शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
4
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
5
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
6
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
7
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
8
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
9
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
10
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
11
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
12
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
13
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
14
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
15
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
16
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
17
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
18
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
19
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
20
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक

हजारो वाहने धावतात विम्याशिवाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:18 IST

नाशिक : शहरात अनेक वाहनधारक एकदा वाहनाचा विमा संपल्यानंतर त्याचे नूतनीकरण करीत नाहीत. त्यामुळे विम्याशिवाय रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची संख्या ...

नाशिक : शहरात अनेक वाहनधारक एकदा वाहनाचा विमा संपल्यानंतर त्याचे नूतनीकरण करीत नाहीत. त्यामुळे विम्याशिवाय रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून सद्य:स्थितीत हजारो वाहने विम्याशिवाय रस्त्यावर धावत असताना प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे मात्र याकडे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे.

सरकारने नवीन वाहनांसाठी पाच वर्षांचा विमा बंधनकारक केला आहे. त्यामुळे आता विमाधारक वाहनांची संख्या वाढत असली तरी जुन्या वाहनांच्या व्यवहारांमध्ये एका वर्षाचाच विमा काढून खरेदी-विक्रीचे व्यवहार केले जातात. अशा वाहनांचा एकदा विमा संपुष्टात आला की पुन्हा त्याचे नूतनीकरण करणाऱ्या वाहनधारकांचे प्रमाण अत्यल्प आहे. त्याचप्रमाणे बीएस सहा वाहनांपूर्वीच्याही अनेक वाहनांचे विमा कवच संपल्यानंतर पुन्हा नूतनीकरण झालेले नाही. यात सर्वाधिक प्रमाण ट्रॅक्टर आणि दुचाकीसारख्या वाहनांचे असून खासगी वापराच्या वाहनांचा विमा संपल्याचे प्रमाण लक्षणीय आहे. अशी वाहने विनापरवाना चालत असल्याची माहिती अनपेक्षित अपघात झाल्यानंतरच समोर येते. अशा वाहनांविषयी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून कोणतीही कारवाई होत नाही. त्यामुळे विम्याशिवाय वाहन चालविणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. अशा वाहनांचा अपघात होऊन वाहनाचे नुकसान झाल्यानंतर वाहनाची कोणतीही भरपाई मिळत नाही. तसेच विम्याशिवाय वाहन चालविणाऱ्यासह मालकावरही कारवाई होते. अशा अपघातानंतरच वाहनचालक आणि वाहनमालकांना वाहनांचा विमा काढण्याची सद्बुद्धी सुचत असल्याचे दिसून येते.

इन्फो-

इन्शुरन्स नसल्याचे धोके -

वाहनाला विमा केवळ अपघातातील भरपाईसाठीच नव्हे, तर वाहनाच्या सुरक्षिततेसाठी विमा महत्त्वाचा आहे. वाहन चोरी होणे, वाहनाला आग लागणे, वाहनाचा अपघात होणे अशा घटनांमध्ये विमा असलेल्या वाहनांची नुकसानभरपाई विमा कंपनीकडून दिली जाते. त्याचप्रमाणे वाहन विम्याच्या प्रकारानुसार, अपघातातील जीवितहानीचीही नुकसानभरपाई मिळते. मात्र विमाच नसेल तर यापैकी कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. त्याचप्रमाणे विम्याशिवाय वाहन चाविणाऱ्या चालकावर आणि वाहनमालकावरही गुन्हा दाखल होऊन हे दोघेही कारवाईस पात्र ठरू शकतात.

कोट-

(प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया वापरावी )