शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
2
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
3
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
4
उलटेच झाले! सामुहिक बलात्काराची केस दाखल केली, तिलाच सात वर्षांची शिक्षा झाली
5
PF साठी एजंट्सची मदत घेताय? सावधान! EPFO ने दिली धोक्याची घंटा, पैसे आणि डेटा दोन्ही जाईल!
6
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
7
'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'चा सीक्वेल येणार? काजोल म्हणाली, "सिनेमाचा जो शेवट झाला..."
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
9
Crude Oil Reserves India : भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
10
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले
11
ऑल टाईम हायवरुन सोन्याचे दर घसरले, चांदीच्या दरात मात्र तेजी; पाहा लेटेस्ट किंमत
12
'या सगळ्यांना मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी करायला हवे', खासदार संजय राऊत नितेश राणेंवर भडकले
13
Census of India: ३५ लाख कर्मचारी करणार जनगणना, नागरिकांनाही करता येणार स्वयंनोंदणी!
14
अरेरे! लग्नानंतर बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; नवरा म्हणतो, "राजा रघुवंशी होण्यापासून वाचलो"
15
सेलिब्रिटी जोडप्याने फिल्ममेकरचं केले अपहरण, गुन्हा दाखल; रस्त्यात एकट्याला अडवले, मग...
16
'समृद्धी'वर दगडफेक करून लुटीचा प्रयत्न; छ. संभाजीनगर ते नागपूर मार्गावरील प्रकार वाढले!
17
Tata Motors Shares: परदेशातून चांगली बातमी, तरीही आपटले टाटा मोटर्सचे शेअर्स; गुतवणूकदारांनी काय करावं?
18
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
19
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ४ गुरुवार करा स्वामी सेवा, कृपा होईलच विश्वास ठेवा; नेमके काय करावे?
20
घाईगडबडीत चुकीची कर व्यवस्था निवडली? घाबरू नका! ITR दाखल करताना 'ही' ट्रिक वापरा आणि टॅक्स वाचवा

राजकारण्यांना यंदा रडवणार कांदा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2018 15:13 IST

नाशिक जिल्ह्यातील चांदवड, येवला, नांदगाव, निफाड, सिन्नर, मालेगाव, देवळा या कमी पाऊस पडणा-या तालुक्यांमध्ये जुलै, आॅगष्ट महिन्यात पडणा-या पावसाच्या भरवश्यावर पोळ कांद्याची लागवड केली जाते. साधारणत: तीन महिन्यात सदरचा कांदा बाजारात येतो, तो पर्यंत उन्हाळ कांद्याची सद्दी संपलेली असते. म्हणजेच पोळ कांदा बाजारात आल्यावर बाजारपेठेत कांद्याचे दर स्थिर राहतात.

ठळक मुद्देपोळवर परिणाम : उन्हाळ कांद्याचेही उत्पादन घटणारलोकसभा निवडणुकीच्या प्रचारात कांद्याचा तुटवडा व वाढलेले दर यावरच विरोधकांकडून भर

नाशिक : जुलै व आॅगष्टच्या मध्यान्हापर्यंत पावसाने ओढ दिल्यामुळे याच पावसाच्या भरवश्यावर पोळ कांद्याची लागवड करणाऱ्या शेतक-यांच्या तोंडचे पाणी पळण्याबरोबरच पोळचे घटणारे उत्पादन व उन्हाळ कांद्याची कोणीतीही शाश्वती सध्या तरी देता येत नसल्यामुळे पुढच्या वर्षी ऐन लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात संभाव्य भाववाढीने कांदा राजकारण्यांना चांगलाच रडवणार असल्याचे चित्र दिसू लागले आहे.नाशिक जिल्ह्यातील चांदवड, येवला, नांदगाव, निफाड, सिन्नर, मालेगाव, देवळा या कमी पाऊस पडणा-या तालुक्यांमध्ये जुलै, आॅगष्ट महिन्यात पडणा-या पावसाच्या भरवश्यावर पोळ कांद्याची लागवड केली जाते. साधारणत: तीन महिन्यात सदरचा कांदा बाजारात येतो, तो पर्यंत उन्हाळ कांद्याची सद्दी संपलेली असते. म्हणजेच पोळ कांदा बाजारात आल्यावर बाजारपेठेत कांद्याचे दर स्थिर राहतात. परंतु यंदा पोळ कांदा पिकविणा-या तालुक्यांकडे पावसाने वक्रदृष्टी केली असून, पावसाच्या पाळ्यावर नजर ठेवून कांदा लागवड करणा-या शेतक-यांनी जी काही पोळ कांद्याची लागवड केली आहे, त्यांना कांदा टिकविण्यासाठी पावसाची गरज आहे तर ज्यांना चांगल्या पावसाची प्रतिक्षा आहे त्यांनी अद्याप लागवड केलेली नाही. त्यामुळे पोळ कांद्याचे पीक पावसाअभावी धोक्यात आले आहे, त्याच बरोबर जून ते सप्टेंबर दरम्यान पडणाºया पावसावर भिस्त ठेवून आॅक्टोंबर, नोव्हेंबरमध्ये उन्हाळ कांद्याची लागवडीवर देखील सध्याच्या अपुºया पावसाचा परिणाम होणार असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. उन्हाळ कांदा साधारणत: फेब्रुवारी ते मार्च दरम्यान बाजारात येतो, तो पर्यत साठवणुकीयोग्य नसलेला पोळ कांदा बाजारातून संपुष्टात आलेला असतो. त्यामुळे येणा-या आठ ते नऊ महिन्यात ग्राहकांच्या चवीची जबाबदारी पेलणाºया उन्हाळ कांद्याच्याही लागवडीवर आता परिणाम होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.कांद्याची दरवाढ वा कांद्याचे कोसळलेल्या भावाचा बाजारपेठेवर ज्या पद्धतीने परिणाम होतो तसाच परिणाम भारतीय राजकारणावरही झाल्याची आजवरची अनेक उदाहरणे असून, पोळ कांद्याचे घटणारे उत्पादन व उन्हाळ कांद्याची कोणतीही शाश्वती सद्या दिसत नसल्याने ऐन लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात कांद्याचा तुटवडा व वाढलेले दर यावरच विरोधकांकडून भर दिला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वीच राजकारण्यांना कांदा रडवणार असे चित्र दिसू लागले आहे.

टॅग्स :agricultureशेतीNashikनाशिक