शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

ट्रक उलटून ४०० कोंबड्या मृत्युमुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 23:55 IST

नाशिक-पुणे महामार्गावर उपनगर नाका येथे मंगळवारी रात्री दोन वाजेच्या सुमारास कोंबड्यांची वाहतूक करणारा टाटा कंपनीचा ट्रक उलटून झालेल्या अपघातात ४०० पेक्षा अधिक बॉयलर कोंबड्या मृत्युमुखी पडल्याची घटना घडली.

नाशिकरोड : नाशिक-पुणे महामार्गावर उपनगर नाका येथे मंगळवारी रात्री दोन वाजेच्या सुमारास कोंबड्यांची वाहतूक करणारा टाटा कंपनीचा ट्रक उलटून झालेल्या अपघातात ४०० पेक्षा अधिक बॉयलर कोंबड्या मृत्युमुखी पडल्याची घटना घडली.सिन्नर तालुक्यातील वावी येथील पोल्ट्री फार्ममधून ८०० बॉयलर कोंबड्या घेऊन ट्रक (एमएच ०३, सीपी ९९५४) हा बुधवारी (दि.२०) रात्री मुंबईला जाण्यास निघाला. मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास उपनगर नाका दर्गा ओलांडून ट्रक काही अंतर पुढे गेला असता एका ट्रॅव्हलच्या लक्झरी बसने कट मारल्याने ट्रक दुभाजकावर जाऊन आदळला. यामुळे ट्रकमधील जवळपास ४०० कोंबड्या मृत्युमुखी पडल्या.यामुळे महामार्गावरील वाहतूक खोळंबली हाती. अपघातानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले. तत्काळ क्रेनच्या साह्याने उलटलेला ट्रक बाजूला करण्यात आला. मृत्युमुखी पडलेल्या शेकडो कोंबड्या बुधवारी सकाळी मनपाच्या आरोग्य विभागाकडून उचलून भरून कचरा डेपोतील मृत जनावरांच्या विभागात पोहचविण्यात आल्या. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :AccidentअपघातNashikनाशिक