शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

आठ वर्षांत बांधले साडेतीन लाख शौचालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2020 02:01 IST

स्वच्छ भारत अभियानांतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागात दारिद्र रेषेखालील कुटुंबीयांबरोबरच पाच एकरपेक्षा कमी शेतजमीन असलेल्या सर्व कुटुंबांना गेल्या आठ वर्षांत हगणदारीमुक्त योजनेंतर्गत साडेतीन लाख शौचालय बांधून देण्यात आले असून, सध्या शौचालय नसलेल्या कुटुंबीयांचे सर्वेक्षण केले जात आहे.

ठळक मुद्देस्वच्छ भारत : नोव्हेंबरअखेर सर्वांना मिळणार अनुदान

नाशिक : स्वच्छ भारत अभियानांतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागात दारिद्र रेषेखालील कुटुंबीयांबरोबरच पाच एकरपेक्षा कमी शेतजमीन असलेल्या सर्व कुटुंबांना गेल्या आठ वर्षांत हगणदारीमुक्त योजनेंतर्गत साडेतीन लाख शौचालय बांधून देण्यात आले असून, सध्या शौचालय नसलेल्या कुटुंबीयांचे सर्वेक्षण केले जात आहे. नोव्हेंबरअखेर ज्यांच्याकडे शौचालय नाही अशा सर्वांना शौचालयासाठी अनुदान दिले जाणार आहे. केंद्र सरकारने स्वच्छ भारत अभियानांतर्गत सन २०१२ मध्ये जिल्ह्यात करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार ३ लाख २५ हजार ८१८ कुटुंबाकडे शौचालय नव्हते. हे सर्व कुटुंब बाहेर उघड्यावर बसत होते वा सार्वजनिक शौचालयांचा वापर करीत होते. त्यामुळे शासनाने हगणदारीमुक्त गाव योजना हाती घेतली. त्यानुसार २०१२ ते २०१८ या सहा वर्षांच्या कालावधीत ३ लाख २१ हजार ८४२ शौचालयांचे बांधकाम करण्यात आले, तर शौचालय बांधण्यासाठी घराजवळ स्वत:ची जागा नसलेल्या ३९७६ कुटुंबांना सार्वजनिक शौचालयांशी जोडण्यात आले. तरीदेखील अनेक कुटुंब पायाभूत सर्वेक्षणातून सुटल्याचे आढळून आले. त्यामुळे पुन्हा २०१८-१९ मध्ये गावपातळीवर सर्वेक्षण करण्यात येऊन त्यात ३५ हजार ७५३ नवीन कुटुंबाकडे शौचालय नसल्याचे आढळून आले होते. या सर्व कुटुंबांना जुलै २०२० अखेरपर्यंत शौचालय बांधण्यासाठी अनुदान देण्यात आले व शौचालये पूर्ण करण्यात आले. त्यानंतरही शौचालय नसलेल्या कुटुंबांसाठी सध्या मोहीम राबविण्यात येत असून, त्यात १५ हजार २०९ कुटुंबांकडे शौचालय नसल्याची माहिती समाेर आली आहे. या सर्वांना ऑक्टोबरअखेरपर्यंत शौचालयांचेदेखील बांधकाम करून त्यांना प्रोत्साहन अनुदान वितरण करण्यात आले आहे.

सध्या स्वच्छ भारत अभियानाचा दुसरा टप्पा सुरू असून, यातदेखील अद्यापही जिल्ह्यात शौचालय उपलब्ध नसलेल्या कुटुंबांची माहिती मागविण्यात आली असून, त्यानुसार दहा हजार कुटुंबांकडे शौचालय नसल्याचे दिसून आले आहे. नोव्हेंबरअखेरपर्यंत याबाबतची सारी माहिती हाती येणार आहे.

चौकट===

विभक्त कुटुंबाची संख्या वाढली

स्वच्छ भारत अभियानांतर्गत दरवर्षी शौचालय नसलेल्या कुटुंबाचे सर्वेक्षण केले जात आहे. त्यात प्रामुख्याने विभक्त कुटुंबांची संख्या वाढत असल्याचे आढळून आले आहे. मालमत्तेचे खातेफोड होणे, एका घराचे दुसरे घर होणे अशा बाबींचा समावेश आहे. वर्षभरात जवळपास दहा ते बारा हजार नवीन कुटुंबाची निर्मिती होत असल्याचे सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे.

टॅग्स :Nashikनाशिकnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद