शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

लॉकडाउनच्या काळात मिळाले हजारो मजुरांना काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 01:28 IST

नाशिक : कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाउन व संचारबंदी सुरू असल्याने ग्रामीण भागातील मजुरांची उपासमार टाळण्यासाठी जिल्हा परिषदेने रोजगार हमी योजनेचे कामे सुरू केली असून, त्यामुळे मजुरांच्या हाताला काम तर मिळालेच, परंतु त्यांना मान्सूनपूर्व हंगामात स्वत:च्या शेतात शेतीकामे करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.

नाशिक : कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाउन व संचारबंदी सुरू असल्याने ग्रामीण भागातील मजुरांची उपासमार टाळण्यासाठी जिल्हा परिषदेने रोजगार हमी योजनेचे कामे सुरू केली असून, त्यामुळे मजुरांच्या हाताला काम तर मिळालेच, परंतु त्यांना मान्सूनपूर्व हंगामात स्वत:च्या शेतात शेतीकामे करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. लॉकडाउनच्या काळात गेल्या काही दिवसांत जिल्ह्यातील ग्रामीण भागात सुमारे अडीच हजार कामे सुरू करून साडेअकरा हजारांहून अधिक मजुरांना यामुळे रोजगार उपलब्ध झाला आहे.ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध नसल्याने गेल्या अनेक वर्षांपासून शहरी भागात रोजगारासाठी स्थलांतरित केलेल्या मजुरांची संख्या हजारोच्या आसपास असून, आजवर या मजुरांनी शहरातील बांधकाम क्षेत्रात कामे करून आपला उदरनिर्वाह केला. परंतु कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता केंद्र व राज्य सरकारने लॉकडाउन व संचारबंदी जारी केल्याने शहरी भागात वास्तव्यास असलेल्या ग्रामीण भागातील मजुरांवर उपासमारीची वेळ आली त्यामुळे त्यांनी पुन्हा आपल्या मूळ गावी परतण्याचा निर्णय घेतला. परंतु गावी जाऊनही त्यांच्या हाताला काम मिळण्याची शाश्वती राहिलेली नाही. मुळात लॉकडाउनमुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाला पाहिजे त्याप्रमाणात भाव मिळत नाही, त्याचबरोबर मजुरांना रोजगार देण्यासाठीही पैसे नसल्याने शेतकऱ्यांनी शेतातील उभी पिकांमध्ये जनावरे सोडून दिली आहेत. अशा परिस्थितीत गावाकडे पोट भरण्यासाठी गेलेल्या मजुरांवर दुहेरी संकट कोसळले असल्याचे पाहून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड यांनी महात्मा गांधी राष्टÑीय रोजगार हमी योजनेंतर्गत अशा मजुरांना त्यांच्या गावातच हाताला काम देण्याची योजना आखली आहे. या संदर्भात सर्वच ग्रामपंचायतींना सूचना देण्यात आल्या असून, कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासनाने सार्वजनिक विकास कामे सुरू करण्याबाबत घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यासाठी अशा मजुरांना त्यांच्या शेतातच किंबहुना अन्य शेतकºयांकडे रोहयोंतर्गत शेतीचे कामे करण्याची मुभा देण्यात आली आहे.जिल्ह्यातील ६७९ ग्रामपंचायतींनी याकामी पुढाकार घेतला असून, गेल्या पंधरा दिवसांत रोजगार हमी योजनेची २,४८९ कामे सुरू करण्यात आली आहे. या कामांवर जवळपास साडेअकरा हजार मजुरांना रोजगार उपलब्ध झाला आहे. येत्या आठवड्यात मजुरांची ही संख्या पंधरा हजारांहून अधिक होण्याची शक्यता लिना बनसोड यांनी बोलून दाखविली आहे. वाढलेले लॉकडाउन व मजुरांची उपासमार टाळण्यासाठी जिल्ह्यात ६२ हजार कामे सेल्फवर ठेवण्यात आले आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरी