शहरं
Join us  
Trending Stories
1
फलटण प्रकरणाचा होणार एसआयटीमार्फत तपास; मुख्यमंत्री फडणवीस यांचे पोलिस महासंचालकांना आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०१ नोव्हेंबर २०२५: अचानक धनलाभ, प्रिय व्यक्तींचा सहवास; मन प्रसन्न राहील
3
विरोधकांचा आज मुंबईत निघणार 'सत्याचा मोर्चा'; निवडणूक आयोगाविरोधात करणार कोर्टात याचिका
4
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
5
जिल्हा परिषदांऐवजी आधी नगरपालिकांची निवडणूक; आयोगाकडून घोषणा पुढील आठवड्यात
6
हात बांधले, बंदूक रोखली अन्.. ओलीस नाट्याचा तीन महिन्यांपासून कट; चार दिवसांपासून सुरू होती रंगीत तालीम
7
'दीपक केसरकरांनी अन्याय केला'; आम्ही फेक सीन करत होतो, तो मात्र ते वास्तवात आणत होता...
8
तिसरे अपत्य लपविणाऱ्यास निवडणुकीत बसणार चाप! सप्टेंबर २००१ नंतर जन्मलेले तिसरे अपत्य ठरवेल उमेदवाराला अपात्र
9
अडीच लाख अन् महिन्याच्या रेशनसाठी चिमुकलीचे शोषण; आईच तिला रोज रात्री नराधमाकडे सोपवायची
10
रोहित आर्याने पोलिसांवर गोळी झाडलीच नाही...; गुन्हे शाखेकडून तपास सुरू, अपघाती मृत्यू म्हणून नोंद
11
लोकल प्रवाशांचा उद्या तिन्ही मार्गावर होणार खोळंबा; देखभालीसाठी मध्य, पश्चिम व हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
12
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
13
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
14
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
15
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
16
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
17
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
18
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
19
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
20
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश

अवकाळी.. निर्यातबंदी, आता कोरोना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 22:07 IST

निफाड/खेडलेझुंगे : खरीप हंगामानंतर रब्बी हंगाम वाया जाण्याच्या भीतीने शेतकरी हवालदिल झाले आहेत. आधी अवकाळी.. नंतर निर्यातबंदी, आता कोरोनाच्या धसक्याने शेतकरी धास्तावले आहेत. सततच्या हवामानबदलामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.

ठळक मुद्देसंकटांची मालिका : खरिपापाठोपाठ रब्बी हंगाम वाया जाण्याच्या भीतीने शेतकरी हवालदिल

लोकमत न्यूज नेटवर्कनिफाड/खेडलेझुंगे : खरीप हंगामानंतर रब्बी हंगाम वाया जाण्याच्या भीतीने शेतकरी हवालदिल झाले आहेत. आधी अवकाळी.. नंतर निर्यातबंदी, आता कोरोनाच्या धसक्याने शेतकरी धास्तावले आहेत. सततच्या हवामानबदलामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.मागील आठवड्यात नांदगाव, नंदुरबार, मराठवाड्यात झालेल्या बेमोसमी पावसामुळे परिसरातील वातावरणात मोठ्या प्रमाणातबदल घडून आले आहेत. परिसरामध्ये मागील चार-पाच दिवसांपासून सोसाट्याचा वारा वाहत आहे. त्यामुळे उभीपिके आडवी होत आहेत. यात शेतकºयांचे अतोनात नुकसान होत आहे.शेतमालाला योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी हैराण असतानाच कोरोनामुळे बाजारामध्ये शुकशुकाट निर्माण झालेला आहे.निफाड तालुक्यात यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पर्जन्यमान झालेले आहे. त्यामुळे परिसरातील नदी-नाले, विहीर, तलाव, बोरवेल व इतर उपलब्ध जलाशयांमध्ये मुबलक पाणी आहे. रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात पिकांची लागवड करण्यात आलेली आहे.दरम्यान, अवकाळी पावसाने हाताला आलेल्या खरिपातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. खरिपातील नुकसान विसरून शेतकºयांनी रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात हरभरा, गहू, उन्हाळी सूर्यफूल, कांदा आदी पिकांची लागवड केलेली आहे. पैकी कांदा व गहू या पिकांची विक्रमी लागवड झालेली आहे.मागील चार ते पाच दिवसांपासून परिसरामध्ये ढगाळ वातावरण असल्याने शेतकºयांच्या चिंतेत वाढ झाली आहे.त्यातच वाहणाºया सोसाट्याच्या वाºयामुळे उभे गव्हाचे पीक आडवे होत आहे. निसर्गाच्या सततच्या लहरीपणामुळे पिकांचे मोठे नुकसान होत आहे. विजेचाही खेळखंडोबारात्री गारवा, सकाळी धुके, ढगाळ वातावरण आणि उन्हाची तीव्रता यामुळे कोणता ऋतू सुरू आहे याचे आकलन होत नाही. दिवसभरातील उन्हाच्या कडाक्यामुळे पिकांचे मोठे नुकसान होत आहे. जमिनीतील गारवा उन्हाच्या तीव्रतेमुळे झपाट्याने कमी होत आहे, त्यामुळे पिकांना वारंवार पाणी द्यावे लागत आहे. त्यातच विजेच्या भारनियमामुळे शेतकरी हैराण आहेत. दिवसा उन्हाच्या तीव्रतेमुळे पिके कोमेजून जात आहे. त्यामुळे पुन्हा उत्पादनात घट होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यातच उपलब्ध होणाºया शेतमालाला दर नसल्याने शेतकºयांची आर्थिक कोंडी होत आहे. शेतकºयांचे आर्थिक नियोजन कोलमडून पडले आहे. अवकाळी पाऊस आणि हवामानातील बदलामुळे हातातोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान होत असताना पुन्हा कोरोनाचा फटका आहे. निर्यातबंदी उठूनही कांद्याला पाहिजे त्याप्रमाणात दर मिळत नसल्याने शेतकरी चिंंतित आहेत.बाजारपेठांमध्ये शुकशुकाटबाजारांमध्ये उन्हाच्या तडाख्यामुळे टमाट्याची आवक वाढल्याने टमाटा कवडीमोल दरात विक्र ी करावा लागत आहे. त्यामुळे झालेला खर्चही भरून निघणे मुश्कील झाले आहे. निर्यातबंदी उठूनही कांद्याच्या दरात कोणत्याही प्रकारचा बदल झाल्याचे दिसून येत नाही. त्यातच कोरोना व्हायरसमुळे नाशिक जिल्ह्यात जमावबंदी लागू केल्यामुळे स्थानिक बाजारपेठांमध्ये शुकशुकाट बघावयास मिळत आहे. त्यामुळे विक्रीसाठी आणलेला शेतमाल विक्र ी करणे अत्यंत जिकिरीचे झालेले आहे. शेतमाल बाजारपेठांमध्ये विक्रीसाठी आणताना झालेला खर्चही फिटत नसल्याने शेतकºयांवर मोठ्या प्रमाणावर आर्थिक संकट दाटून आलेले आहे. कोरोना या संसर्गजन्य आजारामुळे स्थानिक बाजारपेठांमध्ये शुकशुकाट बघावयास मिळत आहे.

टॅग्स :NashikनाशिकFarmerशेतकरी