शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump Tariff on India: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर सरकारचा प्लान तयार, आता देणार ‘जशास तसं’ उत्तर
2
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
3
१२ वर्षं वय... ३ महिन्यांत 200 जणांनी केलं 'वाईट कृत्य'! तुम्हालाही हादरवून टाकेल मुंबईतून रेस्क्यू करण्यात आलेल्या चिमुकलीची कहाणी
4
पठ्ठ्याने एकहाती सामना फिरवला! तब्बल ८ षटकार ठोकून टीम डेव्हिडने केली गोलंदाजांची धुलाई
5
ना अमेरिकन F-35, ना रशियन Su-57...; या मित्र देशाकडून लढाऊ विमाने खरेदी करून आणखी ताकद वाढवणार भारत! IAF ची मोठी मागणी
6
Viral Video : भर रस्त्यात हाय वोल्टेज ड्रामा! पत्नीने पतीच्या कानशिलात लगावल्या, कशावरून सुरू झालेला वाद?
7
आमिर खानच्या कुटुंबियांनी जारी केलं स्टेटमेंट, भाऊ फैजल खानचे सर्व आरोप फेटाळले
8
FD-RD सर्व विसराल; हा आहे LIC चा ‘तरुण’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल The End
9
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: ६ राशींना कल्याण काळ, अनपेक्षित लाभ; आर्थिक भरभराट!
10
Video: अल्लू अर्जुनने विमानतळावर अधिकाऱ्यासमोर दाखवला माज; अखेर काढावाच लागला मास्क
11
श्रावण संकष्ट चतुर्थी: यशोदामातेने केले होते व्रत, इच्छा होतील पूर्ण; यंदा विशेष अंगारक योग
12
नेत्यांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग; खासदार म्हणाले - आम्ही थोडक्यात बचावलो!
13
आजचे राशीभविष्य, ११ ऑगस्ट २०२५: विविध लाभ, मान-सन्मानाचा दिवस; संयम राखा, शांत राहा
14
१८७७ गावांमध्ये पूर, घराघरांत शिरलं पाणी, ६ लाख बाधित; 'या' राज्यात पावसाचा कहर सुरूच!
15
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
16
शरद पवारांनी निवडणूक आयोग-पोलिसांकडे तक्रार का केली नाही? : फडणवीस
17
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
18
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
19
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
20
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार

पूर्व भागात पाणी विकत घेण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 00:29 IST

गिरणारे परिसरातील महिलांच्या डोक्यावरील हंडा कमरेवर आणण्यासाठी शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून पाणीपुरवठा योजना राबविल्या व जलशिवारातील पाणी अडवून कृत्रिमरीत्या पाणवठे निर्माण करण्यासाठी कोट्यवधी निधी खर्च केला; परंतु ग्रामीण भागात घोटभर पाण्यासाठी होणारी वणवण आजही कायम असून, काही गावांना पिण्यासाठी पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे.

गिरणारे : गिरणारे परिसरातील महिलांच्या डोक्यावरील हंडा कमरेवर आणण्यासाठी शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून पाणीपुरवठा योजना राबविल्या व जलशिवारातील पाणी अडवून कृत्रिमरीत्या पाणवठे निर्माण करण्यासाठी कोट्यवधी निधी खर्च केला; परंतु ग्रामीण भागात घोटभर पाण्यासाठी होणारी वणवण आजही कायम असून, काही गावांना पिण्यासाठी पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे.नाशिक तालुक्यातील आदिवासी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साप्ते, रोहिले, लव्हाळीपाडा, हिरडी, पिंपरी, माळेगाव, गणेशगाव या वाड्या-वस्त्यांमध्ये मार्चपासून पिण्याच्या पाण्याची समस्या जाणवत आहे. आदिवासी व महिलावर्ग रात्रंदिवस पाण्यासाठी भटकत आहेत. या भटकंतीमुळे व सध्या वाढत असलेल्या उन्हाच्या दाहकतेमुळे ग्रामीण भागात आजाराचे प्रमाण वाढले आहे.  मागील काही दोन वर्षांपासून तालुक्यात पावसाचे प्रमाण वाढूनही उन्हाळा येताच डोंगरमाथ्यासह सखल भूभागातदेखील पाण्यासाठी दाहीदिशा होत असलेली भटकंती अद्याप दूर झालेली नाही. शासन यंत्रणा मात्र टंचाई नसल्याचे चित्र रंगवीत आहे. जलयुक्त शिवार योजनेचे यश दाखविण्यासाठी टँकरचे प्रस्ताव अटी-शर्तींच्या नावाने फेटाळले जात आहेत. सर्वत्र पाणीटंचाई जाणवत आहे. रणरणत्या उन्हात पाण्यासाठी भटकंती होत असताना शासन टँकर देत नाही. दोन किमी परिसरात पाणी असल्याचे कारण पुढे करण्यात येते.बेसाल्ट खडकामुळे पाणी झिरपण्यास बाधागेल्या काही वर्षांतील नळपाणीपुरवठा योजनांचे स्रोत पूर्णत: बदलले आहे. तालुक्यातील बहुतांश भाग बेसाल्ट खडकांचा असल्याने पाणी झिरपा होत नाही. पावसाळ्यात पाणी वाहून जाते. पाणवठा असणाºया जागा कोरड्या पडल्या आहेत. यातून भविष्यातील पाण्याची असलेली भीषणता आपल्यासमोर येत आहे. जलयुक्त शिवार योजनेचे हे चौथे वर्ष आहे. यापूर्वीदेखील जलसंधारणाच्या नावाने कामे झालेली आहेत.हिरडी येथे पाणी विकत घेण्याची वेळगिरणारे जवळील हिरडी येथे पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाल्याने व पाण्याचा उद्भव नसल्याने गावातील नागरिकांना पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. त्यासाठी १०० रुपये टिपाड याप्रमाणे ग्रामस्थांना पाणी विकत घ्यावे लागत आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई