शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

इगतपुरीत अडकलेल्या हजारो परप्रांतीयांची मुंबईला रवानगी; सीमाबंदीमुळे पोलिसांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 06:29 IST

स्थानिक नागरिकांनी सामावून घेण्यास केला विरोध

नाशिक: मुंबई, ठाणेसह अन्य परिसरातून नाशिकसह उत्तर महाराष्ट्राकडे निघालेल्या सुमारे सहा हजार नागरिकांसह रेल्वेने सोडलेल्या विशेष रेल्वेत बेकायदेशीररित्या शिरलेल्या सुमारे ५०० प्रवाशांना इगतपुरी येथे रोखण्यात आले असून त्यांची प्रशासनाने दुपारी पुन्हा मुंबईकडे रवानगी केली आहे. मुंबईकडून आलेल्या या जत्थ्याला जिल्ह्याच्या सीमाबंदीमुळे इगतपुरीतच थांबावे लागले आहे. या स्थलांतरितांना स्थानिक नागरिकांनी विरोध केल्यामुळे प्रशासनाने सावध पवित्रा घेत त्यांना परत पाठविण्याचा निर्णय घेतला.

कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी शासनाने जिल्ह्याच्या सीमा सील केल्या आहेत. त्यामुळे अन्य जिल्ह्यात असलेल्या नागरिकांना आपल्या मूळ गावी जाण्यात अडचणी येत आहेत. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, शहापूर कसारा यासह अन्य भागात नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील अनेक चाकरमाने आणि कष्टकरी वास्तव्यास होते. मात्र आता कोरोनामुळे उद्योग आणि व्यवसाय बंद झाल्याने संबंधितांना मूळ गावी जाण्याची घाई झाली आहे. त्यामुळे मिळेल त्या साधनाने आणि बहुतांशी पायपीट करत नागरिक इगतपुरीत आले होते.

मात्र सीमा सील केल्यामुळे त्यांना नाशिकमध्ये प्रवेश करणे कठीण झाले. बाहेरून मोठ्या प्रमाणात नागरिक आल्याने इगतपुरीतील नागरिक धास्तावले. त्यांनी या स्थलांतरितांना हटविण्याची मागणी केली. त्याच दरम्यान इगतपुरी रेल्वे स्थानकात मेंटेनन्स स्टाफसाठी सोडण्यात आलेली गोरखपूर काशी एक्स्प्रेस आली. तिच्यातून जवळपास ४०० ते ५०० अनधिकृत प्रवासीदेखील प्रवास करत होते. हे सर्व प्रवासी उत्तर प्रदेशामध्ये जाणार होते.

२०० रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी सोडण्यात आलेल्या रेल्वेत परप्रांतीय प्रवाशी असल्याची माहिती भुसावळ डिव्हिजनला मिळाल्याने ती गाडीपुढे न पाठवता इगतपुरीतच थांबवून त्या प्रवाशांना स्थानकावर उतरविण्यात आले.

सुरक्षा बळ जवानांना माहिती मिळाली आणि...

रेल्वेतून व महामार्गावरून आलेल्या परप्रांतीय प्रवाशांची माहिती सुरक्षा बळाच्या जवानांना मिळताच त्यांनी परप्रांतीय प्रवाशांना स्टेशनबाहेर काढले. यावेळी काही प्रवाशांनी मुंबईच्या दिशेने धाव घेतली. मात्र सदर घटनेची माहिती तहसीलदार अर्चना पागिरे यांना समजताच त्यांनी तात्काळ लोहमार्ग पोलीस व रेल्वे सुरक्षा बळाचे जवान तसेच पोलिसांना कळवून पुन्हा परप्रांतीय प्रवाशांना मुंबईहून आलेल्या गाडीत बसविले. सदर गाडी मुंबईमार्गे गोरखपूरला जाणार असल्याची माहिती देऊन दुपारी काशी एक्स्प्रेस मुंबईच्या दिशेने रवाना करण्यात आली.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याNashikनाशिक