शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

इगतपुरीत अडकलेल्या हजारो परप्रांतीयांची मुंबईला रवानगी; सीमाबंदीमुळे पोलिसांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 06:29 IST

स्थानिक नागरिकांनी सामावून घेण्यास केला विरोध

नाशिक: मुंबई, ठाणेसह अन्य परिसरातून नाशिकसह उत्तर महाराष्ट्राकडे निघालेल्या सुमारे सहा हजार नागरिकांसह रेल्वेने सोडलेल्या विशेष रेल्वेत बेकायदेशीररित्या शिरलेल्या सुमारे ५०० प्रवाशांना इगतपुरी येथे रोखण्यात आले असून त्यांची प्रशासनाने दुपारी पुन्हा मुंबईकडे रवानगी केली आहे. मुंबईकडून आलेल्या या जत्थ्याला जिल्ह्याच्या सीमाबंदीमुळे इगतपुरीतच थांबावे लागले आहे. या स्थलांतरितांना स्थानिक नागरिकांनी विरोध केल्यामुळे प्रशासनाने सावध पवित्रा घेत त्यांना परत पाठविण्याचा निर्णय घेतला.

कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी शासनाने जिल्ह्याच्या सीमा सील केल्या आहेत. त्यामुळे अन्य जिल्ह्यात असलेल्या नागरिकांना आपल्या मूळ गावी जाण्यात अडचणी येत आहेत. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, शहापूर कसारा यासह अन्य भागात नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील अनेक चाकरमाने आणि कष्टकरी वास्तव्यास होते. मात्र आता कोरोनामुळे उद्योग आणि व्यवसाय बंद झाल्याने संबंधितांना मूळ गावी जाण्याची घाई झाली आहे. त्यामुळे मिळेल त्या साधनाने आणि बहुतांशी पायपीट करत नागरिक इगतपुरीत आले होते.

मात्र सीमा सील केल्यामुळे त्यांना नाशिकमध्ये प्रवेश करणे कठीण झाले. बाहेरून मोठ्या प्रमाणात नागरिक आल्याने इगतपुरीतील नागरिक धास्तावले. त्यांनी या स्थलांतरितांना हटविण्याची मागणी केली. त्याच दरम्यान इगतपुरी रेल्वे स्थानकात मेंटेनन्स स्टाफसाठी सोडण्यात आलेली गोरखपूर काशी एक्स्प्रेस आली. तिच्यातून जवळपास ४०० ते ५०० अनधिकृत प्रवासीदेखील प्रवास करत होते. हे सर्व प्रवासी उत्तर प्रदेशामध्ये जाणार होते.

२०० रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी सोडण्यात आलेल्या रेल्वेत परप्रांतीय प्रवाशी असल्याची माहिती भुसावळ डिव्हिजनला मिळाल्याने ती गाडीपुढे न पाठवता इगतपुरीतच थांबवून त्या प्रवाशांना स्थानकावर उतरविण्यात आले.

सुरक्षा बळ जवानांना माहिती मिळाली आणि...

रेल्वेतून व महामार्गावरून आलेल्या परप्रांतीय प्रवाशांची माहिती सुरक्षा बळाच्या जवानांना मिळताच त्यांनी परप्रांतीय प्रवाशांना स्टेशनबाहेर काढले. यावेळी काही प्रवाशांनी मुंबईच्या दिशेने धाव घेतली. मात्र सदर घटनेची माहिती तहसीलदार अर्चना पागिरे यांना समजताच त्यांनी तात्काळ लोहमार्ग पोलीस व रेल्वे सुरक्षा बळाचे जवान तसेच पोलिसांना कळवून पुन्हा परप्रांतीय प्रवाशांना मुंबईहून आलेल्या गाडीत बसविले. सदर गाडी मुंबईमार्गे गोरखपूरला जाणार असल्याची माहिती देऊन दुपारी काशी एक्स्प्रेस मुंबईच्या दिशेने रवाना करण्यात आली.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याNashikनाशिक