शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
2
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
5
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
6
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
7
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
8
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
9
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
10
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
11
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
12
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
13
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
14
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
15
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
16
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
17
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
18
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
19
आता जगभरात व्यापार युद्धाचा भडका! अमेरिकेकडून ७० देशांसाठीही शुल्काची यादी जाहीर
20
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा

आठ वर्षांत बांधले साडेतीन लाख शौचालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2020 02:01 IST

स्वच्छ भारत अभियानांतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागात दारिद्र रेषेखालील कुटुंबीयांबरोबरच पाच एकरपेक्षा कमी शेतजमीन असलेल्या सर्व कुटुंबांना गेल्या आठ वर्षांत हगणदारीमुक्त योजनेंतर्गत साडेतीन लाख शौचालय बांधून देण्यात आले असून, सध्या शौचालय नसलेल्या कुटुंबीयांचे सर्वेक्षण केले जात आहे.

ठळक मुद्देस्वच्छ भारत : नोव्हेंबरअखेर सर्वांना मिळणार अनुदान

नाशिक : स्वच्छ भारत अभियानांतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागात दारिद्र रेषेखालील कुटुंबीयांबरोबरच पाच एकरपेक्षा कमी शेतजमीन असलेल्या सर्व कुटुंबांना गेल्या आठ वर्षांत हगणदारीमुक्त योजनेंतर्गत साडेतीन लाख शौचालय बांधून देण्यात आले असून, सध्या शौचालय नसलेल्या कुटुंबीयांचे सर्वेक्षण केले जात आहे. नोव्हेंबरअखेर ज्यांच्याकडे शौचालय नाही अशा सर्वांना शौचालयासाठी अनुदान दिले जाणार आहे. केंद्र सरकारने स्वच्छ भारत अभियानांतर्गत सन २०१२ मध्ये जिल्ह्यात करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार ३ लाख २५ हजार ८१८ कुटुंबाकडे शौचालय नव्हते. हे सर्व कुटुंब बाहेर उघड्यावर बसत होते वा सार्वजनिक शौचालयांचा वापर करीत होते. त्यामुळे शासनाने हगणदारीमुक्त गाव योजना हाती घेतली. त्यानुसार २०१२ ते २०१८ या सहा वर्षांच्या कालावधीत ३ लाख २१ हजार ८४२ शौचालयांचे बांधकाम करण्यात आले, तर शौचालय बांधण्यासाठी घराजवळ स्वत:ची जागा नसलेल्या ३९७६ कुटुंबांना सार्वजनिक शौचालयांशी जोडण्यात आले. तरीदेखील अनेक कुटुंब पायाभूत सर्वेक्षणातून सुटल्याचे आढळून आले. त्यामुळे पुन्हा २०१८-१९ मध्ये गावपातळीवर सर्वेक्षण करण्यात येऊन त्यात ३५ हजार ७५३ नवीन कुटुंबाकडे शौचालय नसल्याचे आढळून आले होते. या सर्व कुटुंबांना जुलै २०२० अखेरपर्यंत शौचालय बांधण्यासाठी अनुदान देण्यात आले व शौचालये पूर्ण करण्यात आले. त्यानंतरही शौचालय नसलेल्या कुटुंबांसाठी सध्या मोहीम राबविण्यात येत असून, त्यात १५ हजार २०९ कुटुंबांकडे शौचालय नसल्याची माहिती समाेर आली आहे. या सर्वांना ऑक्टोबरअखेरपर्यंत शौचालयांचेदेखील बांधकाम करून त्यांना प्रोत्साहन अनुदान वितरण करण्यात आले आहे.

सध्या स्वच्छ भारत अभियानाचा दुसरा टप्पा सुरू असून, यातदेखील अद्यापही जिल्ह्यात शौचालय उपलब्ध नसलेल्या कुटुंबांची माहिती मागविण्यात आली असून, त्यानुसार दहा हजार कुटुंबांकडे शौचालय नसल्याचे दिसून आले आहे. नोव्हेंबरअखेरपर्यंत याबाबतची सारी माहिती हाती येणार आहे.

चौकट===

विभक्त कुटुंबाची संख्या वाढली

स्वच्छ भारत अभियानांतर्गत दरवर्षी शौचालय नसलेल्या कुटुंबाचे सर्वेक्षण केले जात आहे. त्यात प्रामुख्याने विभक्त कुटुंबांची संख्या वाढत असल्याचे आढळून आले आहे. मालमत्तेचे खातेफोड होणे, एका घराचे दुसरे घर होणे अशा बाबींचा समावेश आहे. वर्षभरात जवळपास दहा ते बारा हजार नवीन कुटुंबाची निर्मिती होत असल्याचे सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे.

टॅग्स :Nashikनाशिकnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद