शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?
2
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
3
हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?
4
Stock Market Today: विक्रमी तेजीनंतर शेअर बाजारात घसरण; ५०० पेक्षा जास्त अंकांनी आपटला, तरीही फार्मा सेक्टरमध्ये तेजी का?
5
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
6
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
7
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
8
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
9
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
10
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
11
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
12
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
14
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
15
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
16
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
17
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
18
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
19
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
20
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय

एकाच आठवड्यात बिबट्याच्या हल्ल्याच्या तीन घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 01:09 IST

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य - वंजारवाडी रस्त्यावर असलेल्या सायखेडे शेतवस्तीवर येथील कैलास कर्पे यांच्या शेतवस्तीवर असलेल्या शिवाजी सायखेडे या शेतकर्याच्या एका जर्सी गायीच्या वासरावर पहाटे बिबट्याने हल्ला चढवत जखमी केल्याची घटना रविवारी (दि.10) घडली असून येथील शेतवस्तीवरील शेतकरी भयभीत झाले आहे.

ठळक मुद्देनांदूरवैद्य : पंधरा दिवसांपूर्वी श्वान व अकरा पिल्ले फस्त

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य - वंजारवाडी रस्त्यावर असलेल्या सायखेडे शेतवस्तीवर येथील कैलास कर्पे यांच्या शेतवस्तीवर असलेल्या शिवाजी सायखेडे या शेतकर्याच्या एका जर्सी गायीच्या वासरावर पहाटे बिबट्याने हल्ला चढवत जखमी केल्याची घटना रविवारी (दि.10) घडली असून येथील शेतवस्तीवरील शेतकरी भयभीत झाले आहे. पंधरा दिवसांपूर्वी या बिबट्याने हल्ला चढवत जवळच असलेल्या कैलास कर्पे यांनी पाळलेल्या कुञ्यावर झडप घालत फस्त केले असून येथे पुन्हा एकदा बिबट्याची दहशत वाढली असून वस्तीस राहणा-या शेतक-यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य येथील कर्पे तसेच सायखेडे मळ्यामध्ये याआधी देखील गायी, बैल आदींवर बिबट्याने हल्ला केल्याच्या घटना घडल्या असून काही दिवसांपूर्वीच एक बिबट्या येथील शेतकरी कैलास कर्पे यांच्या निदर्शनास आला होता. या परिसरात शेती जास्त असल्यामुळे जंगलवाढ झालेली असून बिबट्याचा या परिसरात भक्ष शोधण्यासाठी नेहमी वावर असतो. याच पाशर््वभूमीवर रविवारी बिबट्याने सायखेडे यांच्या शेतवस्तीवरील घराजवळील गोठ्यात असलेल्या वासरावर बिबट्याने हल्ला चढवला असता जवळच असलेले कुञे भुंकायला लागल्यावर तसेच इतर शेतकर्यांनी आरडाओरडा केल्यानंतर सदर बिबट्याने घाबरून धूम ठोकली. बिबट्याच्या या हल्ल्यात माञ वासरू जखमी झाले आहे. याआधी दोन दिवसांपूर्वी याच वस्तीवर असलेल्या कर्पे यांच्या एका श्वानावर हल्ला चढवत ठार केले होते. तसेच जवळच असलेल्या शेतकर्यांनी देखील अनेकवेळा बिबट्या पाहिला असल्याचे सांगितले असून पुन्हा या ठिकाणी बिबट्याचा वावर वाढला असून या शेतवस्तीवर दोन पोल्ट्रीफार्म असल्याने तसेच येथील शेतकर्यांना दुग्धव्यवसायासाठी गावात जावे लागत असल्यामुळे शेतकरी भयभीत झाले असून या शेतवस्तीवर बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने पिंजरा लावण्यात यावा अशी मागणी दत्तु काजळे, नवनाथ कर्पे, नामदेव यंदे, मुकुंदा यंदे, रोहिदास सायखेडे, ज्ञानेश्वर कर्पे, सोपान कर्पे, लहानू सायखेडे, संतू सायखेडे, गोकुळ सायखेडे, आदी. शेतकर्यांनी केली आहे. या झालेल्या हल्ल्यामुळे येथील शेतवस्तीवर पुन्हा एकदा बिबट्याची दहशत वाढली असून शेतकरी धास्तावले आहेत. तरी वनविभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देवून सदर परिसरात पिंजरा लावण्यात यावा अशी मागणी शेतवस्तीवरील शेतकरी करीत आहे.

 

टॅग्स :Farmerशेतकरीforestजंगल