शहरं
Join us  
Trending Stories
1
“माझा हक्क आहे, पण विरोधी पक्षनेता असूनही संसेदत बोलू दिले जात नाही”; राहुल गांधींचा आरोप
2
चीनने ब्रह्मपुत्रा नदीवर सर्वात मोठे धरण बांधण्यास सुरुवात केली; भारताने आधीच घेतला आक्षेप
3
Nashik: 'आई, तुला त्रास द्यायचा नाही, तू...'; पोलीस महिलेच्या लेकीने आयुष्य संपवलं, सुसाईड नोटमध्ये काय?
4
भज्जीनं मारलेली ती 'थप्पड' श्रीसंतच्या लेकीच्या मनाला लागलीये! फिरकीपटूनं शेअर केली त्यामागची स्टोरी
5
झाले बाबा एकदाचे...! ब्रिटिशांचा जीव भांड्यात पडला; केरळमध्ये अडकलेले एफ-३५ दुरुस्त झाले, उद्या उड्डाण करणार
6
'ट्रम्प यांनी २४ वेळा...', ऑपरेशन सिंदूरबाबत खरगेंच्या विधानावर जेपी नड्डा संतापले, म्हणाले...
7
Astro Tips: चमचाभर तीळ, मोहरीच्या तेलाचा दिवा, मंगळवारी पिंपळाच्या पारावर ठेवायला हवा; कारण...
8
Ganeshotsav 2025 Train: गुडन्यूज! पश्चिम रेल्वे कोकणसाठी चालवणार 'या' विशेष गाड्या, तिकीट बुकिंग कधीपासून?
9
अजित पवार 'अ‍ॅक्शन मोड'वर! छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाण यांना राजीनामा देण्याचे आदेश
10
"मी २५ वर्षं आमदार, १० वर्ष लोकसभेचा खासदार...!"; छावाचे कार्यकर्ते आले, पत्ते टाकले, नंतर काय घडलं? तटकरेंनी स्पष्टच सांगितलं
11
अजित पवारांनी मौन सोडले पण कारवाईवर भाष्य टाळलं; "मारहाणीची घटना अत्यंत गंभीर, दुर्दैवी..."
12
ऑपरेशन सिंदूरवरून संसदेत गोंधळ, कामकाज स्थगित; पहलगाम हल्ल्याचे दशतवादी, ट्रम्प दावा मुख्य मुद्दे... 
13
Shravan Special Recipe: श्रावणात नैवेद्याच्या ताटाची लज्जत वाढवेल 'हा' कोबीचा चटका; कमी साहित्यात चविष्ट रेसेपी 
14
७/११तील सर्व दोषी निर्दोष, सरकारसमोर कोणते पर्याय; पुढे काय होणार? कायदेतज्ज्ञ म्हणतात...
15
अजित पवारांविरोधात छावा संघटना आक्रमक; NCP कार्यालयावर दगडफेक, जाळण्याचाही प्रयत्न
16
ट्रम्प यांच्या धोरणाचा आता 'नासा'लाही फटका; 'या' कारणांमुळे उपग्रह काढले विक्रीला, तेही डिस्काउंटमध्ये?
17
घरात वीज, शौचालय नाही, दिव्याच्या प्रकाशात अभ्यास...; भारताच्या लेकीचं जपानमध्ये कौतुक
18
IND vs PAK : या भारतीय क्रिकेटरचं नाव घेत शाहिद आफ्रिदीनं केला मोठा दावा, म्हणाला...
19
७/११तील दोषींची निर्दोष मुक्तता, उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने...”
20
मुंबई: कुत्रा लचके तोडत होता आणि मालक हसत होता; घाटकोपरमध्ये ११ वर्षाच्या मुलावर पिटबुलचा हल्ला

माझ्यावर चार्जशीट का दाखल करीत नाहीत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2017 22:46 IST

कन्हैया कुमार : पंतप्रधान मोदी यांना खुले आव्हाननाशिक : मी देशद्रोही नाही, पण समजा घटकाभर मी चूक केली तर देशात भाजपाचे सरकार आहे, अठरा राज्यांत याच पक्षाची सत्ता आहे. संसदेत बहुमत आहे, मग ५६ इंच छाती असलेल्या पंतप्रधान माझ्यावर चार्टशीट का दाखल करीत नाहीत, असे खुले आव्हानच जेएनयूमधील युवा नेता कन्हैया कुमार यांनी दिले आहे.

