शहरं
Join us  
Trending Stories
1
'महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतोय, तुम्हाला आपटून आपटून मारू?', भाजप खासदार निशिकांत दुबेंचा ठाकरेंवर हल्ला
2
"पैसे देणे होत नसेल, तर पत्नी माझ्या घरी आणून सोड"; व्याजाच्या पैशावरून त्रासाने संपवलं जीवन
3
ऐकावं ते नवलंच... अचानक लोकप्रिय ब्रँडच्या बिअर दुकानांमधून झाल्या गायब, राजधानीत नक्की काय झालं?
4
"हो मी पाकिस्तानी सैन्याचा एजंट होतो", तहव्वूर राणाने चौकशीमध्ये केले अनेक धक्कादायक गौप्यस्फोट
5
Crizac IPO Allotment Status: ६० पट सबस्क्रिप्शन, शेअर्स अलॉट झालेत का, कसं कराल चेक? GMP प्रीमिअमवर
6
फुलेरात पुन्हा येण्याची तयारी सुरु करा! 'पंचायत ५'ची अधिकृत घोषणा, 'या' दिवशी रिलीज होणार
7
खळबळजनक! दिवसाढवळ्या एका व्यावसायिकाची गोळ्या घालून हत्या
8
ट्रम्प यांनी मस्क यांना झटका देण्यास केली सुरुवात; अमेरिकन सैन्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवली 'गोळी'
9
किती वाईट दिसतंय ते? अंकिता लोखंडेचा लूक पाहून चाहते शॉक; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
10
हाफिज सईद पाकिस्तानात नाही? नेमका कुठे लपून बसलाय तोयबाचा म्होरक्या? 'या' व्यक्तव्यांमधून मिळाले मोठे संकेत
11
हृदयद्रावक! ११ महिन्यांच्या मुलीने गमावले आई-वडील, आजी; झाली अनाथ, डोळे पाणावणारा Video
12
चातुर्मासातील पहिले भौम प्रदोष व्रत: ‘असे’ करा पूजन, महादेवांची अखंड कृपा; शुभच होईल!
13
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचा ग्रॅज्युएट; तरीही करतोय फूड डिलिव्हरीचं काम, महिन्याला लाखोंची कमाई
14
५ जुलैला जपानवर कोणतेही संकट आलेच नाही? रिओ तात्सुकीची भविष्यवाणी फोल ठरली?
15
Chaturmas 2025 Rangoli: चातुर्मासात दारासमोर रोज दोन बोटं रांगोळी काढा आणि लक्ष्मीकृपा मिळवा!
16
सुपरहिट सिनेमांचा साक्षीदार 'फिल्मीस्तान स्टुडिओ' अखेर विकला; फिल्म इंडस्ट्री भावुक
17
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ५ मूलांक लकी, विविध लाभच लाभ; यश-प्रगती-भरभराट, स्वामी कल्याण करतील!
18
भयंकर! दरोडेखोरांनी घरात घुसून पत्नी, मुलांसमोर केली इंजिनिअरची हत्या; पैसे, दागिने घेऊन पसार
19
अमेरिका-चीन व्यापार युद्धात अंबानींची एन्ट्री? बीजिंगला जाणारे गॅस जहाज आता थेट भारतात!
20
कर्नाटकातील अथणीत कार-बसचा अपघात, चौघे ठार; कोल्हापूरहून देवदर्शन करून परतताना काळाचा घाला

भुकेबरोबरच तहानेनेही जीव जाण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 23:57 IST

कोरोनामुळे जीव जाईल तेव्हा जाईल; पण आता भुकेबरोबरच तहानेनेही जीव जाण्याची वेळ आली आहे, ही वेदनादायी व्यथा आहे तालुक्यातील बरड्याच्या वाडीतील ग्रामस्थांची. एप्रिल महिना सुरू झाला की, तालुक्यात पाणीटंचाईची धग जाणवायला सुरुवात होते. सध्या कोरोनाचे संकट अधिक गहिरे होत असतानाच लॉकडाउनमुळे कष्टकऱ्यांचा रोजगारही थांबला आहे. त्यामुळे बरड्याच्या वाडी येथे भुकेबरोबरच ग्रामस्थांचा पाण्यासाठीही लढा तीव्र झाला आहे. ग्रामस्थांनी घोटभर पाण्यासाठी श्रमदानातून खड्डा खोदत आपली लढाई सुरू ठेवली आहे.

