शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

पाण्याअभावी उन्हाळ कांदे सोडून देण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 18:22 IST

चणकापूर उजव्या कालव्याला पाणी सुटेल या आशेवर असलेल्या वाजगाव येथील शेतकऱ्यांवर शेतातील उन्हाळी कांदे सोडून देण्याची वेळ आली आहे.

देवळा : चणकापूर उजव्या कालव्याला पाणी सुटेल या आशेवर असलेल्या वाजगाव येथील शेतकऱ्यांवर शेतातील उन्हाळी कांदे सोडून देण्याची वेळ आली आहे.गतवर्षी पावसाळ्यात चणकापूर उजव्या कालव्याला सोडलेल्या पूरपाण्यामुळे वाजगाव येथील विहिरींना पाणी उतरले होते. रब्बीचा हंगाम पदरात पडेल या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळी कांद्याची लागवड केली होती. कारण कांदा लागवडीच्या वेळी या शेतकºयांच्या विहिरींना भरपूर पाणी होते. तसेच दरवर्षी जानेवारी महिन्यात कालव्याला एक आवर्तन सोडले जात होते. यामुळे कांदा पीक सहज निघून येईल या भरवशावर शेतकरी होते.जानेवारी महिन्यात देवळा येथे विकासकामांच्या उद्घाटनासाठी पालकमंत्री गिरीश महाजन आले असताना वाजगाव येथील शेतकºयांच्या शिष्टमंडळाने त्यांच्या पुढे कैफियत मांडली होती. त्यावेळी महाजन यांनी कालव्याला पाणी सोडण्याबाबत प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले होते; परंतु अद्यापपर्यंत कालव्याला आवर्तन सोडण्यात आले नाही. महिनाभरापासून वाजगाव परिसरातील सर्व विहिरींनी तळ गाठल्यामुळे शेतकºयांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. चणकापूर उजव्या कालव्याला पाणी सोडण्यासाठी दरवर्षी तालुक्यातील शेतकºयांना संघर्ष करावा लागत आहे. चणकापूर उजव्या कालव्याला निश्चित आवर्तन नसल्यामुळे शेतकºयांचे पाण्याचे वेळापत्रक कोलमडते. पिकांचे नियोजन करता येत नाही. यामुळे कालव्याला नियमित आवर्तने करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

टॅग्स :Nashikनाशिकagricultureशेतीonionकांदा