शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

बिहारमध्ये जाणाऱ्या तीन रेल्वे गाड्या रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2022 01:48 IST

केंद्र सरकारने लष्कर भरतीसाठी जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेविरोधात देशात काही ठिकाणी युवकांकडून विरोध होत आहे. रेल रोको केला जात आहे. त्यामुळे रविवारी दुसऱ्या दिवशीही रेल्वे वेळापत्रकावर परिणाम होऊन बिहारला जाणाऱ्या व येणाऱ्या काही गाड्या रद्द करण्यात आल्या. तर काही विलंबाने धावत असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.

ठळक मुद्देउत्तर भारतातील आंदोलनाचा परिणाम : प्रवाशांची गैरसोय

नाशिक रोड : केंद्र सरकारने लष्कर भरतीसाठी जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेविरोधात देशात काही ठिकाणी युवकांकडून विरोध होत आहे. रेल रोको केला जात आहे. त्यामुळे रविवारी दुसऱ्या दिवशीही रेल्वे वेळापत्रकावर परिणाम होऊन बिहारला जाणाऱ्या व येणाऱ्या काही गाड्या रद्द करण्यात आल्या. तर काही विलंबाने धावत असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. बिहारवरून येणारी पाटलीपुत्र, पटणा-वास्को, पवन या तीन गाड्या रविवारी रद्द करण्यात आल्या. मुंबईहून बिहारला जाणारी भागलपूर, पवन, जनता एक्स्प्रेस, स्पेशल हॉलिडे या गाड्या रद्द करण्यात आल्या. बिहारवरून येणारी महानगरी एक्स्प्रेस चार तास, गोदान तीन तास उशिराने धावली. काही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. नाशिक रोड मार्गे मुंबईला जाणाऱ्या आणि मुंबईहून उत्तर भारतात जाणाऱ्या रेल्वे गाड्यांना आंदोलनाचा फटका प्रामुख्याने बसत आहे. बिहारमधील पाटलीपुत्र आणि भागलपूर येथून मुंबईला रवाना होणाऱ्या प्रवासी रेल्वे गाड्या उत्तर भारतातील आंदोलनामुळे शनिवारी रद्द करण्यात आल्या होत्या. अग्निपथ योजनेच्या विरोधात आंदोलन असेच सुरू राहिले तर रेल्वेचे वेळापत्रक कोलमडून पडू शकते. आंदोलन आणखीन किती काळ सुरू राहणार हे स्पष्ट होत नसल्यामुळे रेल्वे वेळापत्रकाबाबतही अनिश्चितता आहे. उत्तर भारतात जाणाऱ्या-येणाऱ्या रेल्वे ऐनवेळी रद्द करण्यात आल्याने तसेच येणाऱ्या-जाणाऱ्या रेल्वे या उशिराने धावत असल्याने रेल्वे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.

टॅग्स :Nashikनाशिकrailwayरेल्वे