालविला जात होता. परंतु महामंडळाच्या खासगीकरण धोरणामुळे कर्मचाºयांची संख्या कमी करण्यात आली आणि प्रकल्पाकडे दुर्लक्ष केल्यामुळे अधिकच अवकळा आली. त्यामुळे तीन शिफ्ट चालणार हा प्रकल्प काही दिवस दोन शिफ्टमध्ये आणि आता तर एकच शिफ्टमध्ये अवघ्या दहा कर्मचाºयांवर सुरू आहे. या कर्मचाºयांना दैनंदिन प्रॉड््क्शन नियमानुसार ३५ ते ४० टायर्सचे नूतनीकरण करून द्यावेच लागते. त्याचा ताण या कर्मचाºयांवर येत असल्याच्या तक्रारी आहेत.राज्य परिवहन महामंडळात अनेक बदल होत असताना काही बदलांचे निश्चित स्वागत करण्यात आले, मात्र खासगीकरणाच्या निर्णयामुळे अनेक कर्मचाºयांना मूळ अस्थापना सोडून अन्यत्र कामे करावी लागत आहेत. अगदी स्वच्छतेपासून ते तांत्रिक कर्मचाºयांच्या कामांमध्येही बदल करण्यात आला. एवढे करूनही महामंडळाला नेमका काय लाभ झाला याचा कोणताही हिशेब महामंडळाने मांडलेला नाही. खासगीकरणातून अनेक कामे महामंडळात सुरू झाली असताना टायर प्लॅन्टच्या बाबतीतही असाच काहीसा निर्णय होण्याची शक्यता आहे. याचा फटका मात्र नियमित कर्मचाºयांना बसत असून, त्यांना कमी मनुष्यबळात राबवून घेतले जात आहे. या कर्मचाºयांना शाश्वत कामाची अपेक्षा असल्याने विभाग नियंत्रकांनी त्याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. महामंडळातील अनेक कामांचे खासगीकरण होत असताना टायर प्लॅन्ट तर बंद करण्याचीच चर्चा होत आहे. यामुळे कर्मचाºयांच्या कामावर गदा येणार असल्याने महामंडळाच्या मनुष्यबळात प्लॅन्ट सुरू ठेवावा, अशी मागणी आहे.अन्य कर्मचाºयांच्या नियुक्तीची मागणीटायर प्लॅन्टमध्ये असलेल्या किरकोळ कामांसाठी नवीन भरती झालेल्या कर्मचाºयांना संधी दिली तर प्लॅन्टमधील नियमित कर्मचाºयांना अधिक उत्पादन देणे शक्य होऊ शकते. सद्यपरिस्थितीत या कर्मचाºयांना पेस्टिंगपासून भट्टीपर्यंतची कामे करावी लागतात. या कामांचे वर्गीकरण होणे अपेक्षित आहे. यासाठी नवीन भरती झालेल्या कर्मचाºयांना टायर प्लॅन्टमध्ये ड्युटी द्यावी, असे जुन्याजाणत्या कर्मचाºयांचे म्हणणे आहे.टायर प्लॅन्टमध्ये महिलांच्या क्षमतेनुसार अनेक कामे करण्यासारखी आहेत. शिवाय त्या कौशल्यपूर्ण कामे हाताळू शकत असल्याने त्यांना सामावून घेतले तर अन्य कर्मचाºयांवरील लहानसहान कामाचा ताण कमी होऊन ते अधिकाधिक उत्पादन देऊ शकतील, अशी निदान नाशिक शहरातून या प्रकल्पाची सुरुवात झाली. नाशिक पॅटर्न म्हणून राज्यात त्याचा उपयोग होऊ शकणार आहे.कामही झाले कमीमहामंडळाच्या टायर प्लॅन्टमध्ये पूर्वी मोठ्या प्रमाणात काम चालत होते. परंतु आता टायर घासण्याचे प्रमाण कमी झाल्याने रिमोल्डिंगही घटले आहे. रस्त्यांची झालेली सुधारणा तसेच ट्युबलेस टायर यामुळे टायरचे आयुर्मान वाढले आहे. त्याचा परिणाम टायर नूतनीकरणावर झाल्याचे बोलले जाते.

टॅग्स :state transportएसटीNashikनाशिक