शहरं
Join us  
Trending Stories
1
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
2
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
3
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
4
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
5
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
6
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
7
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
8
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
9
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
10
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
11
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
12
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
13
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
14
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
15
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
16
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

आरोग्य विद्यापीठ परीक्षा वेळापत्रकात ऐनवेळी बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2021 01:40 IST

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विविध शाखांच्या प्रथम वर्ष उन्हाळी सत्र परीक्षा मंगळवार (दि. १२) पासून सुरू होणार होत्या. मात्र, या परीक्षेंतर्गत होमिओपॅथी विद्याशाखेच्या प्रथम वर्षाचा मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता होणारा पेपार अचानक रद्द करण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करण्यात आली. मात्र, विद्यापीठाकडून प्रवेश नियामक प्राधिकरणाच्या विद्यार्थी अपात्रतेविषयीच्या पत्राचे कारण देत उशिरा प्रवेशित विद्यार्थ्यांच्या पात्रतेविषयी पेच निर्माण झाल्याने अशा विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी ऐनवेळी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी निर्णय :परीक्षा केंद्रावर पोहोचलेलेल्या विद्यार्थ्यांची निराशा

नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विविध शाखांच्या प्रथम वर्ष उन्हाळी सत्र परीक्षा मंगळवार (दि. १२) पासून सुरू होणार होत्या. मात्र, या परीक्षेंतर्गत होमिओपॅथी विद्याशाखेच्या प्रथम वर्षाचा मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता होणारा पेपार अचानक रद्द करण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करण्यात आली. मात्र, विद्यापीठाकडून प्रवेश नियामक प्राधिकरणाच्या विद्यार्थी अपात्रतेविषयीच्या पत्राचे कारण देत उशिरा प्रवेशित विद्यार्थ्यांच्या पात्रतेविषयी पेच निर्माण झाल्याने अशा विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी ऐनवेळी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाच्या परीक्षांना मंगळवार (दि.१२) पासून सुरुवात होऊन या परीक्षा ३० ऑक्टोबरपर्यंत चालणार होत्या. मात्र, होमिओपॅथी विद्याशाखेचा मंगळवारी पहिला पेपर सुरू होण्यापूर्वीच विद्यापीठाने ऐनवेळी हा पेपर रद्द करून वेळापत्रकात बदल केला आहे. परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांनी दिलेल्या माहितीनुसार, विविध विद्याशाखांच्या उन्हाळी २०२१ सत्राच्या परीक्षा राज्यातील विविध १७७ परीक्षा केद्रांवर घेण्यात येत आहेत. परीक्षेचे वेळापत्रक विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार मंगळवार (दि.१२) होमिओपॅथी विद्याशाखेची परीक्षा सुरू होणार होती; परंतु प्रशासकीय कारणास्तव यात बदल करण्यात आला आहे. प्रवेश नियामक प्राधिकरणाकडून ८ ऑक्टोबर रोजी विद्यापीठाला प्राप्त पत्रानुसार उशिरा प्रवेशित झालेले काही विद्यार्थी या परीक्षेला पात्र नसल्याचे कळविण्यात आले होते. त्यामुळे प्रवेश नियामक प्राधिकरणाच्या मान्यतेअभावी परीक्षेला बसू न शकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेविषयी पेच निर्माण झाला होता. पहिल्या दिवसाच्या पेपरसाठी १५६ विद्यार्थी अपात्र ठरून परीक्षेपासून वंचित राहणार असल्याने ही परीक्षा तत्काळ रद्द करण्यात आली. यासंदर्भात बुधवारी (दि. १३) प्रवेश नियामक प्राधिकरणाची मुंबई येथे बैठक होणार असून, या बैठकीत विद्यार्थ्यांच्या पात्रतेविषयी निर्णय झाल्यानंतर सर्वच विद्याशाखांच्या परीक्षा पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार होऊ शकतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, याविषयी परीक्षेच्या वेळापत्रकातील बदलाबाबत विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर माहिती प्रसिद्ध करण्यात आली असून, संलग्नित महाविद्यालयाचे अधिष्ठाता व प्राचार्य यांनी विद्यार्थ्यांना सूचित करण्यासंदर्भातही विद्यापीठाकडून सूचना करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Healthआरोग्यEducationशिक्षणexamपरीक्षा