शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

आठ वर्षांत बांधले साडेतीन लाख शौचालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2020 02:01 IST

स्वच्छ भारत अभियानांतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागात दारिद्र रेषेखालील कुटुंबीयांबरोबरच पाच एकरपेक्षा कमी शेतजमीन असलेल्या सर्व कुटुंबांना गेल्या आठ वर्षांत हगणदारीमुक्त योजनेंतर्गत साडेतीन लाख शौचालय बांधून देण्यात आले असून, सध्या शौचालय नसलेल्या कुटुंबीयांचे सर्वेक्षण केले जात आहे.

ठळक मुद्देस्वच्छ भारत : नोव्हेंबरअखेर सर्वांना मिळणार अनुदान

नाशिक : स्वच्छ भारत अभियानांतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागात दारिद्र रेषेखालील कुटुंबीयांबरोबरच पाच एकरपेक्षा कमी शेतजमीन असलेल्या सर्व कुटुंबांना गेल्या आठ वर्षांत हगणदारीमुक्त योजनेंतर्गत साडेतीन लाख शौचालय बांधून देण्यात आले असून, सध्या शौचालय नसलेल्या कुटुंबीयांचे सर्वेक्षण केले जात आहे. नोव्हेंबरअखेर ज्यांच्याकडे शौचालय नाही अशा सर्वांना शौचालयासाठी अनुदान दिले जाणार आहे. केंद्र सरकारने स्वच्छ भारत अभियानांतर्गत सन २०१२ मध्ये जिल्ह्यात करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार ३ लाख २५ हजार ८१८ कुटुंबाकडे शौचालय नव्हते. हे सर्व कुटुंब बाहेर उघड्यावर बसत होते वा सार्वजनिक शौचालयांचा वापर करीत होते. त्यामुळे शासनाने हगणदारीमुक्त गाव योजना हाती घेतली. त्यानुसार २०१२ ते २०१८ या सहा वर्षांच्या कालावधीत ३ लाख २१ हजार ८४२ शौचालयांचे बांधकाम करण्यात आले, तर शौचालय बांधण्यासाठी घराजवळ स्वत:ची जागा नसलेल्या ३९७६ कुटुंबांना सार्वजनिक शौचालयांशी जोडण्यात आले. तरीदेखील अनेक कुटुंब पायाभूत सर्वेक्षणातून सुटल्याचे आढळून आले. त्यामुळे पुन्हा २०१८-१९ मध्ये गावपातळीवर सर्वेक्षण करण्यात येऊन त्यात ३५ हजार ७५३ नवीन कुटुंबाकडे शौचालय नसल्याचे आढळून आले होते. या सर्व कुटुंबांना जुलै २०२० अखेरपर्यंत शौचालय बांधण्यासाठी अनुदान देण्यात आले व शौचालये पूर्ण करण्यात आले. त्यानंतरही शौचालय नसलेल्या कुटुंबांसाठी सध्या मोहीम राबविण्यात येत असून, त्यात १५ हजार २०९ कुटुंबांकडे शौचालय नसल्याची माहिती समाेर आली आहे. या सर्वांना ऑक्टोबरअखेरपर्यंत शौचालयांचेदेखील बांधकाम करून त्यांना प्रोत्साहन अनुदान वितरण करण्यात आले आहे.

सध्या स्वच्छ भारत अभियानाचा दुसरा टप्पा सुरू असून, यातदेखील अद्यापही जिल्ह्यात शौचालय उपलब्ध नसलेल्या कुटुंबांची माहिती मागविण्यात आली असून, त्यानुसार दहा हजार कुटुंबांकडे शौचालय नसल्याचे दिसून आले आहे. नोव्हेंबरअखेरपर्यंत याबाबतची सारी माहिती हाती येणार आहे.

चौकट===

विभक्त कुटुंबाची संख्या वाढली

स्वच्छ भारत अभियानांतर्गत दरवर्षी शौचालय नसलेल्या कुटुंबाचे सर्वेक्षण केले जात आहे. त्यात प्रामुख्याने विभक्त कुटुंबांची संख्या वाढत असल्याचे आढळून आले आहे. मालमत्तेचे खातेफोड होणे, एका घराचे दुसरे घर होणे अशा बाबींचा समावेश आहे. वर्षभरात जवळपास दहा ते बारा हजार नवीन कुटुंबाची निर्मिती होत असल्याचे सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे.

टॅग्स :Nashikनाशिकnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद