शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

त्र्यंबकेश्वरच्या दुगारवाडी धबधब्यात औरंगाबादचे तिघे विद्यार्थी बेपत्ता; युवतीचा मृतदेह सापडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2019 16:52 IST

ग्रामीण पोलीस आणि जिल्हा प्रशासन इतर दोन बेपत्ता विद्यार्थ्यांचा शोध घेत आहेत

 नाशिक -  त्र्यंबकेश्वरजवळील दुगारवाडी धबधबा येथे औरंगाबाद येथील कृषी महाविद्यालयाचे तीन विद्यार्थी बेपत्ता झाल्याची घटना बुधवारी (दि.१८) उघडकीस आली. यातील एका विद्यार्थीनीचा मृतदेह आढळून आला आहे. ग्रामीण पोलीस आणि जिल्हा प्रशासन इतर दोन बेपत्ता विद्यार्थ्यांचा शोध घेत आहेत.तेलंगणा राज्यातील काही विद्यार्थी औरंगाबाद जिल्ह्यातील कृषी महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. त्यातील गिरीधर आकाश (२०), व्यंकटेश रेड्डी (२०, दोघे रा. तेलंगणा), काव्या. एल (२०, रा. हैदराबाद), अनुषा (२१), रघुवंशी, कोटी रेड्डी (२०, तिघे रा. तेलंगणा) हे विद्यार्थी त्र्यंबकेश्वर सोमवारी (दि.१६) येथे आले आहेत. मंगळवारी (दि.१७) सर्व विद्यार्थी दुगारवाडी धबधबा पाहण्यासाठी सायंकाळी ४.३० च्या सुमारास गेले. मात्र उशीर झाल्याने आणि पाण्याचा अंदाज येत नसल्याने काही विद्यार्थी पुन्हा त्र्यंबकेश्वरकडे माघारी फिरले. त्यांनी इतरांना पाण्यात न उतरण्याचा सल्ला दिला.दरम्यान, रात्रभर वाट पाहूनही अनुषा, रघुवंशी आणि कोटी रेड्डी हे परतले नव्हते. त्यामुळे इतर विद्यार्थ्यांनी पुन्हा बुधवारी (दि.१८) दुगारवाडी धबधबा गाठला. त्यावेळी पाण्यात अनुषाचा मृतदेह तरंगताना आढळून आला. याची माहिती नागरिकांना मिळताच त्यांनी त्र्यंबकेश्वर पोलिसांशी संपर्क साधून मदत मागवली. त्यानंतर विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केले आहे. दुपारपर्यंत रघुवंशी आणि काव्या यांचा तपास लागलेला नव्हता.

टॅग्स :Nashikनाशिक