शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ब्लू इकॉनॉमीकडे झेप, तब्बल १२ लाख कोटींचे करार; शिवछत्रपतींच्या विचारांनी भारत प्रगतीपथावर
2
राज ठाकरेही मेळाव्यात फोडणार मतचोरीचा बॉम्ब? बोगस नावे, मतचोरी, EVM घोटाळ्यांवर सादरीकरण
3
मुंबई पालिकेची निवडणूक जानेवारीच होणार? आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला, आयोगाकडून सूचना प्रसिद्ध
4
५ नोव्हेंबरपर्यंत पाऊसधारांचा अंदाज; कमी दाबाचा पट्टा ओमानकडे जाण्याऐवजी किनारपट्ट्यांवर रेंगाळला
5
सावध व्हा, ‘कॉल मर्जिंग स्कॅम’ धाेका ! नव्या पद्धतीने केवळ काही अवधीत लाखो रुपयांवर डल्ला
6
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
7
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
8
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
9
काँग्रेसमध्ये महापालिकेसाठी इच्छुकांची गर्दी; आले ४५० अर्ज, इच्छुकांकडून ५०० रुपये शुल्क
10
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
11
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
12
सेंट जॉर्जेस रुग्णालयातील मृत्यूदर का वाढला? दाखल रुग्णांपैकी २४ ते २५ टक्के जण दगावतात
13
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
14
अर्बन कंपनी सर्च केले आणि ऑनलाइन मेड मागविली; महिलेचे खातेच झाले रिकामे
15
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
16
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
17
संभाव्य दुबार मतदारांची तपासणी करा; राज्य निवडणूक आयोगाचे मतदार याद्यांबाबत आदेश
18
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
19
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
20
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!

माझ्यावर चार्जशीट का दाखल करीत नाहीत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2017 22:46 IST

कन्हैया कुमार : पंतप्रधान मोदी यांना खुले आव्हाननाशिक : मी देशद्रोही नाही, पण समजा घटकाभर मी चूक केली तर देशात भाजपाचे सरकार आहे, अठरा राज्यांत याच पक्षाची सत्ता आहे. संसदेत बहुमत आहे, मग ५६ इंच छाती असलेल्या पंतप्रधान माझ्यावर चार्टशीट का दाखल करीत नाहीत, असे खुले आव्हानच जेएनयूमधील युवा नेता कन्हैया कुमार यांनी दिले आहे.

कन्हैया कुमार : पंतप्रधान मोदी यांना खुले आव्हान

नाशिक : मी देशद्रोही नाही, पण समजा घटकाभर मी चूक केली तर देशात भाजपाचे सरकार आहे, अठरा राज्यांत याच पक्षाची सत्ता आहे. संसदेत बहुमत आहे, मग ५६ इंच छाती असलेल्या पंतप्रधान माझ्यावर चार्टशीट का दाखल करीत नाहीत, असे खुले आव्हानच जेएनयूमधील युवा नेता कन्हैया कुमार यांनी दिले आहे. देशात तीन लाख कोटींचे काळेधन जमा झाल्याचा दावा पंतप्रधान करतात, मग इतकी रक्कम देशात असताना बुलेट ट्रेनसाठी जपानकडून एक लाख कोटी रुपयांचे कर्ज का घेतले? असा सवालही त्यांनी केला आहे. नाशिकमधील डावे पक्ष आणि आंबेडकरवादी संघटनांच्या वतीने येथील लॉन्समध्ये आयोजित केलेल्या संविधान जागर सभेत कन्हैया कुमार बोलत होते. आपल्यावर देशद्रोहाचा आरोप करण्यात आला असला तरी तो सत्य नाही. या देशात सत्ताधिकाºयांना जो प्रश्न उपस्थित करतो, तोच देशद्रोही ठरवला जातो, असे सांगून त्यांनी चार्टशीट दाखल करण्याचे आव्हानच भाजपाला दिले. युवकांमध्ये राजकीय जागृती टाळण्यासाठी ही चळवळच संपुष्टात आणण्याचा सरकार प्रयत्न करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. सरकारच्या विरोधात कोणताही मुद्दा उपस्थित केला की त्याला प्रत्युत्तर देण्याची आणि सामोरे जाण्याची तयारी नसल्याने अशा प्रश्न करणाºयांना राष्टÑद्रोही ठरवले जाते. सध्या नोटबंदी आणि अन्य प्रश्न करणाºयांबाबत संभ्रम निर्माण करण्यासाठी देशभक्त आणि देशद्रोही असा वाद निर्माण केला जात असल्याचे ते म्हणाले.नोटाबंदी आणि जीएसटीने नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. नोटाबंदीने छोटे व्यापारी, कष्टकरी, उद्योजकांना बर्बाद केले. केवळ बड्या भांडवलदारांना बाजारातील रोकड उपलब्ध व्हावी यासाठीच नोटाबंदी करण्यात आली आहे. देशात महागाई वाढली असताना त्यात जीएसटीची भर पडली आहे. मोदीभक्त आणि भाजपा समर्थकांना महागाई जाणवत नाही काय? असा प्रश्न केलाच पाहिजे असे सांगून कन्हैया कुमार यांनी भ्रष्टाचारपेक्षा बेईमानी या राष्टÑाची प्रमुख समस्या असून, राम मंदिराचे आश्वासन देऊन प्रत्यक्षात नत्थुरामाचे मंदिर बांधणारे भाजपाच सर्वांत मोठा बेईमान असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.भ्रष्टाचाराच्या विरोधात वातावरण निर्माण केले जात आहे. पंतप्रधान मोदी यांनी भ्रष्टाचारी शिल्लक ठेवणार नाही, असे सांगितले आज भ्रष्ट नेत्यांना भाजपात घेतले असून, अशावेळी भ्रष्टाचारी शिल्लक राहणारच कसे? असा प्रश्न त्यांनी केला.