शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
4
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
5
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
6
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
7
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
8
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
9
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
10
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
11
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
12
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
13
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
14
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
15
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
16
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
17
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
18
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
19
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
20
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या

खडी क्रशरमुळे शेती उत्पन्नावर पाणी सोडण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 17:11 IST

सिन्नर : समृद्धी महामार्गासाठी शिवडे येथे उभारण्यात आलेल्या खडी क्रशरमधून उडणाऱ्या धुळीमुळे पीके उद्ध्वस्त होऊन शेती उत्पन्नावर पाणी सोडण्याची वेळ आल्याची तक्रार शिवडे येथील शेतक-यांनी केली.

परिसरातील खडी क्रशरला दिलेली परवानगी रद्द करण्याची मागणी शेतकºयांनी केली. धुळीने पिकांना उपद्रव होऊ नये यासाठी प्रकल्पाच्या भोवती १५ मीटर उंचीपर्यंत जीआय सीटचे पत्र्याचे जाळीदार आवरण टाकण्याचे आश्वासन ठेकेदाराने दिले. समृध्दी महामार्गासाठी शिवडे शिवारात उभारण्यात आलेल्या खडी क्रशरमुळे पिकांचे नुकसान होत असल्याची तक्रार शेतक-यांनी केल्यानंतर तहसीलदारांनी मंगळवारी तहसील कार्यालयात ठेकेदार व शेतकरी यांची संयुक्त आयोजित केली होती. खडी क्रशर, डांबर प्रकल्प करण्यावर प्रशासनाने ठाम भूमिका ठेवली. तथापि, धुळीमुळे परिसरातील फळबागांचे नुकसान होवू नये यासाठी उपाययोजना करण्यात येतील. पिकांचे नुकसान झाले असल्यास त्याबाबत जिल्हाधिकाºयांशी चर्चा करून शेतकºयांना निर्णय कळविण्यात येणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. समृध्दीसाठी शिवडे येथे क्रशर, डांबर प्रकल्प सुरु करण्यात येणार आहे. शिवाय बेकायदेशीर ब्लास्टिक केले जात आहेत. धुळीमुळे परिसरातील फळबागा धोक्यात आल्याने हे प्रकल्प अन्यत्र हलविण्याची मागणी शेतक-यांनी केली. तथापि, प्रकल्प तेथेच ठेवण्यात येतील. परंतु, धुळीमुळे पिकांचे नुकसान होवू नये याकरिता उपाययोजना करण्याची भूमिका तहसीलदार गवळी यांनी स्पष्ट केली. क्रशरपासून १५ मीटर अंतरावर जाळी बसविण्यात येणार असून त्यामुळे धूळ अन्यत्र उडणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना महामार्गाचे काम करणाºया बीएससीपीएलच्या कंपनीला करण्यात आल्या. धुळीमुळे सीताफळ, द्राक्ष, आंबा या फळबागांचे नुकसान झाले असल्याची तक्रार शेतक-यांनी केली. याबाबत जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांच्यासोबत चर्चा करून शेतक-यांना निर्णय कळविण्याचे सांगण्यात आले. बैठकीस रावसाहेब हारक, उत्तम हारक, अरूण हारक, रोहीदास वाघ, लक्ष्मण वाघ, सोमनाथ वाघ, शिवाजी वाघ, गणेश हारक, पोपट सोनवणे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :TahasildarतहसीलदारFarmerशेतकरी