शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

गुरुवार पासून लासलगावहून रेल्वेने भाजीपाला जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 20:14 IST

लासलगाव रेल्वेस्थानकावरून मुंबईकडे गेल्या अनेक वर्षांपासून भाजीपाला रेल्वेने पाठविला जात असताना दोन वर्षांपासून कोणतेही कारण न देता लासलगाव रेल्वेस्थानकावरून मुंबईकडे जाणाºया रेल्वेने भाजीपाला पाठविण्याची सुविधा काही कारणास्तव बंद करण्यात आली होती.

ठळक मुद्देदोन वर्षांनंतर सेवा पूर्ववत : रेल्वेकडे पाठपुराव्याला यशसायंकाळच्या वेळी खवादेखील मुंबईकडे रवाना होण्यास सुरुवात

लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : गेल्या दोन वर्षांपासून रेल्वेने बंद केलेली भाजीपाला वाहतूक सेवा आता पुन्हा पूर्ववत सुरू होणार असून, गुरुवार (दि. १९) पासून लासलगाव रेल्वेस्थानकावरून गोदावरी एक्स्प्रेसने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा भाजीपाला मुंबईला पाठविण्यास सुरुवात करण्यात येणार आहे.

लासलगाव रेल्वेस्थानकावरून मुंबईकडे गेल्या अनेक वर्षांपासून भाजीपाला रेल्वेने पाठविला जात असताना दोन वर्षांपासून कोणतेही कारण न देता लासलगाव रेल्वेस्थानकावरून मुंबईकडे जाणा-या रेल्वेने भाजीपाला पाठविण्याची सुविधा काही कारणास्तव बंद करण्यात आली होती. त्या अनुषंगाने स्थानिक शेतकरी, व्यापाऱ्यांनी खासदार डॉ. भारती पवार यांची भेट घेऊन भाजीपाला पाठविण्याची सुविधा पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली होती. त्यावरून डॉ. पवार यांनी, भुसावळ येथे रेल्वेच्या महाप्रबंधक एम. के. गुप्ता आणि वाणिज्य विभागाचे प्रमुख विनोद कुमार यांच्याशी चर्चा करून लासलगाव येथील शेतक-यांचे शिष्टमंडळ चर्चेकरिता भुसावळ येथे पाठवले होते. या शिष्टमंडळात पंचायत समिती सदस्य शिवा पाटील सुराशे, बाळासाहेब सोनवणे, सनी पाठक, दत्तू सुराशे आदींचा समावेश होता. रेल्वेच्या अधिकाºयांनी शेतक-यांची विनंती व त्यातील व्यवहार्यता तपासून गुरुवार, १९ डिसेंबरपासून भाजीपाला मुंबईकडे लासलगाव रेल्वेस्थानकावरून विविध रेल्वेगाड्यांनी रवाना करण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे सकाळच्या सत्रात असलेल्या रेल्वे गाड्यांनी भाजीपाला मोठ्या प्रमाणात व सायंकाळच्या वेळी खवादेखील मुंबईकडे रवाना होण्यास सुरुवात होणार असल्याची माहिती खासदार डॉ. भारती पवार यांनी दिली.

टॅग्स :agricultureशेतीNashikनाशिकrailwayरेल्वे