ठळक मुद्देबरड्याची वाडी : घोटभर पाण्यासाठी ग्रामस्थांची सुरू आहे लढाई

वसंत तिवडे ।त्र्यंबकेश्वर : कोरोनामुळे जीव जाईल तेव्हा जाईल; पण आता भुकेबरोबरच तहानेनेही जीव जाण्याची वेळ आली आहे, ही वेदनादायी व्यथा आहे तालुक्यातील बरड्याच्या वाडीतील ग्रामस्थांची. एप्रिल महिना सुरू झाला की, तालुक्यात पाणीटंचाईची धग जाणवायला सुरुवात होते. सध्या कोरोनाचे संकट अधिक गहिरे होत असतानाच लॉकडाउनमुळे कष्टकऱ्यांचा रोजगारही थांबला आहे. त्यामुळे बरड्याच्या वाडी येथे भुकेबरोबरच ग्रामस्थांचा पाण्यासाठीही लढा तीव्र झाला आहे. ग्रामस्थांनी घोटभर पाण्यासाठी श्रमदानातून खड्डा खोदत आपली लढाई सुरू ठेवली आहे.टाके देवगाव ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील बरड्याची वाडी येथील पाणीटंचाई यापूर्वीच सुरु झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने २५ ते ३१ मार्चपर्यंत लॉकडाउन करून लोकांना घराबाहेर पडण्यास मनाई केली होती. लोकांना एकप्रकारे जनता कर्फ्यू पाळण्याशिवाय गत्यंतर नव्हते. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांसाठी संपूर्ण लॉकडाउनची घोषणा केली. त्यामुळे सर्वच व्यवहार थंडावले आहेत. रेल्वे, बसेस खासगी प्रवासी वाहतूक बंद करण्यात आल्याने आहे तेथेच थांबा असे सांगण्यात आले. परिणामी कोणी स्थलांतराचा प्रयत्न केला तर त्यांना परत पाठविण्यात आले. कामधंद्यासाठी बाहेरगावी गेलेले मजूर आपले बोजे सांभाळत पायीच शेकडो कि.मी. अंतर तुडवित गावाकडे परतू लागले. रोजगाराअभावी लोकांची उपासमार होऊ लागली. सरकारने मोफत भोजन तसेच रेशन वाटपाच्या घोषणा केल्या; पण प्रत्यक्षात खरा लाभार्थी आदिवासी गरीब माणसाच्या हातात काहीच पडले नाही. अजूनही त्यांची झोळी रिकामीच आहे. यातच तालुक्यातील बरड्याच्या वाडीची कहाणी तर वेगळीच आहे. या ठिकाणी पाणीटंचाईने आतापासूनच डोके वर काढले आहे. दोन वर्षांपूर्वी येथील पाणीटंचाईची धग सोशल माध्यमातून देशभर जाऊन पोहोचली होती. आता कोरोनाचे संकटाबरोबरच गावाला पाणीटंचाईचाही भीषण सामना करावा लागत आहे. पाण्यासाठी पुन्हा भटकंती सुरू झाली आहे. आपली लढाई आपल्यालाच लढायची आहे, या निर्धाराने येथील ग्रामस्थांनी घोटभर पाण्यासाठी श्रमदानातून खड्डा खोदण्यास सुरूवात केली आहे.४त्र्यंबकेश्वर तालुक्यात १२४ गावे व असंख्य वाडे-पाडे असून, जवळपास ९० टक्के आदिवासी तालुका आहे. २०१९ मध्ये साधारण साडेचारशे मि.मी. पाउस पडूनही येथील पाणीटंचाईने डोके वर काढले आहे. रोजगार थांबल्याने अन्नासाठी दाही दिशा फिरण्याची वेळ आली आहे. तसेच भुकेबरोबरच तहानेनेही जीव जाण्याची वेळ येथील नागरिकांवर येऊन ठेपली आहे. तालुक्यातील पाणीटंचाईकडे शासनाने लक्ष द्यावे आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य