शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

माझ्यावर चार्जशीट का दाखल करीत नाहीत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2017 22:46 IST

कन्हैया कुमार : पंतप्रधान मोदी यांना खुले आव्हाननाशिक : मी देशद्रोही नाही, पण समजा घटकाभर मी चूक केली तर देशात भाजपाचे सरकार आहे, अठरा राज्यांत याच पक्षाची सत्ता आहे. संसदेत बहुमत आहे, मग ५६ इंच छाती असलेल्या पंतप्रधान माझ्यावर चार्टशीट का दाखल करीत नाहीत, असे खुले आव्हानच जेएनयूमधील युवा नेता कन्हैया कुमार यांनी दिले आहे.

कन्हैया कुमार : पंतप्रधान मोदी यांना खुले आव्हान

नाशिक : मी देशद्रोही नाही, पण समजा घटकाभर मी चूक केली तर देशात भाजपाचे सरकार आहे, अठरा राज्यांत याच पक्षाची सत्ता आहे. संसदेत बहुमत आहे, मग ५६ इंच छाती असलेल्या पंतप्रधान माझ्यावर चार्टशीट का दाखल करीत नाहीत, असे खुले आव्हानच जेएनयूमधील युवा नेता कन्हैया कुमार यांनी दिले आहे. देशात तीन लाख कोटींचे काळेधन जमा झाल्याचा दावा पंतप्रधान करतात, मग इतकी रक्कम देशात असताना बुलेट ट्रेनसाठी जपानकडून एक लाख कोटी रुपयांचे कर्ज का घेतले? असा सवालही त्यांनी केला आहे. नाशिकमधील डावे पक्ष आणि आंबेडकरवादी संघटनांच्या वतीने येथील लॉन्समध्ये आयोजित केलेल्या संविधान जागर सभेत कन्हैया कुमार बोलत होते. आपल्यावर देशद्रोहाचा आरोप करण्यात आला असला तरी तो सत्य नाही. या देशात सत्ताधिकाºयांना जो प्रश्न उपस्थित करतो, तोच देशद्रोही ठरवला जातो, असे सांगून त्यांनी चार्टशीट दाखल करण्याचे आव्हानच भाजपाला दिले. युवकांमध्ये राजकीय जागृती टाळण्यासाठी ही चळवळच संपुष्टात आणण्याचा सरकार प्रयत्न करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. सरकारच्या विरोधात कोणताही मुद्दा उपस्थित केला की त्याला प्रत्युत्तर देण्याची आणि सामोरे जाण्याची तयारी नसल्याने अशा प्रश्न करणाºयांना राष्टÑद्रोही ठरवले जाते. सध्या नोटबंदी आणि अन्य प्रश्न करणाºयांबाबत संभ्रम निर्माण करण्यासाठी देशभक्त आणि देशद्रोही असा वाद निर्माण केला जात असल्याचे ते म्हणाले.नोटाबंदी आणि जीएसटीने नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. नोटाबंदीने छोटे व्यापारी, कष्टकरी, उद्योजकांना बर्बाद केले. केवळ बड्या भांडवलदारांना बाजारातील रोकड उपलब्ध व्हावी यासाठीच नोटाबंदी करण्यात आली आहे. देशात महागाई वाढली असताना त्यात जीएसटीची भर पडली आहे. मोदीभक्त आणि भाजपा समर्थकांना महागाई जाणवत नाही काय? असा प्रश्न केलाच पाहिजे असे सांगून कन्हैया कुमार यांनी भ्रष्टाचारपेक्षा बेईमानी या राष्टÑाची प्रमुख समस्या असून, राम मंदिराचे आश्वासन देऊन प्रत्यक्षात नत्थुरामाचे मंदिर बांधणारे भाजपाच सर्वांत मोठा बेईमान असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.भ्रष्टाचाराच्या विरोधात वातावरण निर्माण केले जात आहे. पंतप्रधान मोदी यांनी भ्रष्टाचारी शिल्लक ठेवणार नाही, असे सांगितले आज भ्रष्ट नेत्यांना भाजपात घेतले असून, अशावेळी भ्रष्टाचारी शिल्लक राहणारच कसे? असा प्रश्न त्यांनी केला.