शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
3
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
4
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
5
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
6
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
7
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
8
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
9
"मी इनसाइडर असते तर बरं झालं असतं", इंडस्ट्रीतील स्ट्रगलवर लोकप्रिय अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट
10
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
11
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
12
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
13
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
14
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
15
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
16
८ वर्षांपूर्वी आई गेली, नुकतेच बाबाही गेले; रीमा लागूंच्या वाढदिवसानिमित्त लेकीची भावुक पोस्ट
17
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
18
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
19
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
20
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!

लॉकडाउनच्या काळात मिळाले हजारो मजुरांना काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 01:28 IST

नाशिक : कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाउन व संचारबंदी सुरू असल्याने ग्रामीण भागातील मजुरांची उपासमार टाळण्यासाठी जिल्हा परिषदेने रोजगार हमी योजनेचे कामे सुरू केली असून, त्यामुळे मजुरांच्या हाताला काम तर मिळालेच, परंतु त्यांना मान्सूनपूर्व हंगामात स्वत:च्या शेतात शेतीकामे करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.

नाशिक : कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाउन व संचारबंदी सुरू असल्याने ग्रामीण भागातील मजुरांची उपासमार टाळण्यासाठी जिल्हा परिषदेने रोजगार हमी योजनेचे कामे सुरू केली असून, त्यामुळे मजुरांच्या हाताला काम तर मिळालेच, परंतु त्यांना मान्सूनपूर्व हंगामात स्वत:च्या शेतात शेतीकामे करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. लॉकडाउनच्या काळात गेल्या काही दिवसांत जिल्ह्यातील ग्रामीण भागात सुमारे अडीच हजार कामे सुरू करून साडेअकरा हजारांहून अधिक मजुरांना यामुळे रोजगार उपलब्ध झाला आहे.ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध नसल्याने गेल्या अनेक वर्षांपासून शहरी भागात रोजगारासाठी स्थलांतरित केलेल्या मजुरांची संख्या हजारोच्या आसपास असून, आजवर या मजुरांनी शहरातील बांधकाम क्षेत्रात कामे करून आपला उदरनिर्वाह केला. परंतु कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता केंद्र व राज्य सरकारने लॉकडाउन व संचारबंदी जारी केल्याने शहरी भागात वास्तव्यास असलेल्या ग्रामीण भागातील मजुरांवर उपासमारीची वेळ आली त्यामुळे त्यांनी पुन्हा आपल्या मूळ गावी परतण्याचा निर्णय घेतला. परंतु गावी जाऊनही त्यांच्या हाताला काम मिळण्याची शाश्वती राहिलेली नाही. मुळात लॉकडाउनमुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाला पाहिजे त्याप्रमाणात भाव मिळत नाही, त्याचबरोबर मजुरांना रोजगार देण्यासाठीही पैसे नसल्याने शेतकऱ्यांनी शेतातील उभी पिकांमध्ये जनावरे सोडून दिली आहेत. अशा परिस्थितीत गावाकडे पोट भरण्यासाठी गेलेल्या मजुरांवर दुहेरी संकट कोसळले असल्याचे पाहून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड यांनी महात्मा गांधी राष्टÑीय रोजगार हमी योजनेंतर्गत अशा मजुरांना त्यांच्या गावातच हाताला काम देण्याची योजना आखली आहे. या संदर्भात सर्वच ग्रामपंचायतींना सूचना देण्यात आल्या असून, कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासनाने सार्वजनिक विकास कामे सुरू करण्याबाबत घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यासाठी अशा मजुरांना त्यांच्या शेतातच किंबहुना अन्य शेतकºयांकडे रोहयोंतर्गत शेतीचे कामे करण्याची मुभा देण्यात आली आहे.जिल्ह्यातील ६७९ ग्रामपंचायतींनी याकामी पुढाकार घेतला असून, गेल्या पंधरा दिवसांत रोजगार हमी योजनेची २,४८९ कामे सुरू करण्यात आली आहे. या कामांवर जवळपास साडेअकरा हजार मजुरांना रोजगार उपलब्ध झाला आहे. येत्या आठवड्यात मजुरांची ही संख्या पंधरा हजारांहून अधिक होण्याची शक्यता लिना बनसोड यांनी बोलून दाखविली आहे. वाढलेले लॉकडाउन व मजुरांची उपासमार टाळण्यासाठी जिल्ह्यात ६२ हजार कामे सेल्फवर ठेवण्यात आले आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरी