शहरं
Join us  
Trending Stories
1
India Lifts First ODI World Cup Trophy: हरमनप्रीतसह संघातील खेळाडूंनी खास अंदाजात उंचावली ट्रॉफी (VIDEO)
2
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
3
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
4
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
5
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
6
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
7
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
8
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
9
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
10
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
11
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
12
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
13
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
14
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
15
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
16
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
17
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
18
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
19
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
20
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास

नाशिकच्या आर्टिलरी सेंटरमध्ये देशाच्या कानाकोपऱ्यातून हजारो अग्नीवीर दाखल; सैनिकी प्रशिक्षणाचा 'स्टार्टअप'

By अझहर शेख | Updated: January 7, 2023 18:27 IST

भारतीय सैन्यदलात चार वर्षांसाठी सेवा बजावण्याची संधी या योजनेतून युवकांना देण्यात आली आहे. सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीची संधी उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने देशभरात २५ हजार तरुणांना अग्निवीर म्हणून सैन्यात भरती केले जात आहे.

नाशिक : भारत सरकारने सैन्यदलात सेवा बजावण्यासाठी इच्छुक असलेल्या सुशिक्षित तरुणांसाठी अग्निपथ योजनेअंतर्गत अग्निविरांची भरती केली जाणार असल्याची घोषणा मागील वर्षी जून महिन्यात केली होती. याअंतर्गत नाशिकरोड येथील तोफखाना केंद्रात देशाच्या कानाकोपऱ्यातून तरुण दाखल होत आहेत. आठवडाभरापूर्वी दाखल झालेल्या तरुणांचे प्रशिक्षण सत्रदेखील सुरू झाले आहे. याठिकाणी तोफखान्याचे कमान्डंट ब्रिगेडियर अे.रागेश यांच्या नेतृत्वाखाली अग्निविरांसाठी सुसज्ज यंत्रणा उभारण्यात आली आहे, अशी माहिती लेफ्टनंट कर्नल एस.के.पांडा यांनी शनिवारी (दि.७) पत्रकार परिषदेत दिली. 

भारतीय सैन्यदलात चार वर्षांसाठी सेवा बजावण्याची संधी या योजनेतून युवकांना देण्यात आली आहे. सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीची संधी उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने देशभरात २५ हजार तरुणांना अग्निवीर म्हणून सैन्यात भरती केले जात आहे.जयभवानी रोडवरील अशोकचक्र प्रवेशद्वारातून आतमध्ये प्रवेश करताच डाव्या हाताला स्वतंत्र प्रशस्त्र असे ‘अग्निवीर रिसेप्शन सेंटर’ उभारण्यात आले आहेत. याठिकाणी स्वागतफलक तसेच बंदुकधारी सैनिकांचे ॲक्शनमोडमधील छायाचित्रांचे फलकदेखील तरुणांची ऊर्जा वाढविण्यासाठी लावण्यात आले आहेत. या केंद्रातून त्यांचे बायोमॅट्रिक तपाासणीपासून तर सर्व मुळ कागदपत्रांची पडताळणी करण्यापर्यंत तसेच भारतीय सैन्यदलाचा देदिप्यमान इतिहासावर प्रकाशझोत टाकणारा लघुपट दाखविण्यापर्यंत सर्व काही प्रक्रिया पार पाडली जाते. यासाठी येथे लेफ्टनंट कर्नल निखिल पी., यांची नेमणूक करण्यात आली आहे. तोफखाना केंद्रात प्रवेश केल्यानंतर रिसेप्शन सेंटरमध्ये अग्निवीर तरुणांची कायदेशीर कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण केली जाते. त्यानंतर येथून पुढे त्यांना त्यांच्या निवास कक्षात जवान घेऊन जातात. 

या चार पदांवर सेवा बजावण्याची संधीताेफखाना केंद्रातून प्रशिक्षण घेणाऱ्या अग्निवीरांना भारतीय सैन्यात तोफा चालविणारा गनर, तांत्रिक सहाय्यक (टेक्निकल असिस्टंट), रेडिओ ऑपरेटर, मोटार ड्रायव्हर या चार महत्वाच्या पदांवर सेवा बजावण्याची संधी मिळणार आहे. यासाठी मुलभूत शास्त्रशुद्ध सैनिकी प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षकांकडून दिले जात आहे. यामध्ये १० आठवड्यांचे प्राथमिक सैनिकी प्रशिक्षण व २१ आठवड्यांचे ॲडव्हान्स सैनिकी प्रशिक्षणाचा समावेश आहे. एकुण ३१आठवड्यांचा प्रशिक्षण कालावधी राहणार असल्याचे पांडा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

टॅग्स :NashikनाशिकSoldierसैनिकNarendra Modiनरेंद्र मोदी