शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

भुकेबरोबरच तहानेनेही जीव जाण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 23:57 IST

कोरोनामुळे जीव जाईल तेव्हा जाईल; पण आता भुकेबरोबरच तहानेनेही जीव जाण्याची वेळ आली आहे, ही वेदनादायी व्यथा आहे तालुक्यातील बरड्याच्या वाडीतील ग्रामस्थांची. एप्रिल महिना सुरू झाला की, तालुक्यात पाणीटंचाईची धग जाणवायला सुरुवात होते. सध्या कोरोनाचे संकट अधिक गहिरे होत असतानाच लॉकडाउनमुळे कष्टकऱ्यांचा रोजगारही थांबला आहे. त्यामुळे बरड्याच्या वाडी येथे भुकेबरोबरच ग्रामस्थांचा पाण्यासाठीही लढा तीव्र झाला आहे. ग्रामस्थांनी घोटभर पाण्यासाठी श्रमदानातून खड्डा खोदत आपली लढाई सुरू ठेवली आहे.

ठळक मुद्देबरड्याची वाडी : घोटभर पाण्यासाठी ग्रामस्थांची सुरू आहे लढाई

वसंत तिवडे ।त्र्यंबकेश्वर : कोरोनामुळे जीव जाईल तेव्हा जाईल; पण आता भुकेबरोबरच तहानेनेही जीव जाण्याची वेळ आली आहे, ही वेदनादायी व्यथा आहे तालुक्यातील बरड्याच्या वाडीतील ग्रामस्थांची. एप्रिल महिना सुरू झाला की, तालुक्यात पाणीटंचाईची धग जाणवायला सुरुवात होते. सध्या कोरोनाचे संकट अधिक गहिरे होत असतानाच लॉकडाउनमुळे कष्टकऱ्यांचा रोजगारही थांबला आहे. त्यामुळे बरड्याच्या वाडी येथे भुकेबरोबरच ग्रामस्थांचा पाण्यासाठीही लढा तीव्र झाला आहे. ग्रामस्थांनी घोटभर पाण्यासाठी श्रमदानातून खड्डा खोदत आपली लढाई सुरू ठेवली आहे.टाके देवगाव ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील बरड्याची वाडी येथील पाणीटंचाई यापूर्वीच सुरु झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने २५ ते ३१ मार्चपर्यंत लॉकडाउन करून लोकांना घराबाहेर पडण्यास मनाई केली होती. लोकांना एकप्रकारे जनता कर्फ्यू पाळण्याशिवाय गत्यंतर नव्हते. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांसाठी संपूर्ण लॉकडाउनची घोषणा केली. त्यामुळे सर्वच व्यवहार थंडावले आहेत. रेल्वे, बसेस खासगी प्रवासी वाहतूक बंद करण्यात आल्याने आहे तेथेच थांबा असे सांगण्यात आले. परिणामी कोणी स्थलांतराचा प्रयत्न केला तर त्यांना परत पाठविण्यात आले. कामधंद्यासाठी बाहेरगावी गेलेले मजूर आपले बोजे सांभाळत पायीच शेकडो कि.मी. अंतर तुडवित गावाकडे परतू लागले. रोजगाराअभावी लोकांची उपासमार होऊ लागली. सरकारने मोफत भोजन तसेच रेशन वाटपाच्या घोषणा केल्या; पण प्रत्यक्षात खरा लाभार्थी आदिवासी गरीब माणसाच्या हातात काहीच पडले नाही. अजूनही त्यांची झोळी रिकामीच आहे. यातच तालुक्यातील बरड्याच्या वाडीची कहाणी तर वेगळीच आहे. या ठिकाणी पाणीटंचाईने आतापासूनच डोके वर काढले आहे. दोन वर्षांपूर्वी येथील पाणीटंचाईची धग सोशल माध्यमातून देशभर जाऊन पोहोचली होती. आता कोरोनाचे संकटाबरोबरच गावाला पाणीटंचाईचाही भीषण सामना करावा लागत आहे. पाण्यासाठी पुन्हा भटकंती सुरू झाली आहे. आपली लढाई आपल्यालाच लढायची आहे, या निर्धाराने येथील ग्रामस्थांनी घोटभर पाण्यासाठी श्रमदानातून खड्डा खोदण्यास सुरूवात केली आहे.४त्र्यंबकेश्वर तालुक्यात १२४ गावे व असंख्य वाडे-पाडे असून, जवळपास ९० टक्के आदिवासी तालुका आहे. २०१९ मध्ये साधारण साडेचारशे मि.मी. पाउस पडूनही येथील पाणीटंचाईने डोके वर काढले आहे. रोजगार थांबल्याने अन्नासाठी दाही दिशा फिरण्याची वेळ आली आहे. तसेच भुकेबरोबरच तहानेनेही जीव जाण्याची वेळ येथील नागरिकांवर येऊन ठेपली आहे. तालुक्यातील पाणीटंचाईकडे शासनाने लक्ष द्यावे आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य