शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

हजारो वाहने धावतात विम्याशिवाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:18 IST

नाशिक : शहरात अनेक वाहनधारक एकदा वाहनाचा विमा संपल्यानंतर त्याचे नूतनीकरण करीत नाहीत. त्यामुळे विम्याशिवाय रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची संख्या ...

नाशिक : शहरात अनेक वाहनधारक एकदा वाहनाचा विमा संपल्यानंतर त्याचे नूतनीकरण करीत नाहीत. त्यामुळे विम्याशिवाय रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून सद्य:स्थितीत हजारो वाहने विम्याशिवाय रस्त्यावर धावत असताना प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे मात्र याकडे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे.

सरकारने नवीन वाहनांसाठी पाच वर्षांचा विमा बंधनकारक केला आहे. त्यामुळे आता विमाधारक वाहनांची संख्या वाढत असली तरी जुन्या वाहनांच्या व्यवहारांमध्ये एका वर्षाचाच विमा काढून खरेदी-विक्रीचे व्यवहार केले जातात. अशा वाहनांचा एकदा विमा संपुष्टात आला की पुन्हा त्याचे नूतनीकरण करणाऱ्या वाहनधारकांचे प्रमाण अत्यल्प आहे. त्याचप्रमाणे बीएस सहा वाहनांपूर्वीच्याही अनेक वाहनांचे विमा कवच संपल्यानंतर पुन्हा नूतनीकरण झालेले नाही. यात सर्वाधिक प्रमाण ट्रॅक्टर आणि दुचाकीसारख्या वाहनांचे असून खासगी वापराच्या वाहनांचा विमा संपल्याचे प्रमाण लक्षणीय आहे. अशी वाहने विनापरवाना चालत असल्याची माहिती अनपेक्षित अपघात झाल्यानंतरच समोर येते. अशा वाहनांविषयी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून कोणतीही कारवाई होत नाही. त्यामुळे विम्याशिवाय वाहन चालविणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. अशा वाहनांचा अपघात होऊन वाहनाचे नुकसान झाल्यानंतर वाहनाची कोणतीही भरपाई मिळत नाही. तसेच विम्याशिवाय वाहन चालविणाऱ्यासह मालकावरही कारवाई होते. अशा अपघातानंतरच वाहनचालक आणि वाहनमालकांना वाहनांचा विमा काढण्याची सद्बुद्धी सुचत असल्याचे दिसून येते.

इन्फो-

इन्शुरन्स नसल्याचे धोके -

वाहनाला विमा केवळ अपघातातील भरपाईसाठीच नव्हे, तर वाहनाच्या सुरक्षिततेसाठी विमा महत्त्वाचा आहे. वाहन चोरी होणे, वाहनाला आग लागणे, वाहनाचा अपघात होणे अशा घटनांमध्ये विमा असलेल्या वाहनांची नुकसानभरपाई विमा कंपनीकडून दिली जाते. त्याचप्रमाणे वाहन विम्याच्या प्रकारानुसार, अपघातातील जीवितहानीचीही नुकसानभरपाई मिळते. मात्र विमाच नसेल तर यापैकी कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. त्याचप्रमाणे विम्याशिवाय वाहन चाविणाऱ्या चालकावर आणि वाहनमालकावरही गुन्हा दाखल होऊन हे दोघेही कारवाईस पात्र ठरू शकतात.

कोट-

(प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया वापरावी )