कन्हैया कुमार : पंतप्रधान मोदी यांना खुले आव्हान

नाशिक : मी देशद्रोही नाही, पण समजा घटकाभर मी चूक केली तर देशात भाजपाचे सरकार आहे, अठरा राज्यांत याच पक्षाची सत्ता आहे. संसदेत बहुमत आहे, मग ५६ इंच छाती असलेल्या पंतप्रधान माझ्यावर चार्टशीट का दाखल करीत नाहीत, असे खुले आव्हानच जेएनयूमधील युवा नेता कन्हैया कुमार यांनी दिले आहे. देशात तीन लाख कोटींचे काळेधन जमा झाल्याचा दावा पंतप्रधान करतात, मग इतकी रक्कम देशात असताना बुलेट ट्रेनसाठी जपानकडून एक लाख कोटी रुपयांचे कर्ज का घेतले? असा सवालही त्यांनी केला आहे. नाशिकमधील डावे पक्ष आणि आंबेडकरवादी संघटनांच्या वतीने येथील लॉन्समध्ये आयोजित केलेल्या संविधान जागर सभेत कन्हैया कुमार बोलत होते. आपल्यावर देशद्रोहाचा आरोप करण्यात आला असला तरी तो सत्य नाही. या देशात सत्ताधिकाºयांना जो प्रश्न उपस्थित करतो, तोच देशद्रोही ठरवला जातो, असे सांगून त्यांनी चार्टशीट दाखल करण्याचे आव्हानच भाजपाला दिले. युवकांमध्ये राजकीय जागृती टाळण्यासाठी ही चळवळच संपुष्टात आणण्याचा सरकार प्रयत्न करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. सरकारच्या विरोधात कोणताही मुद्दा उपस्थित केला की त्याला प्रत्युत्तर देण्याची आणि सामोरे जाण्याची तयारी नसल्याने अशा प्रश्न करणाºयांना राष्टÑद्रोही ठरवले जाते. सध्या नोटबंदी आणि अन्य प्रश्न करणाºयांबाबत संभ्रम निर्माण करण्यासाठी देशभक्त आणि देशद्रोही असा वाद निर्माण केला जात असल्याचे ते म्हणाले.नोटाबंदी आणि जीएसटीने नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. नोटाबंदीने छोटे व्यापारी, कष्टकरी, उद्योजकांना बर्बाद केले. केवळ बड्या भांडवलदारांना बाजारातील रोकड उपलब्ध व्हावी यासाठीच नोटाबंदी करण्यात आली आहे. देशात महागाई वाढली असताना त्यात जीएसटीची भर पडली आहे. मोदीभक्त आणि भाजपा समर्थकांना महागाई जाणवत नाही काय? असा प्रश्न केलाच पाहिजे असे सांगून कन्हैया कुमार यांनी भ्रष्टाचारपेक्षा बेईमानी या राष्टÑाची प्रमुख समस्या असून, राम मंदिराचे आश्वासन देऊन प्रत्यक्षात नत्थुरामाचे मंदिर बांधणारे भाजपाच सर्वांत मोठा बेईमान असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.भ्रष्टाचाराच्या विरोधात वातावरण निर्माण केले जात आहे. पंतप्रधान मोदी यांनी भ्रष्टाचारी शिल्लक ठेवणार नाही, असे सांगितले आज भ्रष्ट नेत्यांना भाजपात घेतले असून, अशावेळी भ्रष्टाचारी शिल्लक राहणारच कसे? असा प्रश्न त्यांनी केला.