शहरं
Join us  
Trending Stories
1
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
2
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
3
रॉकेट बनला हा स्मॉलकॅप शेअर, जपानच्या कंपनीसोबत डील; सचिन तेंडुलकरचीही आहे गुंतवणूक
4
विद्यार्थ्याला मारहाण अन् उलटे टांगल्या प्रकरणी मुख्याध्यापक, ड्रायव्हरला अटक; शाळा बंद केली
5
टीम इंडियानं आशिया कप जिंकताच मोदींनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख केला, विरोधकांनी असा टोला लगावला
6
“गुवाहाटीतून आणलेले पैसे दिले तर लोकांचा त्रास एका मिनिटात संपेल”; शिंदे गटाला कुणाचा टोला?
7
३ वर्षांत ₹२४१ कोटींची कमाई! एवढा पैसा कुठून आला? स्वतः प्रशांत किशोर यांनी केला खुलासा 
8
'त्या नारी शक्तीचे एक उदाहरण...', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जॉर्जिया मेलोनी यांच्या आत्मचरित्राला प्रस्तावना लिहिली
9
प्रशांत किशोर यांची 3 वर्षांची कमाई बघून थक्क व्हाल, जन सूरज पक्षाला डोनेट केले तब्बल 98 कोटी!
10
अरेरे! लहान वयात केस पिकले, नारळाच्या तेलात 'हे' मिसळा; चिंता सोडा, पांढऱ्या केसांना टाटा करा
11
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
12
'हे' मेड इन इंडिया मॅसेजिंग अ‍ॅप घेणार WhatsApp ची जागा? दुर्गम भागातील लोकांना होणार फायदा?
13
एशिया कप 2025 चा हिरो: विजयाचा तिलक लावला खरा, पण कुटुंबाचे २०२२ पर्यंत स्वत:चे घर नव्हते...; वडील इलेक्ट्रीशिअन...
14
ऑटो कंपन्यांचे पाकिस्तानातून पलायन! सरकारकडून सेकंड हॅन्ड गाड्यांना आयात करण्यासाठी परवानगी
15
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
16
वनप्लस १३ नंतर १४ नाही, थेट १५ सिरीज बाजारात आणणार; भारतात कधी लाँच होणार... 
17
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंच्या नावाची रस्त्यावर रांगोळी; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
18
सणासुदीच्या काळात सावध राहा! सायबर गुन्हेगार AI वापरुन करतायेत फसवणूक; कसं राहाल सुरक्षित?
19
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
20
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!

पूर्व भागात पाणी विकत घेण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 00:29 IST

गिरणारे परिसरातील महिलांच्या डोक्यावरील हंडा कमरेवर आणण्यासाठी शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून पाणीपुरवठा योजना राबविल्या व जलशिवारातील पाणी अडवून कृत्रिमरीत्या पाणवठे निर्माण करण्यासाठी कोट्यवधी निधी खर्च केला; परंतु ग्रामीण भागात घोटभर पाण्यासाठी होणारी वणवण आजही कायम असून, काही गावांना पिण्यासाठी पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे.

गिरणारे : गिरणारे परिसरातील महिलांच्या डोक्यावरील हंडा कमरेवर आणण्यासाठी शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून पाणीपुरवठा योजना राबविल्या व जलशिवारातील पाणी अडवून कृत्रिमरीत्या पाणवठे निर्माण करण्यासाठी कोट्यवधी निधी खर्च केला; परंतु ग्रामीण भागात घोटभर पाण्यासाठी होणारी वणवण आजही कायम असून, काही गावांना पिण्यासाठी पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे.नाशिक तालुक्यातील आदिवासी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साप्ते, रोहिले, लव्हाळीपाडा, हिरडी, पिंपरी, माळेगाव, गणेशगाव या वाड्या-वस्त्यांमध्ये मार्चपासून पिण्याच्या पाण्याची समस्या जाणवत आहे. आदिवासी व महिलावर्ग रात्रंदिवस पाण्यासाठी भटकत आहेत. या भटकंतीमुळे व सध्या वाढत असलेल्या उन्हाच्या दाहकतेमुळे ग्रामीण भागात आजाराचे प्रमाण वाढले आहे.  मागील काही दोन वर्षांपासून तालुक्यात पावसाचे प्रमाण वाढूनही उन्हाळा येताच डोंगरमाथ्यासह सखल भूभागातदेखील पाण्यासाठी दाहीदिशा होत असलेली भटकंती अद्याप दूर झालेली नाही. शासन यंत्रणा मात्र टंचाई नसल्याचे चित्र रंगवीत आहे. जलयुक्त शिवार योजनेचे यश दाखविण्यासाठी टँकरचे प्रस्ताव अटी-शर्तींच्या नावाने फेटाळले जात आहेत. सर्वत्र पाणीटंचाई जाणवत आहे. रणरणत्या उन्हात पाण्यासाठी भटकंती होत असताना शासन टँकर देत नाही. दोन किमी परिसरात पाणी असल्याचे कारण पुढे करण्यात येते.बेसाल्ट खडकामुळे पाणी झिरपण्यास बाधागेल्या काही वर्षांतील नळपाणीपुरवठा योजनांचे स्रोत पूर्णत: बदलले आहे. तालुक्यातील बहुतांश भाग बेसाल्ट खडकांचा असल्याने पाणी झिरपा होत नाही. पावसाळ्यात पाणी वाहून जाते. पाणवठा असणाºया जागा कोरड्या पडल्या आहेत. यातून भविष्यातील पाण्याची असलेली भीषणता आपल्यासमोर येत आहे. जलयुक्त शिवार योजनेचे हे चौथे वर्ष आहे. यापूर्वीदेखील जलसंधारणाच्या नावाने कामे झालेली आहेत.हिरडी येथे पाणी विकत घेण्याची वेळगिरणारे जवळील हिरडी येथे पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाल्याने व पाण्याचा उद्भव नसल्याने गावातील नागरिकांना पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. त्यासाठी १०० रुपये टिपाड याप्रमाणे ग्रामस्थांना पाणी विकत घ्यावे लागत आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई