शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
4
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
5
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
6
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
7
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
8
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
9
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
10
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
11
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
12
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
13
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
14
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
15
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
16
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
17
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
18
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
19
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

भुकेबरोबरच तहानेनेही जीव जाण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 23:57 IST

कोरोनामुळे जीव जाईल तेव्हा जाईल; पण आता भुकेबरोबरच तहानेनेही जीव जाण्याची वेळ आली आहे, ही वेदनादायी व्यथा आहे तालुक्यातील बरड्याच्या वाडीतील ग्रामस्थांची. एप्रिल महिना सुरू झाला की, तालुक्यात पाणीटंचाईची धग जाणवायला सुरुवात होते. सध्या कोरोनाचे संकट अधिक गहिरे होत असतानाच लॉकडाउनमुळे कष्टकऱ्यांचा रोजगारही थांबला आहे. त्यामुळे बरड्याच्या वाडी येथे भुकेबरोबरच ग्रामस्थांचा पाण्यासाठीही लढा तीव्र झाला आहे. ग्रामस्थांनी घोटभर पाण्यासाठी श्रमदानातून खड्डा खोदत आपली लढाई सुरू ठेवली आहे.

ठळक मुद्देबरड्याची वाडी : घोटभर पाण्यासाठी ग्रामस्थांची सुरू आहे लढाई

वसंत तिवडे ।त्र्यंबकेश्वर : कोरोनामुळे जीव जाईल तेव्हा जाईल; पण आता भुकेबरोबरच तहानेनेही जीव जाण्याची वेळ आली आहे, ही वेदनादायी व्यथा आहे तालुक्यातील बरड्याच्या वाडीतील ग्रामस्थांची. एप्रिल महिना सुरू झाला की, तालुक्यात पाणीटंचाईची धग जाणवायला सुरुवात होते. सध्या कोरोनाचे संकट अधिक गहिरे होत असतानाच लॉकडाउनमुळे कष्टकऱ्यांचा रोजगारही थांबला आहे. त्यामुळे बरड्याच्या वाडी येथे भुकेबरोबरच ग्रामस्थांचा पाण्यासाठीही लढा तीव्र झाला आहे. ग्रामस्थांनी घोटभर पाण्यासाठी श्रमदानातून खड्डा खोदत आपली लढाई सुरू ठेवली आहे.टाके देवगाव ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील बरड्याची वाडी येथील पाणीटंचाई यापूर्वीच सुरु झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने २५ ते ३१ मार्चपर्यंत लॉकडाउन करून लोकांना घराबाहेर पडण्यास मनाई केली होती. लोकांना एकप्रकारे जनता कर्फ्यू पाळण्याशिवाय गत्यंतर नव्हते. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांसाठी संपूर्ण लॉकडाउनची घोषणा केली. त्यामुळे सर्वच व्यवहार थंडावले आहेत. रेल्वे, बसेस खासगी प्रवासी वाहतूक बंद करण्यात आल्याने आहे तेथेच थांबा असे सांगण्यात आले. परिणामी कोणी स्थलांतराचा प्रयत्न केला तर त्यांना परत पाठविण्यात आले. कामधंद्यासाठी बाहेरगावी गेलेले मजूर आपले बोजे सांभाळत पायीच शेकडो कि.मी. अंतर तुडवित गावाकडे परतू लागले. रोजगाराअभावी लोकांची उपासमार होऊ लागली. सरकारने मोफत भोजन तसेच रेशन वाटपाच्या घोषणा केल्या; पण प्रत्यक्षात खरा लाभार्थी आदिवासी गरीब माणसाच्या हातात काहीच पडले नाही. अजूनही त्यांची झोळी रिकामीच आहे. यातच तालुक्यातील बरड्याच्या वाडीची कहाणी तर वेगळीच आहे. या ठिकाणी पाणीटंचाईने आतापासूनच डोके वर काढले आहे. दोन वर्षांपूर्वी येथील पाणीटंचाईची धग सोशल माध्यमातून देशभर जाऊन पोहोचली होती. आता कोरोनाचे संकटाबरोबरच गावाला पाणीटंचाईचाही भीषण सामना करावा लागत आहे. पाण्यासाठी पुन्हा भटकंती सुरू झाली आहे. आपली लढाई आपल्यालाच लढायची आहे, या निर्धाराने येथील ग्रामस्थांनी घोटभर पाण्यासाठी श्रमदानातून खड्डा खोदण्यास सुरूवात केली आहे.४त्र्यंबकेश्वर तालुक्यात १२४ गावे व असंख्य वाडे-पाडे असून, जवळपास ९० टक्के आदिवासी तालुका आहे. २०१९ मध्ये साधारण साडेचारशे मि.मी. पाउस पडूनही येथील पाणीटंचाईने डोके वर काढले आहे. रोजगार थांबल्याने अन्नासाठी दाही दिशा फिरण्याची वेळ आली आहे. तसेच भुकेबरोबरच तहानेनेही जीव जाण्याची वेळ येथील नागरिकांवर येऊन ठेपली आहे. तालुक्यातील पाणीटंचाईकडे शासनाने लक्ष द्यावे आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य