शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने प्रवाशांना उडवले, तिघांची प्रकृती गंभीर; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
4
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
5
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
6
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
7
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
8
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
9
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
10
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
11
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
12
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
13
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
14
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
15
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
16
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
17
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
18
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
19
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
20
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार

कृषी उत्पादनासाठी त्रिसूत्रीचे उद्दिष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 00:30 IST

यंदाच्या वर्षी पिकांची उत्पादकता, गुणवत्ता आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ या त्रिसूत्रीचा अवलंब करून बळीराजाला समाधानी करण्यासाठी शासन विशेष प्रयत्न करणार आहे, अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिली.

ठळक मुद्देदादा भुसे : कृषिदिन, कृषी संजीवनी सप्ताहाचा शुभारंभ; शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली पाहणी

नाशिक : यंदाच्या वर्षी पिकांची उत्पादकता, गुणवत्ता आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ या त्रिसूत्रीचा अवलंब करून बळीराजाला समाधानी करण्यासाठी शासन विशेष प्रयत्न करणार आहे, अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिली.राज्याचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मौजे कोणे येथे आयोजित कृषिदिन आणि ‘कृषी संजीवनी सप्ताह’ शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, आमदार हिरामण खोसकर, जिल्हा परिषद कृषी सभापती संजय बनकर, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा कृषी अधीक्षक संजय पडवळ, कृषी उपसंचालक कैलास शिरसाठ, ‘आत्मा’ उपसंचालक हेमंत काळे, उपविभागीय कृषी अधिकारी संजय सूर्यवंशी, तहसीलदार दीपक गिरासे, तालुका कृषी अधिकारी संदीप वळवी आदी मान्यवर उपस्थित होते.याप्रसंगी बोलताना भुसे म्हणाले खरीप हंगामात कोणत्याही जिल्ह्यात खतांचा तुटवडा भासणार नाही. कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकºयाने एकदा अर्ज केला अन् त्यावर्षी त्याला लाभ मिळू शकला नाही तर पुढील वर्षी त्या शेतकºयास अर्ज करण्याची गरज भासणार नाही अशा प्रकारची यंत्रणा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन असताना सर्वांचा पोशिंदा बळीराजाच होता. या प्रतिकूल परिस्थितीत अडचणींचा सामना करून शेतकºयांनी सर्वांपर्यंत अन्नधान्य, भाजीपाला पोहोचविला. १ ते ७ जुलै दरम्यान होणाºया सप्ताहात शेतकºयांच्या बांधावर जाऊन लोकप्रतिनिधी व कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी शेतकºयांना मार्गदर्शन करणार आहेत, असेही ते म्हणाले. याप्रसंगी मान्यवरांची भाषणे झाली. भुसे यांच्या हस्ते विमल आचारे, दिनकर कडाळे, सीताबाई मुळाणे, वासंती कांबळे, भास्कर कांबळे, मधुसूदन भारस्कर, विश्वास चव्हाण या शेतकºयांचा सत्कार करण्यात आला.यांत्रिक पद्धतीने भातलागवडकार्यक्रमापूर्वी दादा भुसे यांनी बांधावर जाऊन शेतकºयांशी संवाद साधला. धोंडेगाव येथील कासुबेंडकुळे व त्यांच्या पत्नी चंद्रभागा बेंडकुळे यांच्या घरी अचानक भेट देऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. या जोडप्याच्या रूपात साक्षात विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घडल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.किशोर पवार या शेतकºयाच्या शेडनेडची पाहणी केली. हिरामण ठाकरे या शेतकºयाने उभारलेल्या शेततळे व फळबाग याची पाहणी त्यांनी केली. एकनाथ भोये यांच्या शेतात यांत्रिकी पद्धतीने भातलागवडीचा शुभारंभ करण्यात आला. दादा भुसे यांनी स्वत: चिखलात उतरून मशीनची माहिती जाणून घेतली व भातलागवडदेखील केली.

टॅग्स :NashikनाशिकagricultureशेतीGovernmentसरकार